शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

वीज दरवाढी विरोधात हरकत : ढिसाळ सेवा असताना दरवाढीचो बोजा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:50 IST

महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये शंभर ते अडीचशे टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देइतर राज्यांच्या तुलनेने वीज दर २० आणि घरगुती ग्राहकांचे दर २५ टक्क्यांनी जास्त बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी वीज नियामक आयोगाकडे विनंती

पुणे : देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांचे वीज दर २० आणि घरगुती ग्राहकांचे (३०० युनिट्स मासिक वापर असणारे ) दर २५ टक्क्यांनी जास्त आहेत. त्याचा खुलासा महावितरणला देण्यास भाग पाडावे, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने वीज नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे. महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये शंभर ते अडीचशे टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच १०० युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या मासिक वीजबिलात किमान २५ ते तीनशे टक्के, १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या मासिक वीजबिलात किमान दहा ते कमाल तीस टक्के वाढ होईल. या ग्राहकांसाठी ही वाढ फार मोठी असेल. त्यामुळे १०० युनिट वीज वापर असणाºया ग्राहकांच्या स्थिर आकारात कोणतीही वाढ करू नये. तसेच १०१ ते ३०० युनिट मासिक वीज वापर असणाºया ग्राहकांना स्थिर आकारात जास्तीत जास्त दहा टक्के वाढ करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. राज्यातील १ मेगावॅटच्या पुढे वीज वापर असणारे ग्राहक महावितरणच्या महागड्या आणि बेभरवशाच्या वीज सेवेमुळे ओपन अ‍ॅक्सेसकडे वळाले आहेत. त्यामुळे महावितरण कडून वीज घेत नसल्याने त्यांच्या स्थिर आकारात वाढ करणे चुकीचे आहे. एकीकडे केंद्र सरकार सौर उर्जेच्या वापरास प्रोत्साहन देत असताना महावितरणचा कारभार मात्र, ग्राहकांनी त्याकडे वळूच नये अशा प्रकारचा आहे. नेटमीटर महावितरणने मोफत बसवणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या तीन वर्षात शहरात १० हजारहून अधिक ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवली. त्यातील एकाही ग्राहकाला महावितरणने नेट मीटर दिलेला नाही. ग्राहकांना स्वत:च्या खर्चाने मीटर बसवावे लागले आहेत. त्यानंतरही महावितरणकडून योग्य बिल मिळायला चार महिने वाट पाहावी लागते. महावितरणच्या सेवेबाबत वाढत्या तक्रारी असताना त्यांना वीज दरवाढ का द्यावी असा सवाल सजग नागरीक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती वीज नियामक आयोगाकडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणSajag Nagrik Manchसजग नागरिक मंचVivek Velankarविवेक वेलणकर