शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

प्लास्टिक कचरा पुनर्वापरासाठी शंभर सोसायट्या जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST

पुणे : प्लास्टिक कचऱ्याचे विघटन हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. यावर सागरमित्र आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी ...

पुणे : प्लास्टिक कचऱ्याचे विघटन हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. यावर सागरमित्र आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटरने ‘पी ४० के’ प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे शंभर सोसायट्यांमधून वर्षभरात ४० हजार किलो प्लास्टिक संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी प्लास्टिक पडलेले आढळते. नदी-नाल्यांमध्ये देखील प्लास्टिक फेकले जात असल्याने तेच जलस्रोतांमध्ये जाते. या प्लास्टिकमुळे जलचर व अन्य प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून शहरी सोसायट्यांमधला प्लास्टिक कचरा संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्याचे उद्दिष्ट ‘पी ४० के’ प्रकल्पात ठेवण्यात आले आहे.

‘सागरमित्र’चे विनोद बोधनकर आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटरचे के. सी. गर्ग यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, वर्षभरात किमान १०० सोसायट्यांमधून ४० हजार किलो प्लास्टिक संकलित केले जाणार आहे. आजमितीला दहा ते बारा सोसायट्या या प्रकल्पाशी जोडल्या आहेत. या सोसायट्यांकडून प्लास्टिक संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाईल.