शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

अतिश्रीमंतांची संख्या भारतात ६३ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या भारतात ११३ अब्जाधीश आहेत. सन २०२५ पर्यंत ही संख्या १६२ वर जाऊन पोहोचणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या भारतात ११३ अब्जाधीश आहेत. सन २०२५ पर्यंत ही संख्या १६२ वर जाऊन पोहोचणार आहे. तसेच देशातल्या अतिश्रीमंतांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढणार आहे.

नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय मालमत्ता कन्सल्टन्सीच्या ‘वेल्थ रिपोर्ट २०२१’ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ज्यांची मालमत्ता ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा भारतीयांची संख्या येत्या पाच वर्षांत ६३ टक्क्यांनी वाढून ११ हजार १९८ पर्यंत पोहोचणार आहे. सध्या या अतिश्रीमंतांची संख्या देशात ६ हजार ८८४ आहे.

अतिश्रीमंत लोक काय खरेदी करतात, याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार दागिन्यांना सर्वाधिक प्राधान्य राहिले आहे. त्यापाठोपाठ पेंटिंग्ज, घड्याळे, वाइन आणि ‘क्लासिक कार्स’ची खरेदी अतिश्रीमंत वर्गाला महत्त्वाची वाटत असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर दुर्मिळ व्हिस्कीच्या ऐवजी वाइनला जास्त प्राधान्य असल्याचे स्पष्ट झाले. भारतातले ४६ टक्के अतिश्रीमंत पर्यावरणात्मक, सामाजिक आणि प्रशासनात्मक आधारित मालमत्ता गुंतवणुकीत स्वारस्य राखणारे आहेत.

नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, “महामारीनंतर आर्थिक कार्यसंचालन तिच्‍या कार्यक्षमतेच्‍या उच्‍च पातळ्यांपर्यंत पोहोचत असताना भारत पुढील पाच वर्षांत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स समूहामध्‍ये प्रवेश करण्‍याचा प्रयत्‍न करेल. देशात नवश्रीमंतांची भर पडेल.”

चौकट

मालमत्ता निर्मिती

जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता असतानाही सन २०२० मध्ये अतिश्रीमंत भारतीयांच्या मालमत्तेत ५९ टक्के वाढ झाली आढळले. तसेच ९१ टक्के अतिश्रीमंत भारतीयांना यंदाच्या म्हणजेच २०२१ मध्येही आपल्या मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता वाटत आहे. नाइट फ्रँकच्या अंदाजानुसार, येत्या चार वर्षांत आशियामधल्या अतिश्रीमंतांची संख्या सर्वाधिक वाढणार आहे. यात इंडोनेशिया (६७ टक्के) आणि भारत (६३ टक्के) यांचा प्रामुख्याने समावेश असेल.