शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

देशभक्तीचा जागर

By admin | Updated: October 2, 2015 00:52 IST

गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा.

पिंपरी : गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांमध्ये देशभक्ती वाढविण्यासाठी, प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या पद्धतीने अभिवादन करावे, असे आवाहन निवृत्त भारतीय सैनिकांनी केले. देशसुरक्षेसाठी जवानांसोबत नागरिकांची जबाबदारी असल्याचे भान त्यांनी करून दिले. ‘शौर्या तुला वंदितो’ या देशभक्तीचा जागर कार्यक्रमात १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या ५० सैनिक आणि अधिकाऱ्यांचा हृद्य सत्कार सोहळ्यात निवृत्त जवानांनी नागरिकांना संदेश दिला. सह्याद्री प्रतिष्ठान, राष्ट्रीय सैनिक संस्था व मार्शल कॅडेट फोर्स च्या वतीने संत आचार्य अत्रे रंगमंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला. डोक्यावर केशरी रंगाचा फेटा, छातीवर लावलेली असंख्य लष्करी पदके, चेहऱ्यावर उल्हसित करणारे तेज ७२ ते ९६ वर्षांच्या या निवृत्त जवानांच्या चेहऱ्यावर झळकत होते. मार्शल कॅडेट फोर्सच्या विद्यार्थ्यांनी लष्करी शिस्तीत प्रत्येकाचे स्वागत केले. राजपुताना रायफल बॅँगपाईप बॅण्डपथकाच्या वादनात अमर जवान ज्योतीस मानवंदना दिल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रौप्यपदक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल तेजेंद्रपाल त्यागी म्हणाले, ‘‘कोणी भेटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन केले जाते. ही पद्धत बदलून सर्वांनी अभिवादन करताना ‘जयहिंद’ म्हणावे. त्यामुळे देशभक्ती वाढीस लागेल. शहिदांचा सन्मान केला गेल्याने राष्ट्र निर्माणास चालना मिळणार आहे.’’ त्यागी, निवृत्त कॅप्टन जयंत सरंजामे आणि निवृत्त ब्रिगेडीअर दिवाकर परांजपे यांनी १९६५ च्या युद्धाची माहिती दिली. कोणत्या परिस्थितीत कामगिरी फत्ते केली याची जाणीव करून दिली. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘‘पाकिस्तानसोबत तीन युद्धे झाली आहेत. त्यात त्यांना धडा शिकविला, तरीही त्याची वळवळ कायम आहे. या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने छुप्या आणि अतिरेकी हल्ल्यात अधिक सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तानचे कंबरडेच मोडण्यासाठी सध्याचे भारतीय सैनिक सक्षम आहेत. पंतप्रधानांनी तशी परवानगी द्यावी. पलीकडील सीमेपर्यंत जाऊन सर्व प्रदेश काबीज करण्याची क्षमता सैनिकांमध्ये आहे. आता आरपारच्या युद्धाची गरज आहे.’’ लष्करामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. ’’या वेळी निवृत्त एअर कमांडर सुरेंद्र त्यागी, आमदार महेश लांडगे, नितीन बानगुडे, विकास काने, कैलास लबडे, नगरसेवक महेश चांदगुडे, सुजाता पलांडे आदी उपस्थित होते. ओमप्रकाश पेठे यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)