शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल, मनोज जरांगे-पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:32 IST

पुस्तके नव्हे; माणसाच्या जीवनातल्या अडचणी वाचल्या...

पुणे : आम्ही मंडल आयोगाला आव्हान देऊ शकतो. जर आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल. जे आम्हाला करायचे नाही. राजकीय हव्यासापोटी गरीब मुलांचे नुकसान करू नका, असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या’, असे म्हणणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले.

कुणबी असल्याच्या ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. या शासकीय नोंदींना कुणी आव्हान देऊ शकत नाही. सरकारने आमची फसवणूक केली नाही. जे असे म्हणत आहेत ते चुकीचे आहे. पंधरा दिवसांत मसुद्याचे कायद्यात रूपांतर होईल, असा दावाही जरांगे यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. आजवर तिसऱ्यांदा मराठा आरक्षण रद्द केले आहे. कधी पुढच्या तर कधी मागच्या दारातून आरक्षणाला विरोध केला गेला आहे. प्रत्येक वेळी आकस धरावा असे नाही. पहिल्यांदा ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. या अधिकृत शासकीय नोंदी आहेत. सरकारने ३७ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा आरक्षणाचा लाभार्थी ठरत आहे. या जुन्या की नवीन नोंदी आहेत हे सरकार सांगत नाही. आमच्या मते नोंदी जुन्याच आहेत. पण त्या नव्याने सापडल्या आहेत. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. कायद्यामार्फत सगेसोयरे प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा एकदा महादिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच एक मोठी जाहीर सभाही घेतली जाणार आहे. असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत त्या आम्हालाही मिळाव्यात. आम्ही झुंडशाहीने वागत नसून, केवळ आमचा हक्क मागत आहोत. कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच येत्या १० फेब्रुवारीपासून उपोषणास बसणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

पुस्तके नव्हे; माणसाच्या जीवनातल्या अडचणी वाचल्या

मी प्रथम नेतृत्व हाती घेतले नाही. मला नेतृत्व नको होते. मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आंदोलन प्रामाणिकपणे केले पाहिजे अशी माझी भावना होती. मला कोणताही राजकीय वारसा नाही. येवल्यातला माणूस म्हणाला की मी पाचवी शिकलो आहे. सरकारने माझी सगळी माहिती काढली. मी बारावी शिकलो आहे. भलेही पुस्तके वाचली नसतील पण मी माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी वाचल्या आहेत, अशी भावना जरांगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील