शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कांदा मातीमोल; खर्चही निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:02 IST

जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे;

शेलपिंपळगाव : जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे; मात्र दूषित हवामानाच्या प्रादुर्भावाने कांद्यावर पडलेल्या विविध रोग आणि पाणीटंचाईमुळे पिकाच्या उत्पादनात कमालीची घट जाणवू लागली आहे. पिकाचे घटलेले उत्पादन आणि नीचांकी पातळीवरील बाजारभावामुळे किमान पिकाच्या उत्पादनावरील भांडवलखर्च तरी भागेल का, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण होऊ लागला आहे. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांना उत्पादनखर्चही मिळेनासा झाला आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये आगाप लागवडयुक्त कांदा काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. कांदा रोपाचा व लागवडीकाळात पाण्याचा तुटवडा, मजुरांची टंचाई, दूषित हवामान, अवकाळी पाऊस, रोगराई, वाढलेल्या खतांच्या किमती यांसारख्या उद्भवलेल्या आपत्तीमुळे पिकाचा उत्पादनखर्च दुपटीने वाढला आहे. पिकाच्या लागवडीपासून पिकांवर कीड, मावा, तेल्या, पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी रासायनिक औषधांची फवारणी करून त्यावर आळा घालण्याचे प्रयत्न केले; परंतु सततच्या बदलत्या वातावरणापुढे तेही अपुरेच पडले आहेत. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. त्यातच शेतकºयांचा कांदा बाजारात जाताक्षणी पिकाचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांची निराशा होत आहे.मोठ्या मेहनतीने पिकाची जोपासना करून शेतकºयांनी उत्पादन घेतले असले तरीसुद्धा बाजारात पिकाला समाधानकारक भाव प्राप्त होत नसल्याने शेतकºयांच्या हाती काहीही लागत नसल्याची सत्यस्थिती आहे. भविष्यात बाजारभाव वाढेल,असा अनुमान लावून काही उत्पादक कांद्याची साठवणूक करीत आहेत; परंतु कांदा हे नाशवंत पीक असल्याने त्याची जास्त काळ साठवण करण्यात अडचण येते. परिणामी, आर्थिक गरजेपोटी ८० ते ८५ टक्के पीक उत्पादक शेतकºयांना कांदा काढणीनंतर मिळेल त्या भावात खपवावा लागत आहे. यामुळे कांदापिकाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी केली जात आहे.महिन्यापूर्वी कांद्यास प्रतिकिलो ८ ते १० रुपये बाजारभाव मिळत होता; परंतु त्या वेळी शेतकºयांचा कांदा काढणीयोग्य झालेला नव्हता. सध्या शेतकºयांचा कांदा परिपक्व होऊन काढणीयोग्यझाला आहे. त्यामुळे तो काढणीनंतर विक्रीसाठी थेट बाजारात पाठविला जात आहे. मात्र सध्या बाजारात प्रतिकिलोला ४ ते ७ रुपयेअसा कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.वर्षभरातील प्रमुख नगदी पिकांपैकी कांदा हे शेतकºयांचे आर्थिक उत्पन्नाचे ‘हुकुमी’ पीक आहे. परंतु पिकाला बाजारभावाची शाश्वती नसल्याने उत्पन्नाची खात्री ठेवता येत नाही. शासनाने कांद्याला आधारभूत हमीभाव ठरवून देणे निश्चितच फायदेशीर ठरेल. पिकाच्या उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यालाचांगला बाजारभाव मिळणे अत्याआवश्यक आहे.- दिलीप मोहिते-पाटील,माजी आमदार खेड.