शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल, मनोज जरांगे-पाटील यांचे भुजबळांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:32 IST

पुस्तके नव्हे; माणसाच्या जीवनातल्या अडचणी वाचल्या...

पुणे : आम्ही मंडल आयोगाला आव्हान देऊ शकतो. जर आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल. जे आम्हाला करायचे नाही. राजकीय हव्यासापोटी गरीब मुलांचे नुकसान करू नका, असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या’, असे म्हणणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले.

कुणबी असल्याच्या ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. या शासकीय नोंदींना कुणी आव्हान देऊ शकत नाही. सरकारने आमची फसवणूक केली नाही. जे असे म्हणत आहेत ते चुकीचे आहे. पंधरा दिवसांत मसुद्याचे कायद्यात रूपांतर होईल, असा दावाही जरांगे यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. आजवर तिसऱ्यांदा मराठा आरक्षण रद्द केले आहे. कधी पुढच्या तर कधी मागच्या दारातून आरक्षणाला विरोध केला गेला आहे. प्रत्येक वेळी आकस धरावा असे नाही. पहिल्यांदा ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. या अधिकृत शासकीय नोंदी आहेत. सरकारने ३७ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा आरक्षणाचा लाभार्थी ठरत आहे. या जुन्या की नवीन नोंदी आहेत हे सरकार सांगत नाही. आमच्या मते नोंदी जुन्याच आहेत. पण त्या नव्याने सापडल्या आहेत. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. कायद्यामार्फत सगेसोयरे प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा एकदा महादिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच एक मोठी जाहीर सभाही घेतली जाणार आहे. असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.

ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत त्या आम्हालाही मिळाव्यात. आम्ही झुंडशाहीने वागत नसून, केवळ आमचा हक्क मागत आहोत. कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच येत्या १० फेब्रुवारीपासून उपोषणास बसणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

पुस्तके नव्हे; माणसाच्या जीवनातल्या अडचणी वाचल्या

मी प्रथम नेतृत्व हाती घेतले नाही. मला नेतृत्व नको होते. मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आंदोलन प्रामाणिकपणे केले पाहिजे अशी माझी भावना होती. मला कोणताही राजकीय वारसा नाही. येवल्यातला माणूस म्हणाला की मी पाचवी शिकलो आहे. सरकारने माझी सगळी माहिती काढली. मी बारावी शिकलो आहे. भलेही पुस्तके वाचली नसतील पण मी माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी वाचल्या आहेत, अशी भावना जरांगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील