शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

उद्यानांना फक्त जैविक खतांची मात्रा

By admin | Updated: December 30, 2014 00:20 IST

महापालिकेच्या उद्यानांसाठी मोशी येथील विघटनशील कचऱ्यापासूून खत निर्मिती (गांडूळखत) प्रकल्पातून मिळणाऱ्या जैविक खताचा सर्वस्वी वापर केला जात आहे.

पिंपरी : महापालिकेच्या उद्यानांसाठी मोशी येथील विघटनशील कचऱ्यापासूून खत निर्मिती (गांडूळखत) प्रकल्पातून मिळणाऱ्या जैविक खताचा सर्वस्वी वापर केला जात आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पुर्णत: बंद झाला असून २ वर्षांपेसून त्यांची खरेदीच थांबली आहे. परिणामी जमिनीचा पोत सुधारत असल्याची माहिती महापालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. महापालिकेची सध्या १७१ उद्याने आहेत. यासह चौकांमध्ये, रस्तादुभाजकांवर हिरवळ तसेच, सुशोभिकरण केले आहे. रस्त्यांलगत व मोकळ्या जागेत चालू वर्षी २३ लाख वृक्षरोपांची लागवड झाली आहे. हिरवळ तसेच, झाडांना पोषण मिळण्यासाठी महापालिकेला आजवर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा लागत असे. त्यासाठी वर्षाकाठी ८ लाख रुपये खर्च व्हायचा. महापालिकेने २४ जानेवारी २००४ रोजी जेएनएनयुआरएम योजनेतून बांधा वापरा हस्तांतरित करा तत्त्वावर गांडुळखत निर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोशी येथील ८१ एकरावर असलेल्या कचरा डेपोपैकी ५ एकरवर १२ वर्षाच्या कराराने प्रकल्प कंत्राटदारास हस्तांतरित केला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने ३ कोटी २० लाख रुपये खर्च करून प्रकल्पाचे शेड, कार्यालय धमारत, खत साठवणूकीस गोदाम बांधले आहे. त्यामध्ये गांडुळखत निर्मीतीसाठी १३२ कप्प्यांचे रॅक, १ हॉपर, १ कन्व्हेयर बेल्ट, १ ट्रॅक्टर लोडर, १ श्रेडर, वजन काटे, स्प्रिकलर यंत्रणेची व्यवस्था आहे. या प्रकल्पाची दिवसाला ३० टन कचरा विघटन करण्याची क्षमता आहे. महापालिका या प्रकल्पासाठी दिवसाला १२ ते १५ टन ओला कचरा (मंडई वेस्ट) पुरवते. यासह १५ ते १८ टन इतर कचरा दिला जातो. येथील कामगार, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि नेहमीच्या व्यवस्थापनाची जबाबदरी कंत्राटदाराची आहे. त्याने तयार केलेल्या गांडुळ खतापैकी प्रतिमहिन्याला ५० टन खत माफक (किमान आधारभुत किंमत प्रतिकीलोस ३ रु. ७५ पैसे) दरामध्ये महापालिकेला दिले जाते. उर्वरित खत खुल्या बाजारात विकण्याची मुभा असल्याची माहिती पर्यावरण विभागाने दिली आहे. या खताचा वापर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे जमिनीचा पोत कालांतराने सुधारत असल्याने इतर रासायनिक खतांची मात्रा बंद करण्यात आल्याची माहिती उद्यान विभागाने दिली.(प्रतिनिधी)या प्रकल्पातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात गांडुळ खत मिळत आहे. त्यामुळे प्रकल्पाची परिणामकारकता आता खऱ्या अर्थाने दिसू लागली आहे. एकीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागली आहे. त्यातून साहजिकच प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे. तर दुसरीकडे या कचऱ्यापासून खत निर्र्मितीचा विधायक उद्देश सफल झाला आहे. - संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिकाउद्यानांसाठी गरज असेल, तशी गांडुळखताची मागणी केली जाते. वर्षभरात ३०० टनापेक्षा अधिक खताचा वापर होतो. रासायणीक खतांची खरेदी २ वर्षांपासून थांबविली आहे. आता पुर्णपणे गांडुळखताचा वापर होत आहे. त्यामुळे मातीमधील जिवाणूंचे जतन होते. आधीची गांडुळे मरत नाहीत. परिणामी जमीन भुसभूषित होवून पोषणमुल्ल्यांतही सुधार झाला आहे. पुर्वी वारंवार खतांची मात्रा द्यावी लागायची. आता त्याची गरज भासत नाही.- सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधिक्षक, पिंपरी-चिंचवड महापालिका