शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

पठ्ठे बापूरावांचे वस्तुनिष्ठ चरित्रलेखन आवश्यक, मान्यवरांची अपेक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:51 IST

शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे.

पुणे - शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले गेले पाहिजे अशी अपेक्षा ‘पठ्ठे बापूराव व्यक्ती आणि वाङमय’ याविषयावर आयोजित चर्चासत्रात मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी यांच्या वतीने तसेच ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोककलांचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर होवाळ, सोपान खुडे यांनी सहभाग घेतला. या वेळी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे मिलिंद लेले आणि ललित कला केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी भूषविले.सोपानराव खुडे यांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांचा १८६६ ते १९४५ चा कालखंड उलगडला. ते म्हणाले, समकालीन तमाशा कालावंतांबरोबर शाहीर पठ्ठे बापूराव यांचे मतभेद झाले. समकालीन लोकांवर त्यांनी लावणी / गवळण लिहिली. एक गण रचून कलगी पक्षाचा उल्लेख चांगला पण तुरे याचा वाईट अशा प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. या गणातून समकालीन तमाशा कलावंतांची नावे कळतात ही त्या लेखनाची जमेची बाजू आहे. आजच्या काळात पठ्ठे बापूरावांचे साहित्य संकलित करण्याची गरज आहे. प्रभाकर होवाळ म्हणाले, शाहीर पठ्ठे बापूराव हे नाव सांस्कृतिक क्षेत्रात अजरामर आहे. तमाशाची मशाल त्यांनी सर्वत्र पेटविली. त्यांची सांस्कृतिक उंची मोठी आहे. पण त्यांना उपेक्षित ठेवले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे स्वछंदी होते. आज लिहिलेली लावणी आणि मिळालेला पैसा आजच खर्च करायचा असा त्यांचा स्वभाव होता. तमाशा कलावंत त्यांच्या नावाचा जागर करतात. त्यांच्यासारखा शाहीर महाराष्ट्रात दुसरा होणे नाही.डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी तुकोबासारखा लढा दिला. तुकाराम, पठ्ठे बापूराव व नामदेव ढसाळ यांच्यात समानसूत्र दिसते त्यांनी त्यांचे आत्मकथन काव्यातून मांडले. मी व्युत्पन्न ब्राह्मण घरातले अग्निहोत्र सोडले. वेशीबाहेर गेलो. अस्पृश्यांबरोबर राहिलो, त्यांच्या जगण्याला अर्थ दिला. माझ्या जगण्याला अर्थ मिळाला आणि मी शेवटी अर्थहीन झालो असे ते म्हणायचे. काळ कुठलाही असो काळाच्या कसोटीवर संत, पंत टिकतात आणि त्यांचे वाङ्मय अक्षर होते, त्यातले चिंतन त्रिकालाबाधित आणि सर्वसमावेश असते. लोककलावंतांना त्यांच्या गवळणी पाठ आहेत पण अर्थ माहिती नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.पुणेकरांना लावले९ सारखा पाढा शोधण्याचे वेडतमाशातील कलगी-तुरा सामन्यात तुरेवाल्यांना कलगी पक्षाकडून शाहीर पठ्ठे बापूरावांनी ९ सारखा पाढा कोणता? असे विचारले. त्यासाठी २४ तास दिले. त्या वेळी पुण्यातले सगळे जण पाढा करायला बसले होते. कुणालाच जमले नाही. मग दुसऱ्या दिवशी उत्तर ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तमाशा कलावंत दगडू साळी समोर बसले होते. ते उभे राहून म्हणाले मला येतय उत्तर! ९0 चा पाढा आहे. त्याची बेरीज केली तरी ९ च येते आणि उत्तर सापडले. असा किस्सा सोपान खुडे यांनी सांगितला.अध्यक्षीय भाषणात विश्वनाथ शिंदे म्हणाले, पठ्ठे बापूराव यांचे चरित्र निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहत असताना त्यांचे वास्तव जीवन सांगण्यापेक्षा त्यांच्याभोवती अदभुत वलय निर्माण करून लेखनाची मांडणी केली आहे. त्यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले जायला हवे. चर्चासत्रानंतर ‘पंचरंगी पठ्ठे बापूराव’ हा विशेष कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक