शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अतिश्रीमंतांची संख्या भारतात ६३ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या भारतात ११३ अब्जाधीश आहेत. सन २०२५ पर्यंत ही संख्या १६२ वर जाऊन पोहोचणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या भारतात ११३ अब्जाधीश आहेत. सन २०२५ पर्यंत ही संख्या १६२ वर जाऊन पोहोचणार आहे. तसेच देशातल्या अतिश्रीमंतांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढणार आहे.

नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय मालमत्ता कन्सल्टन्सीच्या ‘वेल्थ रिपोर्ट २०२१’ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ज्यांची मालमत्ता ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा भारतीयांची संख्या येत्या पाच वर्षांत ६३ टक्क्यांनी वाढून ११ हजार १९८ पर्यंत पोहोचणार आहे. सध्या या अतिश्रीमंतांची संख्या देशात ६ हजार ८८४ आहे.

अतिश्रीमंत लोक काय खरेदी करतात, याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार दागिन्यांना सर्वाधिक प्राधान्य राहिले आहे. त्यापाठोपाठ पेंटिंग्ज, घड्याळे, वाइन आणि ‘क्लासिक कार्स’ची खरेदी अतिश्रीमंत वर्गाला महत्त्वाची वाटत असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर दुर्मिळ व्हिस्कीच्या ऐवजी वाइनला जास्त प्राधान्य असल्याचे स्पष्ट झाले. भारतातले ४६ टक्के अतिश्रीमंत पर्यावरणात्मक, सामाजिक आणि प्रशासनात्मक आधारित मालमत्ता गुंतवणुकीत स्वारस्य राखणारे आहेत.

नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “महामारीनंतर आर्थिक कार्यसंचालन तिच्‍या कार्यक्षमतेच्‍या उच्‍च पातळ्यांपर्यंत पोहोचत असताना भारत पुढील पाच वर्षांत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स समूहामध्‍ये प्रवेश करण्‍याचा प्रयत्‍न करेल. देशात नवश्रीमंतांची भर पडेल.”

चौकट

मालमत्ता निर्मिती

जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असतानाही सन २०२० मध्ये अतिश्रीमंत भारतीयांच्या मालमत्तेत ५९ टक्के वाढ झाली आढळले. तसेच ९१ टक्के अतिश्रीमंत भारतीयांना यंदाच्या म्हणजेच २०२१ मध्येही आपल्या मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता वाटत आहे. नाइट फ्रँकच्या अंदाजानुसार, येत्या चार वर्षांत आशियामधल्या अतिश्रीमंतांची संख्या सर्वाधिक वाढणार आहे. यात इंडोनेशिया (६७ टक्के) आणि भारत (६३ टक्के) यांचा प्रामुख्याने समावेश असेल.