शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कांद्याने केला वांधा; उत्पादनाचा खर्चही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 02:02 IST

कांदा उत्पादक शेतकरी संकटात

निमोणे : निमोणे (ता. शिरूर) आणि परिसरात रब्बी हंगामातील कांदाकाढणी सुरू झाली असूनही, कवडीमोल बाजारभाव असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. निमोणे परिसरातील करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वीसह एकूणच शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होते. शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून आजपर्यंत याकडे पाहिले जात होते. तसे कांदा उत्पादन करणे जिकिरीचे, किचकट असून त्यासाठी खर्चही भरपूर येतो.एक एकर कांदा उत्पादनासाठी साधारण ५० ते ६० हजार रुपये खर्च येतो. शिवाय, तालुक्यात औद्योगिक वसाहत असल्याने शेतीकामांसाठी स्थानिक मजुरांचा तोटा भासतो. त्यासाठी बाहेरून मजूर आणावे लागतात. त्यासाठी शेतकºयाला जादा पैसे मोजावे लागतात. शिवाय, विजेचा आणि चासकमानच्या पाण्याचा नेहमी लपंडाव असतो. यासाठीही शेतकºयाला मोठा संघर्ष करावा लागतो. तालुक्याच्या नदीकाठच्या गावांमध्ये अनेक वर्षांपासून बागायती शेती व्यवसायामुळे जामिनाचा पोतच खराब झाला आहे. यामुळे उत्पादनक्षमता घटली आहे. किमान उत्पादन मिळविण्यासाठी जास्तीच्या खतांचा वापर करावा लागतो. तर, बदलत्या हवामानामुळे रोगराईचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. कमी प्रतीचा कांदा उत्पादन होते. त्याच्या निवारणासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर करावा लागतो आणि या सर्वांमुळे उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो.या एकरामधून साधारण २०० ते २५० पिशव्या कांदा निघतो. सध्याच्या ५ ते ७ रुपये प्रतिकिलोग्रॅम या बाजारभावाने त्याचे १० हजार ते १५ हजार रुपये मिळतात. म्हणजे एवढे पाच महिने काबाडकष्ट करूनही एकरी ३० ते ४० हजार रुपयांचा तोटा होतो. कमी प्रतीचा कांदा असेल तर पदरात दमडीही पडत नाही. बळीराजाला रिकाम्या हाताने परतावे लागते. सलग तीन वर्षांपासून ही स्थिती आहे. मागील वर्षीचा कांदा बाजारभावाच्या अपेक्षेने ठेवलेला तसाच पडून आहे. तो सडायला लागलाय. नवीन कांदापण काढणीला आलाय. या सर्व कांद्याचे करायचे काय? असा शेतकºयांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांपासून शेतकरी कांदा फेकून देत असल्याने कर्जाचा डोंगर वाढतोय. या कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजा पुरता गाडला गेला आहे.या कांदाशेतीने शेतकºयांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे. कांदा उत्पादनच काय, पण शेतीच करावी की नाही? असा गहन प्रश्न शेतकºयापुढे यांपुढे निर्माण झाला आहे. शेती आणि शेतकरी संपविण्याचे शासनाचे हे धोरण आहे.- संतोष भाऊसाहेब काळे,कांदा उत्पादक शेतकरीसरकारने शेतकºयांवर आपल्याच तोंडात मारून घेण्याची वेळ आणली आहे. एवढ्या मोठ्या कष्टाने, रात्रीचा दिवस करून पिकविलेला कांदा मातीमोल भावाने विकताना शेतकºयांच्या डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. तर, काही शेतकरी वाटखर्चाला मोताद झाले आहेत. बळीराजाची ही क्रूर चेष्टा थांबण्याची गरज आहे.कर्जमाफी आणि पॅकेजच्या पोकळ घोषणा करून या बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याऐवजी त्याच्या शेतमालास योग्य भाव दिल्यास कोणत्याही योजनेची या जगाच्या पोशिंद्याला गरज भासणार नाही, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :onionकांदा