शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल, मनोज जरांगे-पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:32 IST

पुस्तके नव्हे; माणसाच्या जीवनातल्या अडचणी वाचल्या...

पुणे : आम्ही मंडल आयोगाला आव्हान देऊ शकतो. जर आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल. जे आम्हाला करायचे नाही. राजकीय हव्यासापोटी गरीब मुलांचे नुकसान करू नका, असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या’, असे म्हणणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले.

कुणबी असल्याच्या ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. या शासकीय नोंदींना कुणी आव्हान देऊ शकत नाही. सरकारने आमची फसवणूक केली नाही. जे असे म्हणत आहेत ते चुकीचे आहे. पंधरा दिवसांत मसुद्याचे कायद्यात रूपांतर होईल, असा दावाही जरांगे यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. आजवर तिसऱ्यांदा मराठा आरक्षण रद्द केले आहे. कधी पुढच्या तर कधी मागच्या दारातून आरक्षणाला विरोध केला गेला आहे. प्रत्येक वेळी आकस धरावा असे नाही. पहिल्यांदा ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. या अधिकृत शासकीय नोंदी आहेत. सरकारने ३७ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा आरक्षणाचा लाभार्थी ठरत आहे. या जुन्या की नवीन नोंदी आहेत हे सरकार सांगत नाही. आमच्या मते नोंदी जुन्याच आहेत. पण त्या नव्याने सापडल्या आहेत. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. कायद्यामार्फत सगेसोयरे प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा एकदा महादिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच एक मोठी जाहीर सभाही घेतली जाणार आहे. असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत त्या आम्हालाही मिळाव्यात. आम्ही झुंडशाहीने वागत नसून, केवळ आमचा हक्क मागत आहोत. कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच येत्या १० फेब्रुवारीपासून उपोषणास बसणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

पुस्तके नव्हे; माणसाच्या जीवनातल्या अडचणी वाचल्या

मी प्रथम नेतृत्व हाती घेतले नाही. मला नेतृत्व नको होते. मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आंदोलन प्रामाणिकपणे केले पाहिजे अशी माझी भावना होती. मला कोणताही राजकीय वारसा नाही. येवल्यातला माणूस म्हणाला की मी पाचवी शिकलो आहे. सरकारने माझी सगळी माहिती काढली. मी बारावी शिकलो आहे. भलेही पुस्तके वाचली नसतील पण मी माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी वाचल्या आहेत, अशी भावना जरांगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील