शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

कांद्याने केला वांधा; उत्पादनाचा खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 02:02 IST

कांदा उत्पादक शेतकरी संकटात

निमोणे : निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरात रब्बी हंगामातील कांदाकाढणी सुरू झाली असूनही, कवडीमोल बाजारभाव असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. निमोणे परिसरातील करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वीसह एकूणच शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होते. शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून आजपर्यंत याकडे पाहिले जात होते. तसे कांदा उत्पादन करणे जिकिरीचे, किचकट असून त्यासाठी खर्चही भरपूर येतो.एक एकर कांदा उत्पादनासाठी साधारण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. शिवाय, तालुक्यात औद्योगिक वसाहत असल्याने शेतीकामांसाठी स्थानिक मजुरांचा तोटा भासतो. त्यासाठी बाहेरून मजूर आणावे लागतात. त्यासाठी शेतकºयाला जादा पैसे मोजावे लागतात. शिवाय, विजेचा आणि चासकमानच्या पाण्याचा नेहमी लपंडाव असतो. यासाठीही शेतकºयाला मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्याच्या नदीकाठच्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून बागायती शेती व्यवसायामुळे जामिनाचा पोतच खराब झाला आहे. यामुळे उत्पादनक्षमता घटली आहे. किमान उत्पादन मिळविण्यासाठी जास्तीच्या खतांचा वापर करावा लागतो. तर, बदलत्या हवामानामुळे रोगराईचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. कमी प्रतीचा कांदा उत्पादन होते. त्याच्या निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर करावा लागतो आणि या सर्वांमुळे उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो.या एकरामधून साधारण २०० ते २५० पिशव्या कांदा निघतो. सध्याच्या ५ ते ७ रुपये प्रतिकिलोग्रॅम या बाजारभावाने त्याचे १० हजार ते १५ हजार रुपये मिळतात. म्हणजे एवढे पाच महिने काबाडकष्ट करूनही एकरी ३० ते ४० हजार रुपयांचा तोटा होतो. कमी प्रतीचा कांदा असेल तर पदरात दमडीही पडत नाही. बळीराजाला रिकाम्या हाताने परतावे लागते. सलग तीन वर्षांपासून ही स्थिती आहे. मागील वर्षीचा कांदा बाजारभावाच्या अपेक्षेने ठेवलेला तसाच पडून आहे. तो सडायला लागलाय. नवीन कांदापण काढणीला आलाय. या सर्व कांद्याचे करायचे काय? असा शेतकºयांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून शेतकरी कांदा फेकून देत असल्याने कर्जाचा डोंगर वाढतोय. या कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजा पुरता गाडला गेला आहे.या कांदाशेतीने शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे. कांदा उत्पादनच काय, पण शेतीच करावी की नाही? असा गहन प्रश्न शेतकºयापुढे यांपुढे निर्माण झाला आहे. शेती आणि शेतकरी संपविण्याचे शासनाचे हे धोरण आहे.- संतोष भाऊसाहेब काळे,कांदा उत्पादक शेतकरीसरकारने शेतकºयांवर आपल्याच तोंडात मारून घेण्याची वेळ आणली आहे. एवढ्या मोठ्या कष्टाने, रात्रीचा दिवस करून पिकविलेला कांदा मातीमोल भावाने विकताना शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. तर, काही शेतकरी वाटखर्चाला मोताद झाले आहेत. बळीराजाची ही क्रूर चेष्टा थांबण्याची गरज आहे.कर्जमाफी आणि पॅकेजच्या पोकळ घोषणा करून या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याऐवजी त्याच्या शेतमालास योग्य भाव दिल्यास कोणत्याही योजनेची या जगाच्या पोशिंद्याला गरज भासणार नाही, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :onionकांदा