शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगरा चेंगरीत एकाचा मृत्यू; दिवाळी सुट्टीत गाड्या न वाढविल्याचा परिणाम

By विवेक भुसे | Updated: October 22, 2022 23:28 IST

पुणे - दानापूर या बाराही महिने भरून वाहणार्या रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पुणे :

पुणे - दानापूर या बाराही महिने भरून वाहणार्या रेल्वेगाडीत चढताना झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यु झाला. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या चेंगराचेंगरीत आणखी एक जण गाडीखाली सापडल्याचे सांगण्यात येतेबौधा मांजी ऊर्फ यादव (वय २१) असे मृत्यु पावलेल्या प्रवाशाच्या नावे आहे. याबाबत रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले की, पुणे -दानापूर ही रेल्वे गाडी पुणे स्थानकावरील प्लॅटफाॅर्म १ वर येत होती. त्यावेळी जनरल डब्यात चढत असताना एका प्रवासी खाली पडला. त्यात तो बेशुद्ध झाला असून त्याला रेल्वे पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुणे - दानापूर या गाडी १२ ही महिने हाऊसफुल्ल असते. असे असतानाही यंदा दिवाळीच्या काळात मध्य रेल्वेने बिहारकडे जाणार्या गाड्यांमध्ये वाढ केली नाही. दानापूर गाडीला सुरुवातीला व शेवटीची असे प्रत्येकी २ -२ अनारक्षित डबे असतात. या डब्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. गाडी प्लॅटफॉर्मला लागत असताना शेवटच्या २ डब्यांमध्ये चढण्यासाठी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात मांजी हे खाली पडले. त्यांच्या अंगावरुन लोक डब्यात चढत होते. त्यात ते बेशुद्ध पडले. प्लॅटफॉर्म वरील लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांना कळविले. त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला. नंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित करण्यात आले.

बिहारकडे जाणार्या गाड्यांना नेहमीच प्रचंड गर्दी असते. त्यात दिवाळीत लोक घरी जाण्यासाठी या गाडीसाठी आले होते. गरीब कामगार, कष्टकरी प्रवाशांकडे रेल्वे नेहमीच दुर्लक्ष करुन एसी डबे वाढविले. त्यामुळे गावाकडे जाणार्या कष्टकर्यांचे मोठे हाल झाले. त्यातूनच आज चेंगराचेंगरी होऊन एका प्रवाशाला आपले प्राण गमवावे लागेल.

टॅग्स :Puneपुणे