शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

बारामतीत ओल्या कचऱ्याची जागेवरच होणार विल्हेवाट; मिनी बायोगॅस प्रकल्पामुळे खर्चात बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 16:34 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिनी बायोगॅस प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून दैनंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यामधून बायोगॅस निर्मिती केली जाते...

बारामती (पुणे) :बारामती नगरपरिषदेने ओल्या कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच लावण्याच्या दृष्टिकोनातून आता बारामती नगरपालिकेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील मोठी हॉटेल्स व मोठ्या गृहनिर्माण संस्था यामध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नगरपालिकेने कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या खर्चात बचत होत आहे.

बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, शहरातील प्रदूषण कमी होण्यासाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्प राबविला जात आहे. बँक ऑफ बडोदा व बारामती नगरपरिषद बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिनी बायोगॅस प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून दैनंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यामधून बायोगॅस निर्मिती केली जाते. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वयंपाकघरातील तसेच हॉटेलमधील किचनमध्ये दररोज तयार होणाऱ्या या कचऱ्याचे करायचं काय, हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो; पण हाच निर्माण झालेला ओला कचरा निर्मिती स्थळी योग्य प्रक्रिया करून बायोगॅसच्या रूपाने स्वयंपाकासाठी वापरता येतो. त्यामुळे खर्चात बचत होते.

शहरातील हॉटेल मधुबन, हॉटेल सुदित, कलावती अपार्टमेंट येथे बायोगॅस निर्मितीची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये बँक ऑफ बडोदाने सीएसआर फंडातून बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक यंत्रणा खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के आर्थिक सहाय्य केले आहे. उर्वरित पन्नास टक्के रक्कम संबंधित हॉटेल व्यावसायिक व सोसायटी यांनी दिले आहे.

हॉटेल, सोसायटीमध्ये दैनंदिन तयार होणारा ओला कचरा म्हणजेच शिळे अन्न व इतर ओला कचरा हा त्याच ठिकाणी त्या यंत्रणेमध्ये टाकण्यात येतो. तसेच त्याच्यापासून गॅस निर्मिती केली जाते. त्याचा पुरेपूर फायदा हॉटेल व्यावसायिक आणि सोसायटी यांना होत आहे. ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया झाल्याने या कचऱ्याची वाहतूक व कचरा शहरातील प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेण्याचा ताण कमी होणार आहे. तसेच निर्मितीस्थळी प्रक्रिया केल्याने कचरा साठून राहत नाही. याशिवाय प्रक्रिया केल्यामुळे संबंधित हॉटेल व सोसायटी यांना बायोगॅस मोफत प्राप्त होत आहे. दैनंदिन वापरासाठी लागणारा एलपीजी गॅस सिलिंडर हा कमी प्रमाणात लागतो. परिणामी, त्यांच्या पैशाची बचत होत आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड