शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने आपली छेड काढली; त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:42 IST

एवढ्या वर्षांत भारतीय सेना आणि आतंकवादी यांचा संघर्ष होता, पण पर्यटकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो

पिंपरी : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने आता आपली छेड काढली आहे. पाकिस्तानला आता धडा शिकवलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. रामदास आठवले हे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

आठवले म्हणाले, “काश्मीरमध्ये पर्यटकांवर झाला हल्ला आहे, एवढ्या वर्षांत भारतीय सेना आणि आतंकवादी यांचा संघर्ष होत होता; पण पर्यटकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पाकिस्तानसोबत चांगले संबंध व्हावेत, असे आमची इच्छा होती, एक वर्षे चर्चाही झाली; पण पाकिस्तानच्या वतीने सतत भारतावर हल्ले होत राहिले. पाकिस्तानने आता आपली छेड काढली आहे. पाकिस्तानला आता धडा शिकवलाच पाहिजे.

आम्हाला एक मंत्रिपद द्यावं

रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाला (आरपीआय) एक विधान परिषद आणि एक मंत्रिपद द्यावं, तसेच महामंडळ, अनेक जिल्हा आणि तालुका पातळीवर पदे आहेत, ती मिळावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी आरपीआयच्या याद्या मागवल्या आहेत, अशी माहिती आठवले यांनी दिली.

महापालिका निवडणुका डिसेंबर अखेर...

आठवले म्हणाले, “महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका डिसेंबरअखेर किंवा जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक भाजपा, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार आणि आरपीआय यांनी एकत्र निवडून लढविण्याची सूचना आहे. महापालिका निवडणुकीत आरपीआयला ७ ते ८ जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे.

...तर त्यांना पर्यायी जागा द्यावी

आठवले म्हणाले, “महापालिका शहरातील धार्मिक स्थळांवर कारवाई करत आहे. मात्र, महापालिकेने त्या धार्मिक स्थळांचा अभ्यास करावा, ती धार्मिक स्थळे जर जुनी असतील, तसे त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांना संरक्षण द्यावे. सरकारच्या कामात जर या धार्मिक स्थळांची अडचण येत असेल, तर त्यांना पर्यायी जागा द्यावी. नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाRamdas Athawaleरामदास आठवलेCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर