शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पापडी तलाव हरितपट्ट्याची महापालिकेकडून कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 02:57 IST

विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.

वसई  - विविध मोहिमा काढून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासन प्रयत्न करत असले तरी केवळ मद्यधुंद वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे घडणाऱ्या अपघाताला समोर ठेवून पापडी तलाव येतील रस्त्याच्या कडेला असणा-या वृक्षांची वसई विरार शहर महानगरपालीकेकडून कत्तल सुरु आहे.याबाबत वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात असून रस्ता रु ंदीकरण तसेच विभाजनाच्या नावाखाली सुरू असलेली पर्यावरणाची हानी भविष्याची चिंता वाढवणारी ठरत आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून ८ वर्षांपूर्वी पापडी रस्त्याचे रुंदीकरण करून अर्धवस्थेत सोडून देण्यात आले होते. तेथे आता गाड्यांची पार्किंग केली जात आहे.घडणाºया अपघातात ज्यांचा काहीच संबंध नाही अश्या वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे. रस्ता विभागला की अपघाताचे प्रकार थांबतील असा अजब अंदाज पालिका प्रशासनाकडून लावण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांची कत्तल आवश्यक आहे का? हा सवाल वृक्षप्रेमी विचारू लागले आहेत.दारुड्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला तर रस्ता विभाजनानंतर लावण्यात येणाºया डिव्हायडर तोडूनही अपघात होऊ शकतो. त्यामुळे वृक्षतोड करण्यापेक्षा वाहनांच्या गतीवर मर्यादा कशी लावता येईल याकडे जास्त भर असणे गरजेचे असल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.तोडलेली झाडे कामगारांच्या मदतीने ट्रकमध्ये भरून कुठे नेली जातात याबाबत कामगारांनाही काही सांगता येत नाही. त्यामुळे तोडलेल्या झाडांचे पुढे काय होते हे समजू शकले नाही. जेवढी झाडे तोडली जातील त्या बदल्यात दुसºया ठिकाणी झाडांचे रोपण करावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.हा अजिब न्याय...पापडी तलाव परिसरात आॅक्टोबर २०११ भल्यापहाटे विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला रिक्षासाठी उभ्या असलेल्या नागरिकांना, रिक्षा तसेच दुचाकी चालकाला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या स्कॉर्पियो चालकाने उडविले होते. त्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. मागील महिन्यात पुन्हा भल्यापहाटे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिंद्रा गाडीच्या चालकाने एका रिक्षाला उडविले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार