शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पादीरवाडी झाली टँकरमुक्त

By admin | Updated: January 26, 2016 01:41 IST

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जलयुक्त शिवार योजना व लोकसहभाग यांमुळे वडगाव आनंद येथील पादीरवाडी या अवर्षणप्रवण शिवारात जुन्या

आळेफाटा : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम जलयुक्त शिवार योजना व लोकसहभाग यांमुळे वडगाव आनंद येथील पादीरवाडी या अवर्षणप्रवण शिवारात जुन्या ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. या ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांत पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचे पाणी जलवाहिनीद्वारे आणल्याने येथील सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. यामुळे एके काळी अवर्षणप्रवण असणारी पादीरवाडी टँकरमुक्त झाली आहे. जवळपास १,८०० एकर जमीन सिंचनाखाली अली असून, या पाण्याच्या जोरावर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याकडे गावाची वाटचाल सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत जुन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील अवर्षणप्रवण गावांचा समावेश करण्यात आला. याअंतर्गत विकासाच्या दृष्टीने मागासलेल्या, सतत उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होणाऱ्या व साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या पादीरवाडी या गावाची दोन वर्षांपूर्वी निवड करण्यात आली.पाणलोट समिती वडगाव आनंदच्या अध्यक्षा वैशाली देवकर, सदस्य डी. बी. वाळुंज, सचिव वैशाली देवकर, सुरेश शिंदे, नाथा पादीर यांनी पादीरवाडी ग्रामस्थांना या कार्यक्रमाची माहिती देऊन त्याचे महत्त्व पटविले. लोकवर्गणी प्रेरक प्रवेश उपक्रमांतर्गत पाणलोट निधी यांमुळे या परिसरातील बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. जलवाहिनीद्वारे कालव्यातील पाणी या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. या पाण्यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. ही कामे करताना पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या समस्या वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी तसेच ही कामे मार्गी लागावीत, यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, लताताई चौगुले, उपसरपंच सिद्धार्थ गडगे, विघ्नहरचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे, सामाजिक कार्यकर्ते अनंत चौगुले, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, तालुका कृषी अधिकारी हिरामणी शेवाळे, यांत्रिकी अभियंता कांबळे यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)जलयुक्त शिवार योजनेतही या परिसराचा समावेश करण्यात आला. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या भागातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला गती दिली. अवर्षणप्रवण परिस्थितीवर मात करण्यासाठी जुन्या ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय झाला. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांच्या मार्गदर्शनाखाली या कामांना उमेदीने सुरवात झाली. जलसंपदा विभागाची मशिनरी कृषी, महसूल व छोटे पाटबंधारे विभाग आणि लोकसहभाग यांतून पादीरवाडीच्या या ओढ्यांवर जवळपास ६० बंधारे निर्माण झाले. शेतकरी बचत गट, शेतकरी समूह यांच्या पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून आणण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे हे बंधारे भरण्यात आले.