शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

बोधकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात महाराष्ट्राला लाभलेलं प्रतिभासंपन्न राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर नाथ पै. कोकणातील वेंगुर्ले गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पंढरीनाथ ...

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात महाराष्ट्राला लाभलेलं प्रतिभासंपन्न राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर नाथ पै. कोकणातील वेंगुर्ले गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पंढरीनाथ पै यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची झलक अल्पवयातच दिसून आली. ते पुढे कायद्याचे निष्णात पंडित बनले. त्यांना महत्त्वाकांक्षा व चांगल्या-वाईटाची पारख लहान वयातच कशी होती, हे अधोरेखित करणारा हा प्रसंग.

नाथ पै एकपाठी होते. कोणत्याही गोष्टीचं आकलन त्यांना पटकन होई, पण शाळेत असताना त्यांचा गणित विषय कच्चा होता. गणितात वारंवार चुका होत. एकदा असंच गणित चुकलं म्हणून पंढरीनाथांना शिक्षकांचा खरपूस मार खावा लागला. नाथाने घरात या गोष्टीची वाच्यता केली नाही, मात्र हाता पायांवरील काळेनिळे डाग पाहून गुरुजींनी केलेली शिक्षा घरात सर्वांना समजली. नाथ घरातील शेंडेफळ असल्याने सर्वांनाच खूप वाईट वाटलं. नाथांचा वडीलभाऊ तर संतापलाच. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन गुरुजींना जाब विचारायचा, असं त्याने ठरवूनही टाकलं. नाथाला हे समजताच रात्री जेवणाच्या वेळी ते सर्वांना उद्देशून म्हणाले, "माझ्या हितासाठीच गुरुजींनी मला शिक्षा केली. माझा गणित हा कच्चा विषय सुधारावा, असं गुरुजींना मनापासून वाटतं. तुम्ही शाळेत येऊन त्यांना जाब विचारल्यास यापुढे गुरुजी मला शिक्षा करणार नाहीत. माझ्याकडे दुर्लक्ष करतील. त्यामुळे नुकसान माझंच होईल. घरातील मंडळी मला पाठीशी घालतात, असा समज होऊन स्वतःतील दोष दूर करण्यापेक्षा मी त्यांचं समर्थनच करायला लागेन. त्यामुळे कृपया गुरुजींच्या या शिक्षेकडे सर्वांनी दुर्लक्ष करावं."

गुरुजींच्या शिक्षेमुळे आपल्यातच सुधारणा होणार आहे, अशी लहान वयातच असलेली पंढरीनाथ यांची समज त्यांच्या कणखर मानसिकतेची साक्ष देणारी आहे. या वृत्तीमुळेच भविष्यात नाथ पै यांनी स्वतःमधील कच्च्या दुव्यांवर मात करीत प्रतिभासंपन्न नेता म्हणून लौकिक कमावला.

- प्रसाद भडसावळे