शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

पालकांवर होणार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: April 29, 2017 16:02 IST

मुलांची हौस ठरणार डोकेदूखी : परिक्षेत्रात ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई : विश्वास नांगरे-पाटील

 लोकमत आॅनलाईन

कोल्हापूर, दि. २९ : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना मिळाल्यास दंड होईलचं. त्याशिवाय त्यांच्याकडून कोणास दूखापत होवून मृत्यू झाल्यास पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी दिली.

दरम्यान परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई करुन १ कोटी १० लाख ३१ हजार १२० रुपये दंड वसुल केला. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिस प्रशासनाने दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसांत ही मोहिम राबवली आहे. प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे.

वाहनांची संख्या वाढल्याने पाचही जिल्ह्यातील शहरासह इतर पर्यटनस्थळी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले होते. पाच जिल्ह्यातील वाहतुक समस्येचा आढावा स्वत: सायकल वरुन फिरुन घेतला. गेल्या वतीन वर्षात अपघाती मृतांची संख्या जास्त आहे. अपघात होऊ नयेत, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यात मोटर व्हेईकल अ‍ॅक्टनुसार नियमबाह्य वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश १४३ पोलिस ठाण्यांना दिले.

दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसात सकाळी नऊच्या सुमारास पोलिस रस्त्यावर उतरले. चौका-चौकांत प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहने तपासली गेली. यावेळी परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली.

कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या वाहनचालकांना जाग्यावर २०० ते ५०० रुपये दंडाची पावती दिली गेली. बहुतांशी पाच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसणाऱ्यांवर कारवाई झाली. ही कारवाई येथून पुढे आठवड्यातील कोणत्याही दोन दिवस निवडून केली जाणार आहे. परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहनांची रहदारी वाढल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग नसतानाही वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकाला समोरच्या वाहनाला ओलांडून जाताना अपघाताला सामोरे जावे लागते. शासकीय कर्मचारी असो, किंवा महाविद्यालयीन तरुण वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ही त्यांची ‘स्टाईल’च बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.अज्ञान मुलांच्या हातात दूचाकी देवून अनेक पादचाऱ्यांचे जिव धोक्यात आले आहेत. त्यासाठी आता मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या मुलांच्या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

चालकांची तपासणी पूणे-बेंगलोर महामार्गावर ट्रक चालक मद्यपान, नशेली पदार्थ घेवून वाहने चालवित असतात. त्यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करुन प्रत्येक वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे.

पाच जिल्ह्यांतील वर्षभरातील अपघाती मृतांची संखा

२०१५-२७८८

२०१६-२८३०

२०१७-६३९ (३१ मार्च अखेर)

 

जिल्हा      केसेस      दंड

 

कोल्हापूर    १२०३१        २४४८०००

सांगली        ८५१५         १७२४१००

सातारा          ७०३१       १५९५६००

सोलापूर ग्रामीण ९२०४     १६१२९२०

पुणे ग्रामीण  १३५९८        ३६५०५००