शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

केशवनगर परिसरात ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:08 IST

केशवनगर गाव चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. केशवनगर परिसर हा सहा वाॅर्डांचा बनलेला आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून ...

केशवनगर गाव चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. केशवनगर परिसर हा सहा वाॅर्डांचा बनलेला आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून अखंड केशवनगर परिसराचा पाण्याला दाब कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आता नागरिकांना करंगळीएवढेही दाबाने पाणी मिळत नाही. पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेवर पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी तर पाण्याच्या लाईनला मोटर लावल्याशिवाय पाणीच मिळत नाही. तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे अशी अवस्था केशवनगरवासीयांची झालेली आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रीया

काशीनाथ चव्हाण- वाॅर्ड क्र. ३ मध्ये ३ इंच व्यासाची पाईपलाईन आहे. त्यात जवळपास ७५ कनेक्शन आहेत. बरीचशी कनेक्शन बेकायदेशीर आहेत. त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते दखल घेत नाही. करू, बघू अशी उत्तरे देतात.

रोहिणी कालेकर- वाॅर्ड क्र.६ मध्ये २५ ते ३० मिनिटे पाणी मध्यरात्रीच्याच वेळेला सोडले जाते. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी रात्रभर जागावे लागते. येथील बिल्डरांच्या सोसायट्यांना पाणी सोडतात. पण आम्हाला पाणी सोडत नाही. पाणी येते ते पण कमी दाबानेच. त्यामुळे टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

प्रियांका झगडे- वाॅर्ड क्र.२ मध्ये मोटार लावूनही करंगळीसारखे पाणी येते. सुरुवातीला गढूळ पाणी येते. प्यायला दोन हंडेही पाणी मिळत नाही. आमच्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही. नळाला पाणी येण्यास खूप वाट पाहावी लागते.

माधवी नाईक- वॉर्ड क्र.५ मध्ये पाणी कमी दाबाने येते. पाणी आले नाही तर वारंवार वॉलमनला संपर्क साधला लागतो. आम्ही इतरांकडून ६०० रुपये देऊन पाणी विकत घेत आहे. वॉलमन म्हणतात तुमच्या नळातच प्रॉब्लेम आहे. पाणी एक तासभरच सोडा, पण पूर्ण क्षमतेने सोडा, अशी आमची मागणी आहे.

-----------चौकट-------

केशवनगर भरते १२ ते १५ कोटींचा मिळकतकर......तरीपण पाणी का मिळत नाही

केशवनगर गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे येथे मिळकतदार वाढीव दराने मिळकतकर भरीत आहे. केशवनगरमध्ये साधारण १५ हजार मिळकतदार आहेत. त्यांचा अंदाजे १२ ते १५ कोटींचा मिळकतकर महानगरपालिकेला जमा होतो. त्यातील निवासी मिळकतींना २५ टक्के व बिगरनिवासी मिळकतींना ४० टक्के पाणीपट्टी आकारली जाते. याचाच अर्थ असा की, साधारण ३ कोटींच्या आसपास केशवनगरमधून पाणीपट्टी आकारली जाते. तरीसुद्धा केशवनगरच्या एक लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येला दिवसाआड ४५ मिनिटेच पाणी का मिळते.