शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील कुंभारगावावर पॅराग्लायडर्सने पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:45 IST

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी १ एप्रिल १९४३ मध्ये ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंट स्थापन करण्यात आली.

ठळक मुद्दे१ एप्रिल २०१८ रोजी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात कुंभारगाव येथे करण्यात आली. अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये धाडस निर्माण होऊन या सेवेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी होणार आहे.

भिगवण : भारतीय सैन्य दलातील ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंटच्या सैनिकांनी इंदापूर तालुक्यातील कुंभारगावमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पॅराग्लायडिंग केले. या वेळी जवानांनी अवकाशात हवाई उड्डाण करत कुंभारगावावर पुष्पवृष्टी करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी १ एप्रिल १९४३ मध्ये ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंट स्थापन करण्यात आली. १ एप्रिल २०१८ रोजी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात कुंभारगाव येथे करण्यात आली. ७५ वर्षांचा इतिहास असणाऱ्या या रेजिमेंटच्या जवानांनी कुंभारगाव येथे भीमा नदीच्या जलाशयाशेजारी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी पॅराग्लायडिंग कसे असते, याविषयी शाळकरी मुलांसह अनेकांना उत्सुकता होती. त्यामुळे हे जवान आकाशात उड्डाण कसे करतात, याकडे बारकाईने लक्ष देऊन होते. सकाळी नऊच्या सुमारास या मोहिमेला सुरुवात झाली. ९ पॅराशूट फिल्डच्या २ जवानांनी अवकाशात उड्डाण घेतले अन् शाळकरी मुलांनी एकच जल्लोष केला. अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये धाडस निर्माण होऊन या सेवेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी होणार आहे. या अभियानामध्ये भारतीय सेनेचे निवृत्त अधिकारी प्रकाश नेरुरकर, वसंत पाटील, कर्नल रमेश आपटे  यांच्यासह २० जवान सहभागी झाले आहेत. या अभियानाचे नेतृत्व बिकेश चौहान, मेजर राहुल शर्मा, हवालदार अमरितपाल, चंद्रकांत महाडिक, रामशेट आदी सहभागी झाले आहेत. कुंभारगाव येथून या मोहिमेला सुरुवात झाली असून आग्रा येथे याची सांगता होणार आहे.  ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंटचे पॅरामीटर पायलट या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. हे धाडसी कार्य  भारतीय सेनेच्या आर्मी अ‍ॅडव्हेन्चर विंगद्वारे करण्यात येते. पॅरामीटरची ही रॅली १ हजार ४५३ किमीची असणार असून हे अंतर अवकाशातून पूर्ण केले जाणार आहे. नाशिक, धुळे, महू, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर या भागातून हे अभियान होत आहे. २० मार्च रोजी या अभियानाची सांगता आग्रा या ठिकाणी होत आहे.   - प्रकाश नेरुरकर, सेवानिवृत्त कॅप्टन 

टॅग्स :IndapurइंदापूरIndian Armyभारतीय जवान