शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुळशीत माती माफियांकडून खुलेआम लूट, प्रशासनाची डोळेझाक; संवेदनशील क्षेत्रातील गावामधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:12 IST

एवढं सगळं घडत असताना मात्र महसूल विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे. उत्खननामुळे संवेदनक्षेत्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे.....

- दुर्गेश मोरे

पुणे : मुळशी तालुक्यातील संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झाेन) असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मातीचे उत्खनन सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे माती घेऊन जाण्यासाठी टेमघर धरणातून मार्ग काढण्यात आला आहे. एवढं सगळं घडत असताना मात्र महसूल विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे. उत्खननामुळे संवेदनक्षेत्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

पश्चिम घाट ही देशाला मिळालेले वरदान असून, या डोंगररागांमध्ये असंख्य प्रकारची वनसंपदा, वन्यजीव, कीटक, सरपटणारे प्राणी आणि सूक्ष्म जीव आहेत. अनेक नद्यांचा उगम होत असल्याने तेथील वनक्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे. ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी शासनाने संवेदशील क्षेत्र जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील तब्बल ३३९ गावांचा संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. असे असतानाही गेल्या काही दिवसांत उत्खनन, खाणी, अतिक्रमणे, वृक्षतोड, बांधकाम आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्प वाढले आहेत. विशेष करून मुळशी, वेल्हे तालुक्यांमध्ये गौण खनिज, लाल मातीचे बेसुमार उत्खनन सुरू आहे. त्यामुळे तेथील धोक्यात आले आहे.

मुळशी तालुक्यातील ६६ गावांचा संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश आहे. असे असतानाही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू आहे. तर काही ठिकाणी वृक्षतोडही करण्यात आली आहे. टेमघर, लव्हार्डे, कोळवडे, वेगरे ही गावे संवेदनशील क्षेत्रात आहेत. वेगरे गाव जेमतेम लोकसंख्येचे. मात्र, गावात बिनभोभाटपणे रात्रंदिवस मातीचे उत्खनन सुरू आहे. उत्खनन केल्यावर नियमानुसार वाहतूक करताना माती उडू नये याची खबरदारी घेणे गरजेचे होते. पण याला तिलांजली देत वाहतूक होत असते. रस्ता खराब झाल्याने गावकऱ्यांनी या वाहतुकीला विरोध केला होता. त्यानंतर काही दिवस काम बंद झाले. अखेर शक्कल लढवत मातीचोरांनी चक्क टेमधरणातूनच नवा मार्ग तयार करून आपले काम पुन्हा सुरू केले.

परवाना एका गटाचा उत्खनन दुसऱ्या गटात

उत्खनन करण्यासाठी तो परिसर खाणपट्टा म्हणून घोषित करणे आवश्यक असते. त्यानंतर पर्यावरण आघात मूल्यांकन समिती, ग्रामंपचायतीचे नाहकरत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. मात्र, असे असतानाही नियमांना धाब्यावर बसवले जाते. परवाना घेताना एका गटाचा घेतला जातो उत्खनन मात्र दुसऱ्या गटात केले जाते. ग्रामसेवक, तलाठी यांना याची माहिती मिळत नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जाते. वेगरे गाव संवेदनशील क्षेत्रात येत असतानाही तेथे उत्खनन सुरू आहे. गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर परवानगी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सरपंच यांच्या जागेत उत्खनन सुरू असल्याचे सांगत अरेरावीदेखील मातीचोरांनी ग्रामस्थांना केली. मग दाद कुठे मागायची? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

महसूल विभागाने डोळे झाकण्यामागे काय आहे गौडबंगाल

वीटभट्टी, बगीचा, मैदान तसेच शेतीसाठी लाल मातीचा उपयोग होते. मुळशी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विशेष करून संवेदनशील क्षेत्रात माती उत्खनन केले जात असूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे महसूल विभागाने डोळे झाकण्यामागे काय गौडबंगाल आहे हे मात्र समजायला काही एक मार्ग नाही. केवळ मुळशीच नाही तर वेल्ह्यातही असे प्रकार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यातील संवेदनशील क्षेत्र

तालुका-- गावे

मुळशी-- ६६

वेल्हे-- ५८

भोर-- ५६

मावळ-- ५३

आंबेगाव-- ३७

जुन्नर-- ३५

खेड-- २२

पुरंदर-- ८

हवेली-- ४

संवेदनशील क्षेत्रात उत्खननाला परवानगी देता येत नाही. तसे काही असेल तर तक्रार करावी. संवेदनशील क्षेत्रातील गावात जर माती उत्खनन सुरू असेल तर तत्काळ कारवाई करण्यात येईल. शिवाय इतर ठिकाणी सुरू असलेल्या उत्खननाची माहिती घेऊन नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करू.

- सुयोग जगताप, जिल्हा खणिकर्म अधिकारी

पिरंगुट, मुळशी या भागात मोठ्या प्रमाणात लाल मातीचा उपसा चालू असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी नाहीये आणि ज्या गावांमध्ये परवानगी दिलेली आहे. त्या गावात खोदकाम न करता दुसऱ्या गावांमध्ये खोदकाम केलं जातं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावरत प्रशासकीय विभागाची फसवणूक केली जाते. यावर प्रशासनाने विभागाने कारवाई करावी.

-अंकुश दिवटे

वेगरे गाव संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झोन) येत असूनही तेथे माती उपसा चालू आहे. मातीची रात्रंदिवस टेमघर धरणातून वाहतूक सुरू असतानादेखील महसूल विभाग गप्पा का बसला आहे हे मात्र समजत नाही. वरिष्ठांची याची दखल घेणे गरजेचे आहे.

-विनोद कांबळे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड