शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा मातीमोल; खर्चही निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 02:02 IST

जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे;

शेलपिंपळगाव : जिल्ह्यात प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदापिकाची काढणी सुरु झाली आहे; मात्र दूषित हवामानाच्या प्रादुर्भावाने कांद्यावर पडलेल्या विविध रोग आणि पाणीटंचाईमुळे पिकाच्या उत्पादनात कमालीची घट जाणवू लागली आहे. पिकाचे घटलेले उत्पादन आणि नीचांकी पातळीवरील बाजारभावामुळे किमान पिकाच्या उत्पादनावरील भांडवलखर्च तरी भागेल का, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण होऊ लागला आहे. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. कांद्याचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांना उत्पादनखर्चही मिळेनासा झाला आहे.खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये आगाप लागवडयुक्त कांदा काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. कांदा रोपाचा व लागवडीकाळात पाण्याचा तुटवडा, मजुरांची टंचाई, दूषित हवामान, अवकाळी पाऊस, रोगराई, वाढलेल्या खतांच्या किमती यांसारख्या उद्भवलेल्या आपत्तीमुळे पिकाचा उत्पादनखर्च दुपटीने वाढला आहे. पिकाच्या लागवडीपासून पिकांवर कीड, मावा, तेल्या, पीळ रोगांचा प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी रासायनिक औषधांची फवारणी करून त्यावर आळा घालण्याचे प्रयत्न केले; परंतु सततच्या बदलत्या वातावरणापुढे तेही अपुरेच पडले आहेत. या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत एकरी उत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट झाली आहे. त्यातच शेतकºयांचा कांदा बाजारात जाताक्षणी पिकाचे दर किलोला अवघे ४ ते ७ रुपयांवर आल्याने शेतकºयांची निराशा होत आहे.मोठ्या मेहनतीने पिकाची जोपासना करून शेतकºयांनी उत्पादन घेतले असले तरीसुद्धा बाजारात पिकाला समाधानकारक भाव प्राप्त होत नसल्याने शेतकºयांच्या हाती काहीही लागत नसल्याची सत्यस्थिती आहे. भविष्यात बाजारभाव वाढेल,असा अनुमान लावून काही उत्पादक कांद्याची साठवणूक करीत आहेत; परंतु कांदा हे नाशवंत पीक असल्याने त्याची जास्त काळ साठवण करण्यात अडचण येते. परिणामी, आर्थिक गरजेपोटी ८० ते ८५ टक्के पीक उत्पादक शेतकºयांना कांदा काढणीनंतर मिळेल त्या भावात खपवावा लागत आहे. यामुळे कांदापिकाला हमीभाव ठरवून देण्याची मागणी केली जात आहे.महिन्यापूर्वी कांद्यास प्रतिकिलो ८ ते १० रुपये बाजारभाव मिळत होता; परंतु त्या वेळी शेतकºयांचा कांदा काढणीयोग्य झालेला नव्हता. सध्या शेतकºयांचा कांदा परिपक्व होऊन काढणीयोग्यझाला आहे. त्यामुळे तो काढणीनंतर विक्रीसाठी थेट बाजारात पाठविला जात आहे. मात्र सध्या बाजारात प्रतिकिलोला ४ ते ७ रुपयेअसा कवडीमोल बाजारभाव मिळत आहे.वर्षभरातील प्रमुख नगदी पिकांपैकी कांदा हे शेतकºयांचे आर्थिक उत्पन्नाचे ‘हुकुमी’ पीक आहे. परंतु पिकाला बाजारभावाची शाश्वती नसल्याने उत्पन्नाची खात्री ठेवता येत नाही. शासनाने कांद्याला आधारभूत हमीभाव ठरवून देणे निश्चितच फायदेशीर ठरेल. पिकाच्या उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्यालाचांगला बाजारभाव मिळणे अत्याआवश्यक आहे.- दिलीप मोहिते-पाटील,माजी आमदार खेड.