शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंबेगाव तालुक्यात मध्यवर्ती शाळा संकल्पनेला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 01:43 IST

तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे.

डिंभे : तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून दीपावली सुटीनंतर पहिल्याच दिवशी या केंद्रातील सात शाळा तिरपाड येथे भरविण्यासाठीच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरू झाल्या आहेत. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या या निर्णयास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध होत आहे. निर्णय मागे न घेतल्यास आंबेगाव तालुका पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा बंद होणाऱ्या शाळांतील गावकºयांनी निवेदनाद्वारे दिला आहे. गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तसेच जिल्हाधिकाºयांनाहीया निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील तिरपाड या केंद्रातील दुर्गम ठिकाणी असलेल्या ढकेवाडी, फणसवाडी, नानवडे, न्हावेड, कापरवाडी, सडकेचीवाडी व पिंपरगणे या सात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून त्या तिरपाड येथे ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबवून एकत्रित भरविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेमार्फत नुकताच घेण्यात आला आहे. २३ आॅक्टोबर २०१८ च्या गटविकास अधिकारी पं. स. आंबेगाव यांच्याकडील पत्राचा संदर्भ घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थी समायोजनासाठी या सात शाळांधील विद्यार्थीसंख्या, त्यांच्या बैठकव्यवस्थेसाठी वर्गखोल्या पुरेशा व सुस्थितीत आहेत का? याची पाहणी करणे, ज्या शाळांचे समायोजन करावयाचे आहे, त्या शाळांतील शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची संमती घेणे, अभिलेखाचे एकत्रिकरण करणे, विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्यासाठी अग्रक्रमाने वाहतूकव्यवस्था करणे व एकत्रिकरणामुळे अतिरिक्त होणाºया शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी नियोजन करणे अशी कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुटीपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करून सुटीनंतरच्या पहिल्या दिवसापासून मध्यवर्ती शाळा सुरू करण्याचे धोरण आहे.पुणे जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयाला मात्र संबंधित गावकºयांनी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आमची लहान लहान मुले असल्याने गाव सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शाळांचा परिसर अवघड डोंगरउताराचा असून मुलांची ने-आण करण्यासाठी बस वाडी-वस्तीवर पोहोचणार नाहीत. काही मुलांची घरे शेतात आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार कोणत्याही वाडी-वस्तीपासून १ किमीच्या अंतरावर प्राथमिक शाळा व ३ किमीच्या अंतरावर उच्च प्राथमिक शाळा असण्याचे धोरण असताना आदिवासी मुलांचे शिक्षणच हिरावून घेणारा हा निर्णय कशासाठी? पेसा कायद्याअंतर्गत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार प्रथमत: ग्रामसभेला असताना या निर्णयासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याच्या भावना आहेत.सर्वशिक्षा मोहिमेअंतर्गत २० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात यावे, असे धोरण आहे. आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, विद्यार्थीसंख्येनुसार वर्गनिहाय व विषयनिहाय शिक्षक उपलब्ध करून देता यावेत, शालेय पोषण आहारात सुधारणा करता यावी, यासाठी तिरपाड केंद्रातील शाळांचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे. - पोपटराव महाजन, गटशिक्षणाधिकारी, पं. स. आंबेगावतिरपाड केंद्रातील सात शाळांचे समायोजन करून मध्यवर्ती शाळा ही संकल्पना राबविण्यासाठी जि. प. निर्णय आहे. यावर ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या भावनानुसार प्राप्त निवेदने पुणे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. - राहुल काळभोर (गटविकास अधिकारी पं. स. आंबेगाव)

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र