शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

महाविद्यालयात उधळला जाणार निवडणुकीचा गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 19:55 IST

राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी निवडणूकांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना महाविद्यालयात चंचू प्रवेश करण्याची संधी मिळणार

पुणे: नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ व महाविद्यालयांमधील विद्यार्थी निवडणुका खुल्या पध्दतीने घेण्याची तरतुद करण्यात आली असून त्यासंदर्भातील परिनियम राज्य शासनास सादर करण्यात आले आहेत.राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून त्याची तपासणी सुरू असून येत्या जुलै महिन्यात त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदा महाविद्यालयांमध्ये निवडणुकीचा गुलाल उधळला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमधूनच नेतृत्व करण्याची संधी मिळावी या उद्देशाने राज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या निवडणुका खुल्या पध्दतीने घ्याव्यात अशी मागणी विविध स्थरातून केली जात होती. तर विद्यार्थी निवडणूकामुळे महाविद्यालयात वाद निर्माण होतात.त्यामुळे निवडणूका घ्यायच्याच असतील तर सर्व खबरदारी घ्या, अशी मागणी प्राचार्य व प्राध्यापक संघटनांकडून केली जात होती.त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनांकडूनही त्यावर उलटसुलट चर्चा केली जात होती.मात्र,यंदा या चर्चेला पूर्णविराम मिळणार असून महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकीचे वारे वाहिलेले पाहायला मिळणार आहे.राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांनाच या निवडणूकीचा भाग होता येणार आहे. तसेच राजकीय पक्षांना या निवडणुकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान,विद्यार्थी निवडणुकांसहित इतर विषयासंदर्भातील परिनियम जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.आर.एस.माळी यांच्या समितीने तयार केले असून शासनास सादर केले आहेत.निवडणुकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये,अशी शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे.त्यामुळेच विधी व न्याय विभागाकडून विद्यार्थी निवडणुकांचे परिनियम तपासून झाल्यानंतर जुलै महिन्यात निवडणुका घेण्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे,असेही सूत्रांनी सांगितले.------------प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थी निवडणुकांचे स्वागतच केले आहे. मात्र,राजकीय पक्ष किंवा झुंडशाही पध्दतीने महाविद्यालयाच्या आवारात घुसणा-यांना रोखण्याचे अधिकार प्राचार्यांकडे नाही.त्यामुळे विद्यार्थी निवडणुकांची जबाबदारी प्राचार्य व प्राध्यापकांकडे न देता महसूल किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी. पोलीस व महसूल यंत्रणेच्या सहकार्यानेच विद्यार्थी निवडणुका शांततेत पार पडू शकतील.प्रा.नंदकुमार निकम,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ-----------------------प्राध्यापक संघटनेने कधीही विद्यार्थी निवडणुकांना विरोध केला नाही. मात्र,प्राचार्य व प्राध्यापकांकडे अधिकार नसल्याने निवडणूकीच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या आवारात अनुचित प्रकार घडतात.तसेच विद्यार्थी निवडणूकांच्या माध्यमातून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना महाविद्यालयात चंचू प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे.विद्यार्थी निवडणुका वगळता सर्वच निवडणुका महसूल व सहकार विभागाकडून घेतल्या जातात.त्यामुळे विद्यार्थी निवडणुका सुध्दा स्वतंत्र यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे.प्रा.एस.पी.लवांडे,सचिव ,एम.फुक्टो, महाराष्ट्र .........................विद्यार्थी निवडणुकीसंदर्भातील परिनियम विधी व न्याय विभागाकडे असून ते मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत.लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयात खुल्या विद्यार्थी निवडणुका घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.महाविद्यालय प्रवेशाची अंतिम मुदत १५ जुलै आहे.त्यामुळे निवडणूक  प्रक्रिया राबविण्यास अवधी आहे.- राजेश पांडे ,सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूक