शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

संमेलनाच्या सरकारीकरणाला विरोध, साहित्य संस्थांची भूमिका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 4:45 AM

‘आगामी साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल,’ असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले होते; मात्र साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे  - ‘आगामी साहित्य संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल,’ असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले होते; मात्र साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संमेलनाचे सरकारीकरण नकोच, अशी परखड भूमिका संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. संमेलनांमध्ये राजकीय लोकांचा वाढत हस्तक्षेप, उद्घाटन आणि समारोपप्रसंगी व्यासपीठावर राजकारण्यांची होणारी गर्दी हा कायमच वादाचा विषय ठरतो. त्यातच संपूर्ण संमेलन सरकारच्या हातात गेले तर त्याचे स्वरूपच बदलेल, अशी भीतीही व्यक्तकरण्यात आली.अद्याप भिलारचे पत्र आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सात निमंत्रणे आली आहेत. पुस्तकांच्या गावात संमेलन झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले होते. संमेलनाचे अनुदान २५ ऐवजी ५० लाख रुपये करण्याचा निर्णय सकारात्मक आहेच: संमेलन ताकदीने उभे करण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे; मात्र साहित्य संमेलनाच्या आयोजनात सरकारचा हस्तक्षेप नको, यावरही आपण ठाम असल्याचे प्रतिनिधींनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.आयोजक संस्थाकडून येणारे प्रस्ताव, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक यातून साहित्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका सारखे राजकारण दर वर्षी रंगते. शासनाकडे संमेलन गेल्यास आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता एका साहित्य संस्थेच्या प्रतिनिधीने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. शासनाच्या आणि पयार्याने मंत्र्यांच्या जवळ असणाºया साहित्यिकांची वर्णी लागण्याची शक्यताही या वेळी साहित्य वतुर्ळातून व्यक्त करण्यातयेत आहे.तावडे यांनी पुढील संमेलन भिलारला व्हावे, शासन संपूर्ण व्यवस्था करेल असे सांगितले; मात्र संमेलनावर सरकारचा वरचष्मा नको, असेच अनेकांचे म्हणणे आहे. मसापच्या शाहूपुरी शाखेने बºयाचदा संमेलनाच्या नियोजनाचा प्रस्ताव पाठवला आहे. तेथील प्रतिनिधींना शासनाने विचारणा करायला हवी. संमेलन अधिकाधिक उंचीवर नेण्यासाठी शासनाने मदत जरूर करावी; मात्र त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नको.- मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसापशासन दरबारी चालणारी प्रक्रिया अत्यंत संथ आणि क्लिष्ट असते. कोणताही प्रस्ताव अथवा निवेदन दिल्यावरही त्यावर कार्यवाही करण्यास अनेक वर्षे लागतात. संमेलनाचे सरकारीकारण झाल्यास दर वर्षी संमेलन होईल की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त करण्यात आली.तावडे यांनी भिलारला संमेलन व्हावे, अशी इच्छा प्रकट केली असली, तरी महामंडळाला प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागेल. एखाद्या संस्थेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवावा लागेल.- डॉ. श्रीपाद जोशी,अध्यक्ष, साहित्य महामंडळ

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र