शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

पुणे विद्यापीठातील विचारपीठांना खीळ

By admin | Updated: April 14, 2015 01:43 IST

महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे.

पुणे : महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासह तब्बल १५ अध्यासन प्रमुखांची पदे रिक्त असल्यामुळे विचारपीठाच्या कामकाजाला खीळ बसली आहे.विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित भीमसेन जोशी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शंतनूराव किर्लोस्कर, सेठ हिराचंद नेमचंद जैन, डी. एस. सावकार, आय.एस.आर.ओ. (इस्रो) स्पेस चेअर, जैवतंत्र व जैव माहितीशास्त्र अध्यासन अशा एकूण १९ अध्यासनांची स्थापना करण्यात आली. परंतु, यातील अनेक अध्यासनांवर गेल्या काही वर्षांपासून प्रमुखांची नियुक्तीच केली गेली नाही. त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची जबाबदारी वयाच्या ७० वर्षांपर्यंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांभाळली. परंतु, दोन महिन्यांपूर्वी कसबे हे सेवानिवृृत झाल्यामुळे आंबेडकर अध्यासनाचे पद रिक्त आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुखपद रिक्त असले तरी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे हे या अध्यासनाचे समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय व स्थानिक संस्थांशी करार करून विविध कार्यशाळा तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. परंतु, अध्यासनासाठी केवळ २.५ कोटी रुपयांची तरतूद केली जात असल्यामुळे विविध कामे करण्यास मर्यादा येतात, असे मत काही अध्यासन प्रमुखांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)अध्यासनांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, अध्यासन प्रमुखांच्या कामकाजाची नियमावली तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. अध्यासनांचे कामकाज अधिक सक्षमपणे चालावे, असा प्रयत्न विद्यापीठातर्फे केला जातो. विद्यापीठ फंडातून अध्यासनांसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जातो. राज्य शासन, केंद्र शासन किंवा कोणत्याही संस्थेकडून अध्यासनांसाठी आर्थिक सहकार्य मिळत नाही.- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ृत्रुटी असल्याने अहवाल नाकारला४अध्यासनांच्या कामात सुसूत्रता कशी आणता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली होती. परंतु, या समितीने दिलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यापीठाने या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. तसेच अध्यासन प्रमुखपदाचा कार्यकाल संपल्यानंतर रिक्त पदावर विद्यापीठाने नवीन व्यक्तींची नियुक्तीही केली नाही. परिणामी वर्षभरापासून अध्यासनांचे कामकाज ठप्प आहे.