शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा मातीमोल; खर्चही निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:02 IST

जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे;

शेलपिंपळगाव : जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे; मात्र दूषित हवामानाच्या प्रादुर्भावाने कांद्यावर पडलेल्या विविध रोग आणि पाणीटंचाईमुळे पिकाच्या उत्पादनात कमालीची घट जाणवू लागली आहे. पिकाचे घटलेले उत्पादन आणि नीचांकी पातळीवरील बाजारभावामुळे किमान पिकाच्या उत्पादनावरील भांडवलखर्च तरी भागेल का, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण होऊ लागला आहे. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांना उत्पादनखर्चही मिळेनासा झाला आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये आगाप लागवडयुक्त कांदा काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. कांदा रोपाचा व लागवडीकाळात पाण्याचा तुटवडा, मजुरांची टंचाई, दूषित हवामान, अवकाळी पाऊस, रोगराई, वाढलेल्या खतांच्या किमती यांसारख्या उद्भवलेल्या आपत्तीमुळे पिकाचा उत्पादनखर्च दुपटीने वाढला आहे. पिकाच्या लागवडीपासून पिकांवर कीड, मावा, तेल्या, पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी रासायनिक औषधांची फवारणी करून त्यावर आळा घालण्याचे प्रयत्न केले; परंतु सततच्या बदलत्या वातावरणापुढे तेही अपुरेच पडले आहेत. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. त्यातच शेतकºयांचा कांदा बाजारात जाताक्षणी पिकाचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांची निराशा होत आहे.मोठ्या मेहनतीने पिकाची जोपासना करून शेतकºयांनी उत्पादन घेतले असले तरीसुद्धा बाजारात पिकाला समाधानकारक भाव प्राप्त होत नसल्याने शेतकºयांच्या हाती काहीही लागत नसल्याची सत्यस्थिती आहे. भविष्यात बाजारभाव वाढेल,असा अनुमान लावून काही उत्पादक कांद्याची साठवणूक करीत आहेत; परंतु कांदा हे नाशवंत पीक असल्याने त्याची जास्त काळ साठवण करण्यात अडचण येते. परिणामी, आर्थिक गरजेपोटी ८० ते ८५ टक्के पीक उत्पादक शेतकºयांना कांदा काढणीनंतर मिळेल त्या भावात खपवावा लागत आहे. यामुळे कांदापिकाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी केली जात आहे.महिन्यापूर्वी कांद्यास प्रतिकिलो ८ ते १० रुपये बाजारभाव मिळत होता; परंतु त्या वेळी शेतकºयांचा कांदा काढणीयोग्य झालेला नव्हता. सध्या शेतकºयांचा कांदा परिपक्व होऊन काढणीयोग्यझाला आहे. त्यामुळे तो काढणीनंतर विक्रीसाठी थेट बाजारात पाठविला जात आहे. मात्र सध्या बाजारात प्रतिकिलोला ४ ते ७ रुपयेअसा कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.वर्षभरातील प्रमुख नगदी पिकांपैकी कांदा हे शेतकºयांचे आर्थिक उत्पन्नाचे ‘हुकुमी’ पीक आहे. परंतु पिकाला बाजारभावाची शाश्वती नसल्याने उत्पन्नाची खात्री ठेवता येत नाही. शासनाने कांद्याला आधारभूत हमीभाव ठरवून देणे निश्चितच फायदेशीर ठरेल. पिकाच्या उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यालाचांगला बाजारभाव मिळणे अत्याआवश्यक आहे.- दिलीप मोहिते-पाटील,माजी आमदार खेड.