शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

केशवनगर परिसरात ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:08 IST

केशवनगर गाव चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. केशवनगर परिसर हा सहा वाॅर्डांचा बनलेला आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून ...

केशवनगर गाव चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. केशवनगर परिसर हा सहा वाॅर्डांचा बनलेला आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून अखंड केशवनगर परिसराचा पाण्याला दाब कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आता नागरिकांना करंगळीएवढेही दाबाने पाणी मिळत नाही. पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेवर पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी तर पाण्याच्या लाईनला मोटर लावल्याशिवाय पाणीच मिळत नाही. तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे अशी अवस्था केशवनगरवासीयांची झालेली आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रीया

काशीनाथ चव्हाण- वाॅर्ड क्र. ३ मध्ये ३ इंच व्यासाची पाईपलाईन आहे. त्यात जवळपास ७५ कनेक्शन आहेत. बरीचशी कनेक्शन बेकायदेशीर आहेत. त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते दखल घेत नाही. करू, बघू अशी उत्तरे देतात.

रोहिणी कालेकर- वाॅर्ड क्र.६ मध्ये २५ ते ३० मिनिटे पाणी मध्यरात्रीच्याच वेळेला सोडले जाते. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी रात्रभर जागावे लागते. येथील बिल्डरांच्या सोसायट्यांना पाणी सोडतात. पण आम्हाला पाणी सोडत नाही. पाणी येते ते पण कमी दाबानेच. त्यामुळे टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

प्रियांका झगडे- वाॅर्ड क्र.२ मध्ये मोटार लावूनही करंगळीसारखे पाणी येते. सुरुवातीला गढूळ पाणी येते. प्यायला दोन हंडेही पाणी मिळत नाही. आमच्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही. नळाला पाणी येण्यास खूप वाट पाहावी लागते.

माधवी नाईक- वॉर्ड क्र.५ मध्ये पाणी कमी दाबाने येते. पाणी आले नाही तर वारंवार वॉलमनला संपर्क साधला लागतो. आम्ही इतरांकडून ६०० रुपये देऊन पाणी विकत घेत आहे. वॉलमन म्हणतात तुमच्या नळातच प्रॉब्लेम आहे. पाणी एक तासभरच सोडा, पण पूर्ण क्षमतेने सोडा, अशी आमची मागणी आहे.

-----------चौकट-------

केशवनगर भरते १२ ते १५ कोटींचा मिळकतकर......तरीपण पाणी का मिळत नाही

केशवनगर गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे येथे मिळकतदार वाढीव दराने मिळकतकर भरीत आहे. केशवनगरमध्ये साधारण १५ हजार मिळकतदार आहेत. त्यांचा अंदाजे १२ ते १५ कोटींचा मिळकतकर महानगरपालिकेला जमा होतो. त्यातील निवासी मिळकतींना २५ टक्के व बिगरनिवासी मिळकतींना ४० टक्के पाणीपट्टी आकारली जाते. याचाच अर्थ असा की, साधारण ३ कोटींच्या आसपास केशवनगरमधून पाणीपट्टी आकारली जाते. तरीसुद्धा केशवनगरच्या एक लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येला दिवसाआड ४५ मिनिटेच पाणी का मिळते.