शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आंबेगाव तालुक्यात मध्यवर्ती शाळा संकल्पनेला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 01:43 IST

तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे.

डिंभे : तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून दीपावली सुटीनंतर पहिल्याच दिवशी या केंद्रातील सात शाळा तिरपाड येथे भरविण्यासाठीच्या हालचाली शिक्षण विभागाकडून सुरू झाल्या आहेत. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या या निर्णयास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध होत आहे. निर्णय मागे न घेतल्यास आंबेगाव तालुका पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा बंद होणाऱ्या शाळांतील गावकºयांनी निवेदनाद्वारे दिला आहे. गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तसेच जिल्हाधिकाºयांनाहीया निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील तिरपाड या केंद्रातील दुर्गम ठिकाणी असलेल्या ढकेवाडी, फणसवाडी, नानवडे, न्हावेड, कापरवाडी, सडकेचीवाडी व पिंपरगणे या सात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून त्या तिरपाड येथे ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबवून एकत्रित भरविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेमार्फत नुकताच घेण्यात आला आहे. २३ आॅक्टोबर २०१८ च्या गटविकास अधिकारी पं. स. आंबेगाव यांच्याकडील पत्राचा संदर्भ घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थी समायोजनासाठी या सात शाळांधील विद्यार्थीसंख्या, त्यांच्या बैठकव्यवस्थेसाठी वर्गखोल्या पुरेशा व सुस्थितीत आहेत का? याची पाहणी करणे, ज्या शाळांचे समायोजन करावयाचे आहे, त्या शाळांतील शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची संमती घेणे, अभिलेखाचे एकत्रिकरण करणे, विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्यासाठी अग्रक्रमाने वाहतूकव्यवस्था करणे व एकत्रिकरणामुळे अतिरिक्त होणाºया शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी नियोजन करणे अशी कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुटीपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करून सुटीनंतरच्या पहिल्या दिवसापासून मध्यवर्ती शाळा सुरू करण्याचे धोरण आहे.पुणे जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या या निर्णयाला मात्र संबंधित गावकºयांनी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आमची लहान लहान मुले असल्याने गाव सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शाळांचा परिसर अवघड डोंगरउताराचा असून मुलांची ने-आण करण्यासाठी बस वाडी-वस्तीवर पोहोचणार नाहीत. काही मुलांची घरे शेतात आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार कोणत्याही वाडी-वस्तीपासून १ किमीच्या अंतरावर प्राथमिक शाळा व ३ किमीच्या अंतरावर उच्च प्राथमिक शाळा असण्याचे धोरण असताना आदिवासी मुलांचे शिक्षणच हिरावून घेणारा हा निर्णय कशासाठी? पेसा कायद्याअंतर्गत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार प्रथमत: ग्रामसभेला असताना या निर्णयासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेतले नसल्याच्या भावना आहेत.सर्वशिक्षा मोहिमेअंतर्गत २० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात यावे, असे धोरण आहे. आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, विद्यार्थीसंख्येनुसार वर्गनिहाय व विषयनिहाय शिक्षक उपलब्ध करून देता यावेत, शालेय पोषण आहारात सुधारणा करता यावी, यासाठी तिरपाड केंद्रातील शाळांचे एकत्रिकरण करण्याचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला आहे. - पोपटराव महाजन, गटशिक्षणाधिकारी, पं. स. आंबेगावतिरपाड केंद्रातील सात शाळांचे समायोजन करून मध्यवर्ती शाळा ही संकल्पना राबविण्यासाठी जि. प. निर्णय आहे. यावर ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या भावनानुसार प्राप्त निवेदने पुणे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. - राहुल काळभोर (गटविकास अधिकारी पं. स. आंबेगाव)

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र