शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नागरिकांचा डिजिटल सातबारा घेण्याकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 21:36 IST

महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडले होते. मात्र,गेल्या आठ महिन्यात १३ लाख ८७ हजार नागरिकांनी डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत.

पुणे: महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडले होते. मात्र,गेल्या आठ महिन्यात १३ लाख ८७ हजार नागरिकांनी डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत. दिवसाला सुमारे पाच ते सहा नागरिक उतारे डाऊनलोड करून घेत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नागरिकांचा डिजिटल उतारे घेण्याकडे कल वाढला आहे.

ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने हाती घेतला आहे.वर्षभरात राज्यातील सुमारे २५ लाख ६० हजार दस्त नोंदणी ई-फेरप्रक्रियेतंतर्गत करण्यात आली आहे.सातबारा उता-यामधील दुरूस्तीसाठी गाव पातळीवर उता-यांचे चावडी वाचन करण्यात आले होते. तसेच सक्षम अधिका-याकडे अर्ज करून उता-यातील दुरूस्तीसाठी वेळ देण्यात आला होता.मात्र,तरीही अनेक शेतक-यांच्या सातबारा उता-यात काही तृटी दिसून येत होत्या. त्यामुळे महसूल विभागातर्फे दुरूस्तीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार १५ हजार ६९० गावांचे दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कलम १५५ नुसार ९ लाख ३९ हजार सातबारा उता-यांच्या दुरूस्ती तलाठी यांनी प्रस्तावित केल्या असून त्यातील 5 लाख 94 हजार उता-यांची दुरूस्ती तहसिलदारांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ मे २०१८ रोजी नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार आत्तापर्यंत ४५ लाख ५३ हजार डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उता-यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील १३ लाख ८७ हजार नागरिकांनी डिजिटल उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत.शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या दुर्लक्षामुळे शासनाच्या या महत्त्वकाक्षी प्रकल्पाचा दीड ते दोन महिन्यांचा कालावधी विनाकारण वाया गेला.सर्व्हरची क्षमता कमी असल्यामुळे डिजिटल सातबारा उता-याचे काम रखडून राहिले.त्याचप्रमाणे क्लाऊडवर जाण्याबाबतच्या शासनाच्या धोरणातही वेळोवेळी बदल झाले.त्याचा फटका या प्रकल्पालाही बसला.परिणामी लाखो नागरिकांना आणखी काही महिने डिजिटल उतारे मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.ई-फेरफार प्रक्रियेअंतर्गत नागरिकांना विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे.वर्षभरात झालेल्या कामाबाबत ई-फेरफार प्रकल्पाचा समन्वयक म्हणून मी समाधानी आहे.परंतु,अजूनही बरेच काम बाकी आहे.चावडी वाचन, ई-पिकपहाणी आदी उपक्रम सुरू केले आहेत.

- रामदास जगताप,ई-फेरफार प्रकल्प,राज्य समन्वयक 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारdigitalडिजिटल