शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

...अन्यथा ऊस, केळीचे पाणी होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 03:04 IST

ठिबक-तुषार सिंचन सक्तीचे : जलसंपत्ती प्राधिकरणाकडून २०२० ची मुदत

विशाल शिर्के पुणे : पुढील काळात पाणी बचत हाच पाणी उपलब्धतेचा महत्त्वाचा स्त्रोत ठरणार असल्याने यापुढे ऊस, केळी आणि बारमाही फळबागांना ठिबक अथवा तुषार सिंचन केल्याशिवाय सिंचनाच्या पाण्याचा थेंबही मिळणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ऑक्टोबर २०२०ची मुदत दिली आहे.

राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख हेक्टर इतके आहे. दुष्काळी म्हणविल्या जाणाऱ्या सोलापुरातही ३९ साखर कारखाने आहेत. उसाला ठिबक सिंचन सक्तीचे करुन एक तप उलटले. त्यासाठी अनुदानही दिले जाते. मात्र, ठिबक सिंचनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी उपलब्ध पाण्यावर अधिक ताण येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ नुसार बारमाही फळबागा आणि अधिक पाणी लागणाºया पिकांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या पर्यायांचा वापर केल्याशिवाय कालव्यातून पाणी दिले जाणार नाही, असे जलसंपत्ती प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

कालवे, जलमार्ग, जलवाहिन्या, नलिकाकूप आणि पाणी पुरवठ्याच्या बांधकामांना देखील हा निर्णयलागू होईल. सूक्ष्म सिंचनाची प्रणाली नसल्यास ३१ आॅक्टोबर २०२० नंतर उपसा सिंचना योजनेतून संबंधित पिकांसाठी पाणी दिले जाणार नाही. प्रणाली न उभारल्यास संबंधितांना दिलेली उपसा सिंचनची परवानगी रद्द केली जाईल, अशी अधिसूचना जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढली आहे.

राज्यातील ९ लाख हेक्टरपैकी केवळ २५ टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन झाले आहे. मराठवाडा-सोलापूर सारख्या दुष्काळी भागात वेगळे चित्र आहे. ठिबक सिंचनासाठी केंद्र-राज्य सरकारकडून अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाकडे वळले पाहिजे.- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :Waterपाणी