शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

महाविद्यालयात उधळला जाणार निवडणुकीचा गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 19:55 IST

राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी निवडणूकांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना महाविद्यालयात चंचू प्रवेश करण्याची संधी मिळणार

पुणे: नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ व महाविद्यालयांमधील विद्यार्थी निवडणुका खुल्या पध्दतीने घेण्याची तरतुद करण्यात आली असून त्यासंदर्भातील परिनियम राज्य शासनास सादर करण्यात आले आहेत.राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमधूनच नेतृत्व करण्याची संधी मिळावी या उद्देशाने राज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या निवडणुका खुल्या पध्दतीने घ्याव्यात अशी मागणी विविध स्थरातून केली जात होती. तर विद्यार्थी निवडणूकामुळे महाविद्यालयात वाद निर्माण होतात.त्यामुळे निवडणूका घ्यायच्याच असतील तर सर्व खबरदारी घ्या, अशी मागणी प्राचार्य व प्राध्यापक संघटनांकडून केली जात होती.त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनांकडूनही त्यावर उलटसुलट चर्चा केली जात होती.मात्र,यंदा या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकीचे वारे वाहिलेले पाहायला मिळणार आहे.राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनाच या निवडणूकीचा भाग होता येणार आहे. तसेच राजकीय पक्षांना या निवडणुकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान,विद्यार्थी निवडणुकांसहित इतर विषयासंदर्भातील परिनियम जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी यांच्या समितीने तयार केले असून शासनास सादर केले आहेत.निवडणुकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये,अशी शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे.त्यामुळेच विधी व न्याय विभागाकडून विद्यार्थी निवडणुकांचे परिनियम तपासून झाल्यानंतर जुलै महिन्यात निवडणुका घेण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे,असेही सूत्रांनी सांगितले.------------प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थी निवडणुकांचे स्वागतच केले आहे. मात्र,राजकीय पक्ष किंवा झुंडशाही पध्दतीने महाविद्यालयाच्या आवारात घुसणा-यांना रोखण्याचे अधिकार प्राचार्यांकडे नाही.त्यामुळे विद्यार्थी निवडणुकांची जबाबदारी प्राचार्य व प्राध्यापकांकडे न देता महसूल किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी. पोलीस व महसूल यंत्रणेच्या सहकार्यानेच विद्यार्थी निवडणुका शांततेत पार पडू शकतील.प्रा.नंदकुमार निकम,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ-----------------------प्राध्यापक संघटनेने कधीही विद्यार्थी निवडणुकांना विरोध केला नाही. मात्र,प्राचार्य व प्राध्यापकांकडे अधिकार नसल्याने निवडणूकीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या आवारात अनुचित प्रकार घडतात.तसेच विद्यार्थी निवडणूकांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना महाविद्यालयात चंचू प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे.विद्यार्थी निवडणुका वगळता सर्वच निवडणुका महसूल व सहकार विभागाकडून घेतल्या जातात.त्यामुळे विद्यार्थी निवडणुका सुध्दा स्वतंत्र यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे.प्रा.एस.पी.लवांडे,सचिव ,एम.फुक्टो, महाराष्ट्र .........................विद्यार्थी निवडणुकीसंदर्भातील परिनियम विधी व न्याय विभागाकडे असून ते मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत.लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयात खुल्या विद्यार्थी निवडणुका घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.महाविद्यालय प्रवेशाची अंतिम मुदत १५ जुलै आहे.त्यामुळे निवडणूक  प्रक्रिया राबविण्यास अवधी आहे.- राजेश पांडे ,सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूक