शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीचा जागर

By admin | Updated: October 2, 2015 00:52 IST

गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा.

पिंपरी : गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांमध्ये देशभक्ती वाढविण्यासाठी, प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या पद्धतीने अभिवादन करावे, असे आवाहन निवृत्त भारतीय सैनिकांनी केले. देशसुरक्षेसाठी जवानांसोबत नागरिकांची जबाबदारी असल्याचे भान त्यांनी करून दिले. ‘शौर्या तुला वंदितो’ या देशभक्तीचा जागर कार्यक्रमात १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या ५० सैनिक आणि अधिकाऱ्यांचा हृद्य सत्कार सोहळ्यात निवृत्त जवानांनी नागरिकांना संदेश दिला. सह्याद्री प्रतिष्ठान, राष्ट्रीय सैनिक संस्था व मार्शल कॅडेट फोर्स च्या वतीने संत आचार्य अत्रे रंगमंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला. डोक्यावर केशरी रंगाचा फेटा, छातीवर लावलेली असंख्य लष्करी पदके, चेहऱ्यावर उल्हसित करणारे तेज ७२ ते ९६ वर्षांच्या या निवृत्त जवानांच्या चेहऱ्यावर झळकत होते. मार्शल कॅडेट फोर्सच्या विद्यार्थ्यांनी लष्करी शिस्तीत प्रत्येकाचे स्वागत केले. राजपुताना रायफल बॅँगपाईप बॅण्डपथकाच्या वादनात अमर जवान ज्योतीस मानवंदना दिल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रौप्यपदक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल तेजेंद्रपाल त्यागी म्हणाले, ‘‘कोणी भेटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन केले जाते. ही पद्धत बदलून सर्वांनी अभिवादन करताना ‘जयहिंद’ म्हणावे. त्यामुळे देशभक्ती वाढीस लागेल. शहिदांचा सन्मान केला गेल्याने राष्ट्र निर्माणास चालना मिळणार आहे.’’ त्यागी, निवृत्त कॅप्टन जयंत सरंजामे आणि निवृत्त ब्रिगेडीअर दिवाकर परांजपे यांनी १९६५ च्या युद्धाची माहिती दिली. कोणत्या परिस्थितीत कामगिरी फत्ते केली याची जाणीव करून दिली. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘‘पाकिस्तानसोबत तीन युद्धे झाली आहेत. त्यात त्यांना धडा शिकविला, तरीही त्याची वळवळ कायम आहे. या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने छुप्या आणि अतिरेकी हल्ल्यात अधिक सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तानचे कंबरडेच मोडण्यासाठी सध्याचे भारतीय सैनिक सक्षम आहेत. पंतप्रधानांनी तशी परवानगी द्यावी. पलीकडील सीमेपर्यंत जाऊन सर्व प्रदेश काबीज करण्याची क्षमता सैनिकांमध्ये आहे. आता आरपारच्या युद्धाची गरज आहे.’’ लष्करामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. ’’या वेळी निवृत्त एअर कमांडर सुरेंद्र त्यागी, आमदार महेश लांडगे, नितीन बानगुडे, विकास काने, कैलास लबडे, नगरसेवक महेश चांदगुडे, सुजाता पलांडे आदी उपस्थित होते. ओमप्रकाश पेठे यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)