शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

पठ्ठे बापूरावांचे वस्तुनिष्ठ चरित्रलेखन आवश्यक, मान्यवरांची अपेक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:51 IST

शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे.

पुणे - शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले गेले पाहिजे अशी अपेक्षा ‘पठ्ठे बापूराव व्यक्ती आणि वाङमय’ याविषयावर आयोजित चर्चासत्रात मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी यांच्या वतीने तसेच ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोककलांचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर होवाळ, सोपान खुडे यांनी सहभाग घेतला. या वेळी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे मिलिंद लेले आणि ललित कला केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी भूषविले.सोपानराव खुडे यांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांचा १८६६ ते १९४५ चा कालखंड उलगडला. ते म्हणाले, समकालीन तमाशा कालावंतांबरोबर शाहीर पठ्ठे बापूराव यांचे मतभेद झाले. समकालीन लोकांवर त्यांनी लावणी / गवळण लिहिली. एक गण रचून कलगी पक्षाचा उल्लेख चांगला पण तुरे याचा वाईट अशा प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. या गणातून समकालीन तमाशा कलावंतांची नावे कळतात ही त्या लेखनाची जमेची बाजू आहे. आजच्या काळात पठ्ठे बापूरावांचे साहित्य संकलित करण्याची गरज आहे. प्रभाकर होवाळ म्हणाले, शाहीर पठ्ठे बापूराव हे नाव सांस्कृतिक क्षेत्रात अजरामर आहे. तमाशाची मशाल त्यांनी सर्वत्र पेटविली. त्यांची सांस्कृतिक उंची मोठी आहे. पण त्यांना उपेक्षित ठेवले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे स्वछंदी होते. आज लिहिलेली लावणी आणि मिळालेला पैसा आजच खर्च करायचा असा त्यांचा स्वभाव होता. तमाशा कलावंत त्यांच्या नावाचा जागर करतात. त्यांच्यासारखा शाहीर महाराष्ट्रात दुसरा होणे नाही.डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी तुकोबासारखा लढा दिला. तुकाराम, पठ्ठे बापूराव व नामदेव ढसाळ यांच्यात समानसूत्र दिसते त्यांनी त्यांचे आत्मकथन काव्यातून मांडले. मी व्युत्पन्न ब्राह्मण घरातले अग्निहोत्र सोडले. वेशीबाहेर गेलो. अस्पृश्यांबरोबर राहिलो, त्यांच्या जगण्याला अर्थ दिला. माझ्या जगण्याला अर्थ मिळाला आणि मी शेवटी अर्थहीन झालो असे ते म्हणायचे. काळ कुठलाही असो काळाच्या कसोटीवर संत, पंत टिकतात आणि त्यांचे वाङ्मय अक्षर होते, त्यातले चिंतन त्रिकालाबाधित आणि सर्वसमावेश असते. लोककलावंतांना त्यांच्या गवळणी पाठ आहेत पण अर्थ माहिती नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.पुणेकरांना लावले९ सारखा पाढा शोधण्याचे वेडतमाशातील कलगी-तुरा सामन्यात तुरेवाल्यांना कलगी पक्षाकडून शाहीर पठ्ठे बापूरावांनी ९ सारखा पाढा कोणता? असे विचारले. त्यासाठी २४ तास दिले. त्या वेळी पुण्यातले सगळे जण पाढा करायला बसले होते. कुणालाच जमले नाही. मग दुसऱ्या दिवशी उत्तर ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तमाशा कलावंत दगडू साळी समोर बसले होते. ते उभे राहून म्हणाले मला येतय उत्तर! ९0 चा पाढा आहे. त्याची बेरीज केली तरी ९ च येते आणि उत्तर सापडले. असा किस्सा सोपान खुडे यांनी सांगितला.अध्यक्षीय भाषणात विश्वनाथ शिंदे म्हणाले, पठ्ठे बापूराव यांचे चरित्र निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहत असताना त्यांचे वास्तव जीवन सांगण्यापेक्षा त्यांच्याभोवती अदभुत वलय निर्माण करून लेखनाची मांडणी केली आहे. त्यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले जायला हवे. चर्चासत्रानंतर ‘पंचरंगी पठ्ठे बापूराव’ हा विशेष कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक