शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

...अन्यथा ऊस, केळीचे पाणी होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 03:04 IST

ठिबक-तुषार सिंचन सक्तीचे : जलसंपत्ती प्राधिकरणाकडून २०२० ची मुदत

विशाल शिर्के पुणे : पुढील काळात पाणी बचत हाच पाणी उपलब्धतेचा महत्त्वाचा स्त्रोत ठरणार असल्याने यापुढे ऊस, केळी आणि बारमाही फळबागांना ठिबक अथवा तुषार सिंचन केल्याशिवाय सिंचनाच्या पाण्याचा थेंबही मिळणार नाही. त्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ऑक्टोबर २०२०ची मुदत दिली आहे.

राज्यात उसाचे क्षेत्र ९ लाख हेक्टर इतके आहे. दुष्काळी म्हणविल्या जाणाऱ्या सोलापुरातही ३९ साखर कारखाने आहेत. उसाला ठिबक सिंचन सक्तीचे करुन एक तप उलटले. त्यासाठी अनुदानही दिले जाते. मात्र, ठिबक सिंचनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी उपलब्ध पाण्यावर अधिक ताण येत आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ नुसार बारमाही फळबागा आणि अधिक पाणी लागणाºया पिकांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या पर्यायांचा वापर केल्याशिवाय कालव्यातून पाणी दिले जाणार नाही, असे जलसंपत्ती प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

कालवे, जलमार्ग, जलवाहिन्या, नलिकाकूप आणि पाणी पुरवठ्याच्या बांधकामांना देखील हा निर्णयलागू होईल. सूक्ष्म सिंचनाची प्रणाली नसल्यास ३१ आॅक्टोबर २०२० नंतर उपसा सिंचना योजनेतून संबंधित पिकांसाठी पाणी दिले जाणार नाही. प्रणाली न उभारल्यास संबंधितांना दिलेली उपसा सिंचनची परवानगी रद्द केली जाईल, अशी अधिसूचना जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढली आहे.

राज्यातील ९ लाख हेक्टरपैकी केवळ २५ टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन झाले आहे. मराठवाडा-सोलापूर सारख्या दुष्काळी भागात वेगळे चित्र आहे. ठिबक सिंचनासाठी केंद्र-राज्य सरकारकडून अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाकडे वळले पाहिजे.- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

टॅग्स :Waterपाणी