शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

केशवनगर परिसरात ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:08 IST

केशवनगर गाव चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. केशवनगर परिसर हा सहा वाॅर्डांचा बनलेला आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून ...

केशवनगर गाव चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. केशवनगर परिसर हा सहा वाॅर्डांचा बनलेला आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून अखंड केशवनगर परिसराचा पाण्याला दाब कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आता नागरिकांना करंगळीएवढेही दाबाने पाणी मिळत नाही. पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेवर पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी तर पाण्याच्या लाईनला मोटर लावल्याशिवाय पाणीच मिळत नाही. तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे अशी अवस्था केशवनगरवासीयांची झालेली आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रीया

काशीनाथ चव्हाण- वाॅर्ड क्र. ३ मध्ये ३ इंच व्यासाची पाईपलाईन आहे. त्यात जवळपास ७५ कनेक्शन आहेत. बरीचशी कनेक्शन बेकायदेशीर आहेत. त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते दखल घेत नाही. करू, बघू अशी उत्तरे देतात.

रोहिणी कालेकर- वाॅर्ड क्र.६ मध्ये २५ ते ३० मिनिटे पाणी मध्यरात्रीच्याच वेळेला सोडले जाते. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी रात्रभर जागावे लागते. येथील बिल्डरांच्या सोसायट्यांना पाणी सोडतात. पण आम्हाला पाणी सोडत नाही. पाणी येते ते पण कमी दाबानेच. त्यामुळे टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

प्रियांका झगडे- वाॅर्ड क्र.२ मध्ये मोटार लावूनही करंगळीसारखे पाणी येते. सुरुवातीला गढूळ पाणी येते. प्यायला दोन हंडेही पाणी मिळत नाही. आमच्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही. नळाला पाणी येण्यास खूप वाट पाहावी लागते.

माधवी नाईक- वॉर्ड क्र.५ मध्ये पाणी कमी दाबाने येते. पाणी आले नाही तर वारंवार वॉलमनला संपर्क साधला लागतो. आम्ही इतरांकडून ६०० रुपये देऊन पाणी विकत घेत आहे. वॉलमन म्हणतात तुमच्या नळातच प्रॉब्लेम आहे. पाणी एक तासभरच सोडा, पण पूर्ण क्षमतेने सोडा, अशी आमची मागणी आहे.

-----------चौकट-------

केशवनगर भरते १२ ते १५ कोटींचा मिळकतकर......तरीपण पाणी का मिळत नाही

केशवनगर गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे येथे मिळकतदार वाढीव दराने मिळकतकर भरीत आहे. केशवनगरमध्ये साधारण १५ हजार मिळकतदार आहेत. त्यांचा अंदाजे १२ ते १५ कोटींचा मिळकतकर महानगरपालिकेला जमा होतो. त्यातील निवासी मिळकतींना २५ टक्के व बिगरनिवासी मिळकतींना ४० टक्के पाणीपट्टी आकारली जाते. याचाच अर्थ असा की, साधारण ३ कोटींच्या आसपास केशवनगरमधून पाणीपट्टी आकारली जाते. तरीसुद्धा केशवनगरच्या एक लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येला दिवसाआड ४५ मिनिटेच पाणी का मिळते.