शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

पुण्यातील शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:36 IST

इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मात्र प्रतिगामी भाजप सरकार प्रतिगामी लोकांनाच मदत करत असल्याची टीका केली.

ठळक मुद्दे महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत :पांडुरंग बलकवडे दंगली घडवून सत्तेयेण्याचे संघाचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले :श्रीमंत कोकाटे

पुणे :पुणे शहरातील कात्रज परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्र सरकारच्या जेएनपीटी योजनेच्या अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मात्र प्रतिगामी भाजप सरकार प्रतिगामी लोकांनाच मदत करत असल्याची टीका केली. दंगली घडवून सत्तेयेण्याचे संघाचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसृष्टीला मदत देणेच मुळात चुकीचे आहे असे मतही  मांडले.  

शिवसृष्टीबाबत सुरु असलेल्या वाद विवादावर बलकवडे यांनी लोकमतकडे प्रतिक्रिया नोंदवली असून   महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करायला हवे असे मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, बाबासाहबे पुरंदरे गेली ७५व र्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रसार करत आहेत. त्यांनी ग्रंथलेखन केले, जाणता राजा सारखा प्रयोग केला. शिवाजी महाराजांचे भव्य, दिव्य अद्भुत चरित्र जगासमोर यावं या दृष्टिकोनातून त्यांनी तीस वर्षांपूर्वी शिवसृष्टीनिर्माणाचा ध्यास घेतला. त्यांच्या शिवसृष्टीच्या ज्या काही कल्पना आहेत. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महाराजांचे चरित्र यावे त्यासाठी गेले तीस वर्ष ते प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प अतिशय व्यापक आहे.त्यात चार  टप्पे आहेत. जागतिक पातळीवर त्याची ओळख राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यात ३५० कोटीपैकी केंद्र सरकार या कार्याचे महत्व लक्षात घेऊन ५ कोटी रुपये देत खारीचा वाटा उचलत असेल तर त्याचे सर्व शिवप्रेमींनी स्वागत करायला हवे.पुढे ते  म्हणाले की, महापालिका उभारणार असलेला प्रकल्प २० ते २५ कोटी रुपयांचा आहे. जसजशा परवानग्या येतील तसतसे त्या प्रकल्पाचे काम पुढे जाईल.त्यालाही केंद्र आणि राज्य सरकार मदत करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे चांगल्या गोष्टीची स्पर्धा व्हायला हवी असे मत त्यांनी मांडले. 

श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरे यांनी केलेली इतिहासाची मांडणी ही कायम जातीवादी, समाजवादी आणि कायम धार्मिक तेढ निर्माण करणारी होती असा आक्षेप नोंदवला.एकीकडे सरकारी शिवसृष्टी तिला अजून मान्यता नाही, त्याची जमीन निश्चित नाही आणि दुसरीकडे  निधी दिला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. यातून प्रतिगामी लोक सत्तेवर येतात तेव्हा ते प्रतिगामी लोकांनाच कशी मदत करता याचे उदाहरण पुरोगामी लोकांनी घ्यायला हवे असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीय ध्रुवीकरण करून, दंगली घडवून सत्तेत  येण्याचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसृष्टीला मदत देणेच मुळात चुकीचे आहे असे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेhistoryइतिहासBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे