शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले

By admin | Updated: October 13, 2015 00:44 IST

पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही, असा पवित्रा घेत पिंपरी सांडस पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सर्वपक्षीय

पिंपरी सांडस : पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही, असा पवित्रा घेत पिंपरी सांडस पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सर्वपक्षीय कृती समितीने आज मोजणी करण्यासाठी आलेल्या पुणे महापालिका व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना तीव्र विरोध केला. सुमारे दीड हजार ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या संतप्त भूमिका पाहून अधिकाऱ्यांनी परत जाणे पसंत केले.येथील गट. क्र . ४९३ मधील वन विभागाच्या जागेत हा कचरा प्रकल्प प्र्रस्तावित आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी आंदोलने, मोर्चे काढून आपला विरोध दर्शवला आहे. आज (१२ आॅक्टोबर) कचरा डेपोसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोजणी करण्याचे ठरवले होते. तशा प्रकारचे पत्र त्यांनी लोणी कंद पोलीस स्टेशनला देऊन संरक्षणामधे मोजणी करणार होते. अधिकारी येणार असल्याची कुणकूण लागताच पंचक्रोशीतील सुमारे दीड हजार ग्रामस्थ येथे ठिय्या मांडून होते. अधिकारी आल्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.आम्ही या कचरा डेपोला विरोध म्हणून आतापर्यंत अनेक निवेदने, आंदोलने, मोर्चे काढले; मात्र तरीही ही प्रक्रिया पुढे सरकत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मध्यस्थी करीत जमावाला शांत केले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मोजणी रद्द केली. या वेळी ग्रामस्थ संतप्त होते. पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही केली असती तर जमावाच्या तीव्र भावनांना सामोरे जावे लागले असते. या वेळी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, पंचायत समिती उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, कृती समिती अध्यक्ष विकास लवांडे, शिवसेना तालुकाप्रमुख दौलत पायगुडे, शांताराम कटके, शिवदास उबाळे, कुशाभाऊ गावडे, चंद्रकांत सातव, संजय पायगुडे, विजय पायगुडे, संजय भोरडे, महेश शिंदे, वाल्मीकराव भोरडे, श्रीहरी कोतवाल, सीताराम बाजारे, सुभाष कोतवाल, सतीश भोरडे, राजुअण्णा भोरडे, रवींद्र कंद, रामदास ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, शंकर मांडे, बाळासो भोरडे, प्रकाश भोरडे, सुवर्णा गजरे, अंकुश कोतवाल, विकास कोतवाल, शंकर भोरडे, संपत भोरडे, दत्तात्रय सातव, प्रकाश जमादार, राजेश वारघडे, पांडुरंग हरगुडे, गणेश कुटे यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)आता आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. सरकारने बळाचा वापर केला तर प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ; पण पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आणि याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी व पालकमंत्री राहतील.- विकास लवांडे, अध्यक्ष (कृती समिती )