शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नोटाबंदी हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय- रत्नाकर महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 08:22 IST

नोटाबंदी जनतेवर लादली असून, हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय आहे.

पुणे - नोटाबंदी जनतेवर लादली असून, हा अर्धवट मेंदूने घेतलेला अर्धवट निर्णय आहे. मोठ्या चलनामुळे भ्रष्टाचार वाढतो, मग दोन हजारांच्या नोटांनी तो सोपा होतो का? याचे उत्तर प्रधानप्रचारक आणि प्रचारकांच्या टोळ्यांनी अद्यापही दिलेले नाही. या निर्णयामुळे अर्थरचना आणि समाजाच्या सामूहिक मानसिकतेचे वाटोळे झाले, त्याचे काय? मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मीच अर्थमंत्री, मीच गव्हर्नर, मीच ब्रँच मॅनेजर, मीच झोनल ऑफिसर सगळं मीच आहे, असे चालले आहे. हे असे का? हे विचारायचीदेखील चोरी आहे. देश एका अराजकीय परिस्थितीच्या कात्रीत सापडला असल्याने ‘असा पंतप्रधान पुन्हा न होवो’ अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला उद्या (बुधवारी) वर्षपूर्ती होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला नोटाबंदी निषेध पुणेच्या वतीने ‘नोटाबंदी : दावे की कावे’ या विषयावर नागरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. विश्वंभर चौधरी, तसेच अर्थतज्ज्ञ अभय टिळक, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आणि सहयोग ट्रस्टचे अ‍ॅड. असीम सरोदे उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, मोदींनी नोटाबंदीद्वारे चलनव्यवहारातून काही पैसा काढून घेतला. मोठ्या चलनामुळे भ्रष्टाचार वाढतो, असे भासवून नोटाबंदीचे समर्थन केले गेले. मग २००० रुपयांच्या नोटा का आणल्या? त्याने भ्रष्टाचार अधिक सोपा होतो का? पण याचे उत्तर प्रधानप्रचारकांच्या टोळीने दिले नाही. हा निर्णय घेण्याआधी मोदींनी मंत्रिमंडळाला एका खोलीत बोलावले आणि बाहेरून कुलूप लावले, मग त्यांनी एकट्याने हा निर्णय जाहीर केला. सगळं ‘मीच’ करणार अशी वृत्ती असेल तर स्वायत्ततेच्या गप्पा कशासाठी? हे असे का होते, हेदेखील विचारायची चोरी आहे. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करता येणार नाही.

अभय टिळक म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि अर्थ यांच्यात सनातन द्वंद्व आहे. राजकारणासाठी हा निर्णय योग्य असला, तरी अर्थकारणासाठी वेळ चुकीची होती. अर्थकारण हे व्यवहारात राजकारणाचा हात धरून उतरते. मात्र, इथे राजकारणाच्या सोयीसाठी अर्थकारणाला बळी दिले. प्रत्येक स्तरातील व्यक्तीचे एक अर्थकारण असते. सुगीच्या वेळेस नोटाबंदी झाल्याने शेतीचे कंबरडे मोडले गेले. नोटाबंदी, जीएसटीने विकासदरावर परिणाम झाला. क्रोनी कॅपिटलायजेशनचा नवा चेहरा दिसू लागला. रिझर्व्ह बँकेच्या स्वायतत्तेचा संकोच झाला, ही ऱ्हास पर्वाची चुणूक असल्याचा इशारा त्यांनी दिला.

अजित अभ्यंकर म्हणाले की, हा नोटाबंदी निर्णय फसला यात शंका नाही. मात्र, काळ्या पैशाची समस्या फक्त पंतप्रधानांच्या हाती देण्याइतकी किरकोळ नाही. जनतेने या बेकायदेशीर उत्पन्नाविरुद्ध क्रांतिकारक लढाई केली पाहिजे. बँकांमध्ये आलेला पैसा काळा नाही, हे सरकारलाच सिद्ध करावे लागणार आहे. म्हणून नोटाबंदी हा कावा होता असे म्हणावे लागते. सोन्याची आयात या वर्षात दुप्पट झाली. सोने कोणी घेतले, बेनामी प्रॉपर्टी कोणी घेतल्या याची श्वेतपत्रिका आणा. नोटा मोजायला वेळ का लागला ? खोट्या नोटांची समस्या संपली नाही. बेहिशेबी पैशाच्या समस्येविरुद्ध लढण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले की,नोटाबंदीच्या निर्णयानंतर किती सराफी व्यावसायिकांवर कारवाई झाली? काळा पैसा पांढरा होताना कमिशन कोणाकडे गेले? कोणत्या पक्षाने जमिनी खरेदी केल्या, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. कार्यक्रमानंतर सेनापती बापट यांच्या पुतळ्यासमोर १२० मेणबत्त्या लावून नोटाबंदी रांगांमध्ये मृत पावलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

टॅग्स :Note BanनोटाबंदीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस