शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

नाझरे जलाशयात केवळ ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:48 IST

नियोजनाची गरज : उन्हाळयात पाण्यासाठी करावी लागणार पायपीट

जेजुरी : पूर्व पुरंदर, जेजुरी आणि पश्चिम बारामती परिसराला शेती व पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे जलाशयात अवघा ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मृतसाठ्यातील पाण्याचे नियोजन करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेजुरीजवळील नाझरे जलाशयाच्या पाणीसाठ्याची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असून आज या जलाशयात केवळ २१७ दशलक्ष घनफूटएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यातील २०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा मृतसाठा असून केवळ उपयुक्त पाणीसाठा १७ दशलक्ष घनफूट शिल्लक आहे. एकूण पाणीसाठ्याच्या ३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती नाझरे प्रकल्पाधिकाºयांकडून देण्यात आली आहे.

नाझरे जलाशयावरून जेजुरी शहर, जेजुरी औद्योगिक क्षेत्र, आय. एस. एम. टी. कंपनी मोरगाव व १६ गावे, नाझरे व पाच गावे, पारगाव प्रादेशिक योजनेतील कोळविहिरे व मावडी या योजनांना या जलशयावरून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याशिवाय जलाशयावरून शेती सिंचनासाठी २२८ खातेदारांना शेतीसाठी पाणीपुरवठाहोत असतो. १ नोव्हेंबरपासून शेतीसिंचनाच्या योजना बंद करण्यात आलेल्या आहेत. यावर्षी जलाशयाच्या परिसरात सुमारे ५३३ मिमीएवढे पर्जन्यमान राहिले; मात्र पाणलोटक्षेत्रात ४१० मिमी पर्जन्यमान होते. सुमार पर्जन्यमान राहिल्याने कºहा नदीला यावर्षी मोठा पूर आला नव्हता.संपूर्ण पावसाळ्यात केवळ ७८ दशलक्ष घनफूटएवढेच पाणी जलाशयात आले होते. पावसाळ्यापूर्वी जलाशयात २०६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. यात ७८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याने केवळ २८४ दशलक्ष घनफूट पाणीसाठाच झाला होता. जलाशयातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.उन्हाळ्यात याच जलशयावरून सुमारे ५० गावांना पाणीपुरवठा करावा लागणार असल्याने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पुढील ८ ते ९ महिने पिण्याचे पाणी पुरवावे लागणार आहे. शेती, कारखानदारी औद्योगिक क्षेत्राचे पाणीही बंद करावे लागणार आहे. बंद पडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू कराव्या लागणार आहेत. भविष्यातील गांभीर्य ओळखून नियोजन करण्यात आल्याचे नाझरे जलाशयाचे शाखा अभियंता शंकर चौलंग यांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे