शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

त्यांचा संसार उघड्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 06:53 IST

आंबेडकरनगर झोपडपट्टी : आगीला महिना पूर्ण, जळीगस्तांत नाराजीचा सूर

बिबवेवाडी : येथील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगर झोपडपट्टीला गेल्या महिन्यातील २१ तारखेला आग लागून ७४ कुटुंबांची घरे जळून खाक झाली होती. या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. तरीदेखील येथील जळीतग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यांचा संसार अजूनही उघड्यावरच आहे. त्यामुळे या कुटुंबीयांमध्ये नाराजीचा सूर आहे.दुर्घटना झाल्यानंतर, प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व त्यानंतर प्रशासनाने जळीतग्रस्त कुटुंबाना लाकडी वासे व पत्रे देऊ केले; परंतु जळीतग्रस्त कुटुंबांनी पक्क्या घराची मागणी करत ही मदत नाकारली.दुर्घटनेनंतर अनेक सेवाभावी संस्थांनी जळीतग्रस्त कुटुंबांना संसारपयोगी वस्तूंचे वाटप केले. काही संस्थांनी धान्य दिले, तर काही संस्थांनी ताट-वाट्या, गॅसची शेगडी व कपडे ठेवण्यासाठी लोखंडी ट्रंक दिल्या. काही राजकीय पक्ष, राजकीय संघटने तर्फे रोख रक्कमही देण्यात आली.पण, हे सर्व सामान मिळत असताना हे सामान ठेवण्यासाठी हक्काचे घर नसल्यामुळे आलेल्या वस्तूं ठेवायच्या कुठे, हा प्रश्न निर्माण होत आहे. दुर्घटनाग्रस्त घरांचे आता सांगाडेही शिल्लक राहिलेले नसून फक्त घरांचे जोते शिल्लक राहिले आहेत. त्यावरच कुठे चादरीने, तर कुठे फ्लेक्स बांधून छप्पर करून त्याखाली जळीतग्रस्त कुटुंब आपला संसार करत आहेत.पावसाळ्यात काय करायचे ?उन्हाळ्याचे दिवस असून, दुर्घटनाग्रस्त कुटुंब विजेविना राहत असून, थोड्याच दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे डोक्यावर छप्पर नसल्याने पावसाळ्याच्या दिवसांत काय करायचे, हा प्रश्न या कुटुंबीयांना भेडसावत आहे. चादरीचे छत अन् काळ्या भिंतीदोनमजली घरात राहणारे अशोक सूर्यवंशी यांचे ८ लोकांचे कुटुंब असून, ते फळांच्या गाळ्यावर हमालीचे काम करतात, तर त्यांचे वडील बांबूपासून कुल्फीला लागणाऱ्या काड्या बनविण्याचे काम करतात. कमी जागेत त्यांनी त्यांचा संसार थाटला होता; परंतु त्याची जागा आता काळ्या ठिक्कर पडलेल्या भिंतींनी घेतली आहे. छताची जागा आता चादरीने व फ्लेक्सने घेतली आहे. शासनाकडून अद्याप पर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही याची त्यांना खंत आहे.अनेकजण फोटोसाठी येतातमंगलकुमार खडके या जळीतग्रस्त कुटुंबातील जेष्ठ महिला. घराच्या वरती बांधलेल्या फ्लेक्सच्या सावलीखाली अख्खा दिवस घालवतात. घरातील पुरुष मंडळी दिवसभर कामावर जातात. प्रशासनाने पक्की घरे बांधून द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सेवाभावी संस्थानी केलेली मदत त्या आर्वजून सांगत होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र सेवाभावी संस्था मदत करताना फोटो काढण्यापुरते येतात, असे सांगितले.जळीतग्रस्त कुटुंबातील बहुतेक सदस्य दिवसभर कामावर असतात. यामध्ये काही महिला वर्ग धुणीभांडी करण्याचे काम करत असल्यामुळे त्यांचा दिवस निघून जातो; परंतु संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर मात्र वस्तीतील समाजमंदिराचा आश्रय घ्यावा लागतो. घरातील वयोवृद्ध पुरूष व महिला उन्हामुळे एकमेकांच्या घराच्या सावलीचा आश्रय घेतात. दरम्यान, रमजानचा पवित्र महिना चालू असताना अनेक जळीतग्रस्त कुटुंब आपल्या नातेवाइकांकडे तसेच तिथेच असलेल्या मस्जिदमध्ये राहत असून उपवास करत आहे.

टॅग्स :fireआग