शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

होलेवाडी, मांजरेवाडी येथील मोजणीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : होलेवाडी व मांजरेवाडी या परिसरात रेल्वे मार्गाची मोजणी सोमवारी (दि. २४) होणार आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : होलेवाडी व मांजरेवाडी या परिसरात रेल्वे मार्गाची मोजणी सोमवारी (दि. २४) होणार आहे. या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र स्वरूपाचा विरोध आहे. रेल्वे अधिकारी व प्रशासनाला झालेल्या बैठकीत समर्पक उत्तरे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमच्या मागण्या मान्य करा व तरच मोजणी करा, अन्यथा मोजणी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत प्रांत विक्रांत चव्हाण यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने रेल्वे भूसंपादनाच्या बाबत होलेवाडी व मांजरेवाडी या गावांतील शेतजमीन खातेदारांची गावामध्ये बैठक घेऊन त्यांना या भूसंपादनाबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. ज्या खातेदारांची जमीन यामध्ये जाणार आहे, त्यांची काही जमीन म्हणजे एक दोन गुंठा जमीन रेल्वे ट्रॅकच्या एका बाजूला शिल्लक राहणार आहे. या जमिनीत त्यांना शेती पिकवणे वहिवाट करणे हे अशक्य होणार आहे. ही जमीनसुद्धा रेल्वेने संपादनाच्या दराने घ्यावी. रेल्वे रुळाच्या बाजूला किती मीटर अंतरावर डेव्हलपमेंट करता येणार नाही. याबाबत कोणते नियम आहेत याची माहिती रेल्वे विभागाने जाहीर करावी. रेल्वे ट्रॅकचे एका बाजूकडून दुसरीकडे जात असताना त्यासाठी ज्या ठिकाणी बोगदे ठेवलेले आहेत तेथून शेतकऱ्यांना वापरण्यासाठी रेल्वेच्या संपादन केलेल्या जागेमधून रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे काय? होणारी पुणे-नाशिक रेल्वे ही सेमी हायस्पीड असल्यामुळे रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड केले जाणार आहे का? असे प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला बैठकीत उपस्थित केले. मात्र या प्रश्नांची उत्तरे रेल्वे अधिकारी व खेड प्रशासनाला उत्तरे देता आली नाही. त्यामुळे रेल्वेसाठी कवडीमोल भावाने जमीन घेणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भूसंपादनाचा दर निश्चित करून तो दर प्रथम जाहीर करावा. अशीसुद्धा मागणी करण्यात येत आहे. काही खातेदारांची जमीन संपादन होत नाही, परंतु रेल्वे ट्रॅकच्या बाजूला त्यांची घरे येत आहेत. रेल्वे सुरू झाल्यानंतर त्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्याबाबत सुद्धा ग्रामस्थांच्या मनामध्ये भिती आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संभ्रम आधी दूर करावा, त्यानंतरच मोजणी करावी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.