शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

पुण्यातील शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:36 IST

इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मात्र प्रतिगामी भाजप सरकार प्रतिगामी लोकांनाच मदत करत असल्याची टीका केली.

ठळक मुद्दे महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत :पांडुरंग बलकवडे दंगली घडवून सत्तेयेण्याचे संघाचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले :श्रीमंत कोकाटे

पुणे :पुणे शहरातील कात्रज परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्र सरकारच्या जेएनपीटी योजनेच्या अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मात्र प्रतिगामी भाजप सरकार प्रतिगामी लोकांनाच मदत करत असल्याची टीका केली. दंगली घडवून सत्तेयेण्याचे संघाचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसृष्टीला मदत देणेच मुळात चुकीचे आहे असे मतही  मांडले.  

शिवसृष्टीबाबत सुरु असलेल्या वाद विवादावर बलकवडे यांनी लोकमतकडे प्रतिक्रिया नोंदवली असून   महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करायला हवे असे मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, बाबासाहबे पुरंदरे गेली ७५व र्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रसार करत आहेत. त्यांनी ग्रंथलेखन केले, जाणता राजा सारखा प्रयोग केला. शिवाजी महाराजांचे भव्य, दिव्य अद्भुत चरित्र जगासमोर यावं या दृष्टिकोनातून त्यांनी तीस वर्षांपूर्वी शिवसृष्टीनिर्माणाचा ध्यास घेतला. त्यांच्या शिवसृष्टीच्या ज्या काही कल्पना आहेत. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महाराजांचे चरित्र यावे त्यासाठी गेले तीस वर्ष ते प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प अतिशय व्यापक आहे.त्यात चार  टप्पे आहेत. जागतिक पातळीवर त्याची ओळख राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यात ३५० कोटीपैकी केंद्र सरकार या कार्याचे महत्व लक्षात घेऊन ५ कोटी रुपये देत खारीचा वाटा उचलत असेल तर त्याचे सर्व शिवप्रेमींनी स्वागत करायला हवे.पुढे ते  म्हणाले की, महापालिका उभारणार असलेला प्रकल्प २० ते २५ कोटी रुपयांचा आहे. जसजशा परवानग्या येतील तसतसे त्या प्रकल्पाचे काम पुढे जाईल.त्यालाही केंद्र आणि राज्य सरकार मदत करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे चांगल्या गोष्टीची स्पर्धा व्हायला हवी असे मत त्यांनी मांडले. 

श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरे यांनी केलेली इतिहासाची मांडणी ही कायम जातीवादी, समाजवादी आणि कायम धार्मिक तेढ निर्माण करणारी होती असा आक्षेप नोंदवला.एकीकडे सरकारी शिवसृष्टी तिला अजून मान्यता नाही, त्याची जमीन निश्चित नाही आणि दुसरीकडे  निधी दिला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. यातून प्रतिगामी लोक सत्तेवर येतात तेव्हा ते प्रतिगामी लोकांनाच कशी मदत करता याचे उदाहरण पुरोगामी लोकांनी घ्यायला हवे असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीय ध्रुवीकरण करून, दंगली घडवून सत्तेत  येण्याचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसृष्टीला मदत देणेच मुळात चुकीचे आहे असे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेhistoryइतिहासBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे