शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत स्थानिकांनाच विवाह सोहळ्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 19:22 IST

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई..

ठळक मुद्देलग्न समारंभास काही अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी देऊन लग्न करण्यास मुभा आळंदीत सुमारे पाचशेहून अधिक मंगल कार्यालये, धर्मशाळा व विवाह हॉल

आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारी म्हणून लग्न समारंभास अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी दिली आहे. मात्र तीर्थक्षेत्र आळंदीत फक्त स्थानिकांनाच लग्न सोहळा आयोजित करता येणार असल्याचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.   मागील दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यावर मज्जाव घालण्यात आला आहे. दरम्यान लग्न समारंभास काही अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी देऊन लग्न करण्यास मुभा देण्यात आली आहे.                  आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून याठिकाणी श्री. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. त्यामुळे आळंदीत विवाहबद्ध होण्याची अनेकांची इच्छा असते. त्यातच आळंदीत सुमारे पाचशेहून अधिक मंगल कार्यालये, धर्मशाळा व विवाह हॉल आहेत. दरम्यान ५० व्यक्तींचा सहभाग ठेऊन लग्नसमारंभास परवानगी दिल्याने  आळंदी बाहेरून अनेक वऱ्हाडी शहरात दाखल होऊ लागले. सद्यस्थितीत एका दिवसात किमान अडीच हजारांहून अधिक लोक येऊ लागल्याने कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.                       यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात फक्त स्थानिकांनाच ५० वऱ्हाडी घेऊन विवाह सोहळा संपन्न करता येईल. तालुक्याबाहेरील नागरिकांना शहरात विवाह सोहळा करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला आहे.

टॅग्स :Alandiआळंदीmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस