शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

...अन्यथा ऊस, केळीचे पाणी होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 03:04 IST

ठिबक-तुषार सिंचन सक्तीचे : जलसंपत्ती प्राधिकरणाकडून २०२० ची मुदत

विशाल शिर्के पुणे : पुढील काळात पाणी बचत हाच पाणी उपलब्धतेचा महत्त्वाचा स्त्रोत ठरणार असल्याने यापुढे ऊस, केळी आणि बारमाही फळबागांना ठिबक अथवा तुषार सिंचन केल्याशिवाय सिंचनाच्या पाण्याचा थेंबही मिळणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ऑक्टोबर २०२०ची मुदत दिली आहे.

राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख हेक्टर इतके आहे. दुष्काळी म्हणविल्या जाणाऱ्या सोलापुरातही ३९ साखर कारखाने आहेत. उसाला ठिबक सिंचन सक्तीचे करुन एक तप उलटले. त्यासाठी अनुदानही दिले जाते. मात्र, ठिबक सिंचनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी उपलब्ध पाण्यावर अधिक ताण येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ नुसार बारमाही फळबागा आणि अधिक पाणी लागणाºया पिकांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या पर्यायांचा वापर केल्याशिवाय कालव्यातून पाणी दिले जाणार नाही, असे जलसंपत्ती प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

कालवे, जलमार्ग, जलवाहिन्या, नलिकाकूप आणि पाणी पुरवठ्याच्या बांधकामांना देखील हा निर्णयलागू होईल. सूक्ष्म सिंचनाची प्रणाली नसल्यास ३१ आॅक्टोबर २०२० नंतर उपसा सिंचना योजनेतून संबंधित पिकांसाठी पाणी दिले जाणार नाही. प्रणाली न उभारल्यास संबंधितांना दिलेली उपसा सिंचनची परवानगी रद्द केली जाईल, अशी अधिसूचना जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढली आहे.

राज्यातील ९ लाख हेक्टरपैकी केवळ २५ टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन झाले आहे. मराठवाडा-सोलापूर सारख्या दुष्काळी भागात वेगळे चित्र आहे. ठिबक सिंचनासाठी केंद्र-राज्य सरकारकडून अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाकडे वळले पाहिजे.- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :Waterपाणी