शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

वीज दरवाढी विरोधात हरकत : ढिसाळ सेवा असताना दरवाढीचो बोजा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:50 IST

महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये शंभर ते अडीचशे टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

ठळक मुद्देइतर राज्यांच्या तुलनेने वीज दर २० आणि घरगुती ग्राहकांचे दर २५ टक्क्यांनी जास्त बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी वीज नियामक आयोगाकडे विनंती

पुणे : देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांचे वीज दर २० आणि घरगुती ग्राहकांचे (३०० युनिट्स मासिक वापर असणारे ) दर २५ टक्क्यांनी जास्त आहेत. त्याचा खुलासा महावितरणला देण्यास भाग पाडावे, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने वीज नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे. महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये शंभर ते अडीचशे टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच १०० युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या मासिक वीजबिलात किमान २५ ते तीनशे टक्के, १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या मासिक वीजबिलात किमान दहा ते कमाल तीस टक्के वाढ होईल. या ग्राहकांसाठी ही वाढ फार मोठी असेल. त्यामुळे १०० युनिट वीज वापर असणाºया ग्राहकांच्या स्थिर आकारात कोणतीही वाढ करू नये. तसेच १०१ ते ३०० युनिट मासिक वीज वापर असणाºया ग्राहकांना स्थिर आकारात जास्तीत जास्त दहा टक्के वाढ करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. राज्यातील १ मेगावॅटच्या पुढे वीज वापर असणारे ग्राहक महावितरणच्या महागड्या आणि बेभरवशाच्या वीज सेवेमुळे ओपन अ‍ॅक्सेसकडे वळाले आहेत. त्यामुळे महावितरण कडून वीज घेत नसल्याने त्यांच्या स्थिर आकारात वाढ करणे चुकीचे आहे. एकीकडे केंद्र सरकार सौर उर्जेच्या वापरास प्रोत्साहन देत असताना महावितरणचा कारभार मात्र, ग्राहकांनी त्याकडे वळूच नये अशा प्रकारचा आहे. नेटमीटर महावितरणने मोफत बसवणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या तीन वर्षात शहरात १० हजारहून अधिक ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवली. त्यातील एकाही ग्राहकाला महावितरणने नेट मीटर दिलेला नाही. ग्राहकांना स्वत:च्या खर्चाने मीटर बसवावे लागले आहेत. त्यानंतरही महावितरणकडून योग्य बिल मिळायला चार महिने वाट पाहावी लागते. महावितरणच्या सेवेबाबत वाढत्या तक्रारी असताना त्यांना वीज दरवाढ का द्यावी असा सवाल सजग नागरीक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती वीज नियामक आयोगाकडे केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणSajag Nagrik Manchसजग नागरिक मंचVivek Velankarविवेक वेलणकर