शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:13 IST

पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या घटक आणि संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

पुणे : सातारा येथे १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या घटक आणि संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी बैठकीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, देवीदास फुलारी, मुंबई मराठी साहित्य   संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर, छत्तीसगड मराठी साहित्य संघाचे कपूर वासनिक, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पुरुषोत्तम सप्रे, मराठी वाङ्मय परिषद बडोदाचे संजय बच्छाव, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर यांच्यासह संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महामंडळाच्या घटक, सर्व समाविष्ट तसेच संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले होते. मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

चार दिवस रंगणार सारस्वतांचा मेळा

साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारीदरम्यान असेल. साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये चार दिवस सारस्वतांचा मेळा असणार आहे. ग्रंथदिंडी उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून, त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होईल. यावर्षी पहिल्यांदाच संमेलनाच्या सर्व माजी अध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त निवडक लेखकांना तसेच महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाईल.

गेली चाळीस वर्षे साहित्याची अखंडपणे सेवा करत आहे. रसिक आणि साहित्य महामंडळाची पसंतीची पावती मिळाली, याचे समाधान आणि खूप आनंद आहे.

विश्वास पाटील