शहरं
Join us  
Trending Stories
1
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
2
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
3
हनुमानगढमध्ये मोठा हिंसाचार! इथेनॉल फॅक्टरीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा उद्रेक; १६ वाहनांना आग, काँग्रेसचे आमदार जखमी
4
दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी पडघ्यातील बोरिवली गावात रात्रभर ED, ATS ची छापेमारी
5
Sovereign Gold Bond: ₹२,९५४ च्या गुंतवणूकीवर ₹१२,८०१ चा रिटर्न; गुंतवणूकदारांना कुठे मिळतोय ४ पट पैसा, जाणून घ्या
6
‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी
7
टॅरिफ वॉरचे नवे संकट! आधी अमेरिका, आता मेक्सिकोचा ५०% टॅरिफ हल्ला; भारत-चीनसह अनेक देशांना मोठा झटका
8
६ वर्षांतील सर्वात मोठे मतभेद! फेडरल रिझर्व्हमध्येच धोरणांवर एकमत नाही; व्याजदरात कपात केली पण...
9
सार्वजनिक हिताचा विचार करूनच होर्डिंग्जचे निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा जाहिरातदारांना परवाना शुल्कात दिलासा देण्यास नकार
10
मोठी बातमी! थायलंड पोलिसांनी लूथरा बंधूंना फुकेतमध्ये पकडले; भारतात आणले जाणार...
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, IT आणि मेटल शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
'डॉ. शिरीष वळसंगकर यांना आयुष्य संपवण्यापूर्वी 'पी राऊत' नावाच्या महिलेचे दहा कॉल', कोर्टात काय घडलं?
13
मोठी बातमी! गोवा आग दुर्घटनेनंतर देश सोडून पळणाऱ्या लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित
14
US Seizes Oil Tanker: हेलिकॉप्टरमधून उतरले आणि तेलाचे जहाज केले जप्त, व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर अमेरिकेची मोठी लष्करी कारवाई
15
Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं!
16
क्लब जळत होता, लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते अन् लुथरा बंधु थायलंडचं तिकीट बुक करत होते! 
17
अनिल अंबानी समूहाच्या कंपनीवर ईडीची मोठी कारवाई, १३ बँक खाती गोठवली; कोणते आहेत आरोप?
18
Your Money, Your Right: पीएम मोदींच्या आवाहनानं उघडू शकतं तुमचं नशीब; काय आहे हे आणि कसा होऊ शकतो फायदा?
19
लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा उलगडा; तिने इंजिनियर जोडीदाराला का संपवलं? म्हणाली, "तो माझ्या मुलींना.."
20
महायुतीचा फॉर्म्युला ठरला! मुंबईत शिंदेसेनेला 'इतक्या' जागा हव्यात, पुण्यात BJP-NCP वेगळं लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष सज्ज! आता पुन्हा खर्च करायचा का? इच्छुकांचा सवाल

By राजू इनामदार | Updated: December 17, 2024 19:23 IST

सर्वच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार या खात्रीने किमान २ वेळा बराच खर्च झाला व तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे

पुणे: लोकसभा झाली, विधानसभा झाली, नवे सरकार सत्तारूढ झाले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार असे गृहित धरून राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत, मात्र निवडणूक लढू इच्छिणारे त्याबाबतीत साशंक आहेत. याआधी सर्वच इच्छुकांचा लवकरच निवडणूक होणार या खात्रीने किमान दोन वेळा बराच खर्च झाला व तो फुकट गेला, मग आता पुन्हा खर्च करायचा का? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. माजी पदाधिकाऱ्यांनाही निवडणूक होईलच याची खात्री नसल्याचे दिसते आहे.

न्यायालयात याचिका

प्रभाग रचना, किती नगरसेवकांचा प्रभाग, राखीव जागांसाठीच्या जनगणनेचा अभाव यासंबधी न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. खुद्द न्यायालयानेही जनगणनेबाबत आकडेवारीच नाही तर, मग राखीव प्रभाग निश्चित कसे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा अनेक कारणांनी राज्यात फक्त महापालिकाच नाही तर नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती यांच्या निवडणूका मागील २ ते अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत. पुण्यातही पुणे व पिंपरी-चिंचवड या अ वर्ग महापालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुक झाली, त्याचे निकाल लागले, त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक झाली, त्याचे निकाल लागले. दोन्हीकडे नवे सरकार सत्तारूढही झाले. त्यामुळेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे.

किती वेळा खर्च करायचा?

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होतील असे जाहीर केले. त्यातूनच या निवडणुकांची चर्चा सुरू झाली. सर्वच पक्षांमध्ये स्थानिक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची बरीच मोठी संख्या आहे. निवडणूक होणार म्हणून याआधीच त्यांचा बराच खर्च करून झाला. प्रभागात फ्लेक्स लावणे, दिवाळी, दसरा यासाठी मतदारांना भेट देणे, त्यांच्यासाठी तीर्थयात्रांच्या सहली, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे याचा खर्चात समावेश आहे. हा खर्च केल्यानंतरही निवडणूक रखडलेलीच राहिली. त्यामुळे आता नव्याने निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यानंतर खर्च करावा की नाही? अशा मनस्थितीत हे इच्छुक सापडले आहेत.

माजी पदाधिकारीही साशंक

ज्यांची उमेदवारी पक्की समजली जाते, असे माजी पदाधिकारीही निवडणुक होणार की नाही याबद्दल साशंक आहेत. काहींनी सांगितले की जनगणनेचा विषय सरकारच्या आधिन आहे. जोपर्यंत जातनिहाय गणना होत नाही तोपर्यंत कोणत्या प्रभागात आरक्षण टाकायचे याचाही निर्णय होत नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरून चालणार नाही. कारण त्यानंतरच्या १२ वर्षात लोकसंख्येत अनेक बदल झाले आहेत. त्याशिवाय आरक्षण बदलावे लागते, त्यालाही जनगणनेचा आधार लागतो. प्रामुख्याने याच कारणावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

आघाडी की स्वतंत्रपणे?

या निवडणूका लोकसभा विधानसभेप्रमाणे महायुती, महाविकास आघाडी अशा एकत्रित लढल्या जातील की स्वतंत्रपणे याबद्दलही अजून कसली निश्चिती नाही. लोकसभा निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेचच स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार असे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आमची दोन्हींसाठी तयारी आहे असे वक्तव्य केले आहे. दोन्ही शिवसेनांची भूमिका त्यांच्या नेत्यांवर अवलंबून आहे व ते याबाबतीत काहीही बोलायला तयार नाही. विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राज्यात अंतर्गत दुफळी वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केंद्रांकडून कारवाई केली जाणार असे बोलले जात आहे, तर स्वत: पटोले यांनी मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करावे अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. हीच गटबाजी स्थानिक स्तरावरही झिरपली आहे.

न्यायालयातील याचिकांच्या संदर्भात राज्य सरकारकडून काही हालचाल होत नाही तोपर्यंत त्याचा निकाल प्रलंबितच राहण्याची शक्यता आहे. नवे राज्य सरकार अशी काही हालचाल करेल असे काही इच्छुकांना वाटते.

 

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024Votingमतदानgram panchayatग्राम पंचायतZP Electionजिल्हा परिषद