शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बारामतीत ओल्या कचऱ्याची जागेवरच होणार विल्हेवाट; मिनी बायोगॅस प्रकल्पामुळे खर्चात बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 16:34 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिनी बायोगॅस प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून दैनंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यामधून बायोगॅस निर्मिती केली जाते...

बारामती (पुणे) :बारामती नगरपरिषदेने ओल्या कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच लावण्याच्या दृष्टिकोनातून आता बारामती नगरपालिकेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील मोठी हॉटेल्स व मोठ्या गृहनिर्माण संस्था यामध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नगरपालिकेने कार्यान्वित केले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या खर्चात बचत होत आहे.

बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, शहरातील प्रदूषण कमी होण्यासाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्प राबविला जात आहे. बँक ऑफ बडोदा व बारामती नगरपरिषद बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मिनी बायोगॅस प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून दैनंदिन निघणाऱ्या ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यामधून बायोगॅस निर्मिती केली जाते. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. स्वयंपाकघरातील तसेच हॉटेलमधील किचनमध्ये दररोज तयार होणाऱ्या या कचऱ्याचे करायचं काय, हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो; पण हाच निर्माण झालेला ओला कचरा निर्मिती स्थळी योग्य प्रक्रिया करून बायोगॅसच्या रूपाने स्वयंपाकासाठी वापरता येतो. त्यामुळे खर्चात बचत होते.

शहरातील हॉटेल मधुबन, हॉटेल सुदित, कलावती अपार्टमेंट येथे बायोगॅस निर्मितीची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये बँक ऑफ बडोदाने सीएसआर फंडातून बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक यंत्रणा खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के आर्थिक सहाय्य केले आहे. उर्वरित पन्नास टक्के रक्कम संबंधित हॉटेल व्यावसायिक व सोसायटी यांनी दिले आहे.

हॉटेल, सोसायटीमध्ये दैनंदिन तयार होणारा ओला कचरा म्हणजेच शिळे अन्न व इतर ओला कचरा हा त्याच ठिकाणी त्या यंत्रणेमध्ये टाकण्यात येतो. तसेच त्याच्यापासून गॅस निर्मिती केली जाते. त्याचा पुरेपूर फायदा हॉटेल व्यावसायिक आणि सोसायटी यांना होत आहे. ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया झाल्याने या कचऱ्याची वाहतूक व कचरा शहरातील प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेण्याचा ताण कमी होणार आहे. तसेच निर्मितीस्थळी प्रक्रिया केल्याने कचरा साठून राहत नाही. याशिवाय प्रक्रिया केल्यामुळे संबंधित हॉटेल व सोसायटी यांना बायोगॅस मोफत प्राप्त होत आहे. दैनंदिन वापरासाठी लागणारा एलपीजी गॅस सिलिंडर हा कमी प्रमाणात लागतो. परिणामी, त्यांच्या पैशाची बचत होत आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड