शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

FRP पेक्षा टनाला चारशे रुपये जास्त द्या, अन्यथा गाळप हंगाम बंद पाडू; राजू शेट्टी यांचा इशारा

By नितीन चौधरी | Updated: September 15, 2023 17:25 IST

यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा चारशे रुपये टनाला जास्त दर दिल्याशिवाय गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला...

पुणे : राज्यातील साखर कारखाने इथेनॉलकडे साखर वळवत असल्यामुळे त्याच्या विक्रीतून कारखान्यांना मोठा फायदा होतोय. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना लाभ दिला जात नाही. परिणामी, शेतकऱ्यांची अडवणूकच होत आहे. यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा चारशे रुपये टनाला जास्त दर दिल्याशिवाय गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साखर कारखाने दरवर्षी एक ते अडीच टक्के साखर उतारा इथेनॉलकडे वळवत आहेत. यातून कारखान्यांना किमान ७०० रुपयांचा फायदा होत आहे. मात्र, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्याचप्रमाणे केंद्र सरकार इथेनॉल केवळ पन्नास रुपये लिटर या दरानेच खरेदी करत आहे. प्रत्यक्षात ग्राहकांना पेट्रोल १०५ रुपयांनी मिळते. शेतकऱ्यांना लाभ मात्र केवळ पन्नास रुपयेच आहे. त्यामुळे एफआरपी ठरविताना किमान चारशे रुपये जास्त दिल्याशिवाय यंदाचा साखर आणि सुरू होऊ देणार नाही, असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने राज्यातील साखर कारखानदारीवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील ४० टक्के ऊस उत्पादन विहिरी व कालव्यांवर अवलंबून आहे. परतीचा मान्सून न आल्यास याचा थेट परिणाम उत्पादनावर होईल. दुष्काळसदृश परिस्थिती असली तरी राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोपही शेट्टी यांनी यावेळी केला.

कारखाने बंद करण्याचा इशारा मी चार महिन्यांपूर्वी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. त्यामुळे सरकारने ते गांभीर्याने घ्यायला हवे. ऊस हंगामाच्या तोंडावरच शेट्टी आंदोलने करतात, असा आरोप होत असतो. मात्र, सरकारला यावेळी पुरेसा वेळ दिलेला आहे, असे स्पष्टीकरणही शेट्टी यांनी यावेळी दिले.

इथेनॉलच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांना योग्य तो परतावा मिळवा, या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री व अन्नपुरवठामंत्री पियूष गोयल यांच्याशी गेल्या महिन्यात नवी दिल्लीत सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्याबाबतही केंद्र सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र