शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 18:48 IST

संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एस. टी. महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे.

ठळक मुद्देएस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पासधारकांना पास वापरता आला नाही.पासधारकांच्या मुदतवाढ परिपत्रकाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवल्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पासधारकांच्या संपकाळातील  भरपाईचा आदेश राहिला कागदावर पुणे : संपकाळात पासधारकांच्या बुडालेल्या चार दिवसांची भरपाई फेब्रुवारी महिन्यात करण्याचे एस. टी. महामंडळाने दिलेले आदेश कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. अनेक पासधारकांपर्यंत याबाबतची माहितीच न पोहचल्याने भरपाईचा कालावधी उलटून गेला आहे. प्रशासनाने लाखो पासधारकांना अंधारात ठेऊन फसवणुक केल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. मागील वर्षी ऐन दिवाळीत एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पासधारकांना चार दिवसांचा पास वापरता आला नाही. दि. १७ ते २० आॅक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत बस पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे आधीच पैसे देऊन मासिक किंवा त्रैमासिक पास घेतलेल्या प्रवाशांचे चार दिवसांचे पैसे वाया गेले होते. त्यामुळे संपकाळातील दिवसांची भरपाई मिळावी, यासाठी प्रवाशांकडून मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ही मागणी मान्य करीत एस.टी.च्या महाव्यवस्थापकांनी (वाहतुक) दि. ३० जानेवारी रोजी परिपत्रक काढून दि. २८ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत पासचा कालावधी वाढवून देण्याचे आदेश दिले होते. यासाठीचे अधिकार विभागीय वाहतूक अधिकारी किंवा आगार व्यवस्थापकांना राहतील. ही मुदतवाढ सध्या काढलेल्या पासावरच असेल. हे पत्र सर्व संबंधित तसेच वाहकांच्या निदर्शनास आणून द्यावे, असेही परिपत्रकात नमुद करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक प्रवाशांपर्यंत या मुदतवाढीबाबत माहितीच पोहचली नसल्याचे समोर आले आहे.  दररोज सासवड ते स्वारगेट एसटीने  प्रवास करणारे दत्तात्रय फडतरे हे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिपत्रकाबाबत प्रवाशांना काहीच माहिती नाही. प्रवाशांना याबाबत अंधारात ठेवल्याने सवलत मिळू शकली नाही. याबाबतची माहिती पासधारकांना सहजपणे दिसेल, अशा ठिकाणी लावणे, वृत्तपत्रांमध्ये याबाबत प्रसिध्दी देणे, सोशल मीडियावर प्रसार करणे आवश्यक होते. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांना अंधारात ठेऊन फसवणुक केली आहे. आगार प्रमुखांना याबाबत विचारले असता त्यांनी कुणाचीही तक्रार न आल्याने हे परिपत्रक लावले नाही, असे सांगितले.--------------------------मुख्यमंत्र्यांकडे तक्रार परिपत्रकाबाबत प्रवाशांना अंधारात ठेवल्याबाबत दत्तात्रय फडतरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसेच दि. २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत संपल्याने बहुतेकांना चार दिवसांची मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा हा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. ------------

     

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSwargateस्वारगेट