शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अतिश्रीमंतांची संख्या भारतात ६३ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या भारतात ११३ अब्जाधीश आहेत. सन २०२५ पर्यंत ही संख्या १६२ वर जाऊन पोहोचणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या भारतात ११३ अब्जाधीश आहेत. सन २०२५ पर्यंत ही संख्या १६२ वर जाऊन पोहोचणार आहे. तसेच देशातल्या अतिश्रीमंतांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढणार आहे.

नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय मालमत्ता कन्सल्टन्सीच्या ‘वेल्थ रिपोर्ट २०२१’ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ज्यांची मालमत्ता ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा भारतीयांची संख्या येत्या पाच वर्षांत ६३ टक्क्यांनी वाढून ११ हजार १९८ पर्यंत पोहोचणार आहे. सध्या या अतिश्रीमंतांची संख्या देशात ६ हजार ८८४ आहे.

अतिश्रीमंत लोक काय खरेदी करतात, याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार दागिन्यांना सर्वाधिक प्राधान्य राहिले आहे. त्यापाठोपाठ पेंटिंग्ज, घड्याळे, वाइन आणि ‘क्लासिक कार्स’ची खरेदी अतिश्रीमंत वर्गाला महत्त्वाची वाटत असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर दुर्मिळ व्हिस्कीच्या ऐवजी वाइनला जास्त प्राधान्य असल्याचे स्पष्ट झाले. भारतातले ४६ टक्के अतिश्रीमंत पर्यावरणात्मक, सामाजिक आणि प्रशासनात्मक आधारित मालमत्ता गुंतवणुकीत स्वारस्य राखणारे आहेत.

नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “महामारीनंतर आर्थिक कार्यसंचालन तिच्‍या कार्यक्षमतेच्‍या उच्‍च पातळ्यांपर्यंत पोहोचत असताना भारत पुढील पाच वर्षांत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स समूहामध्‍ये प्रवेश करण्‍याचा प्रयत्‍न करेल. देशात नवश्रीमंतांची भर पडेल.”

चौकट

मालमत्ता निर्मिती

जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असतानाही सन २०२० मध्ये अतिश्रीमंत भारतीयांच्या मालमत्तेत ५९ टक्के वाढ झाली आढळले. तसेच ९१ टक्के अतिश्रीमंत भारतीयांना यंदाच्या म्हणजेच २०२१ मध्येही आपल्या मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता वाटत आहे. नाइट फ्रँकच्या अंदाजानुसार, येत्या चार वर्षांत आशियामधल्या अतिश्रीमंतांची संख्या सर्वाधिक वाढणार आहे. यात इंडोनेशिया (६७ टक्के) आणि भारत (६३ टक्के) यांचा प्रामुख्याने समावेश असेल.