शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

पुणे विद्यापीठातील विचारपीठांना खीळ

By admin | Updated: April 14, 2015 01:43 IST

महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे.

पुणे : महान व्यक्तींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीला समजावा या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बहुतांश अध्यासनांचे कामकाज सुमारे वर्षभरापासून ठप्प आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासह तब्बल १५ अध्यासन प्रमुखांची पदे रिक्त असल्यामुळे विचारपीठाच्या कामकाजाला खीळ बसली आहे.विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पंडित भीमसेन जोशी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शंतनूराव किर्लोस्कर, सेठ हिराचंद नेमचंद जैन, डी. एस. सावकार, आय.एस.आर.ओ. (इस्रो) स्पेस चेअर, जैवतंत्र व जैव माहितीशास्त्र अध्यासन अशा एकूण १९ अध्यासनांची स्थापना करण्यात आली. परंतु, यातील अनेक अध्यासनांवर गेल्या काही वर्षांपासून प्रमुखांची नियुक्तीच केली गेली नाही. त्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची जबाबदारी वयाच्या ७० वर्षांपर्यंत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांभाळली. परंतु, दोन महिन्यांपूर्वी कसबे हे सेवानिवृृत झाल्यामुळे आंबेडकर अध्यासनाचे पद रिक्त आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुखपद रिक्त असले तरी विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे हे या अध्यासनाचे समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये अध्यासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय व स्थानिक संस्थांशी करार करून विविध कार्यशाळा तसेच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. परंतु, अध्यासनासाठी केवळ २.५ कोटी रुपयांची तरतूद केली जात असल्यामुळे विविध कामे करण्यास मर्यादा येतात, असे मत काही अध्यासन प्रमुखांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)अध्यासनांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, अध्यासन प्रमुखांच्या कामकाजाची नियमावली तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. अध्यासनांचे कामकाज अधिक सक्षमपणे चालावे, असा प्रयत्न विद्यापीठातर्फे केला जातो. विद्यापीठ फंडातून अध्यासनांसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला जातो. राज्य शासन, केंद्र शासन किंवा कोणत्याही संस्थेकडून अध्यासनांसाठी आर्थिक सहकार्य मिळत नाही.- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ृत्रुटी असल्याने अहवाल नाकारला४अध्यासनांच्या कामात सुसूत्रता कशी आणता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली होती. परंतु, या समितीने दिलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यापीठाने या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. तसेच अध्यासन प्रमुखपदाचा कार्यकाल संपल्यानंतर रिक्त पदावर विद्यापीठाने नवीन व्यक्तींची नियुक्तीही केली नाही. परिणामी वर्षभरापासून अध्यासनांचे कामकाज ठप्प आहे.