शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

"आता देशात बदलाचे वातावरण; कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 09:45 IST

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचं वक्तव्य.

बारामती : पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही,ते जगजाहीर आहे. कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला... बदल होण्यास अनुकूल वातावरण निर्मिती होत आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की आता निष्कर्ष काढणे योग्य नाही,एकूण निवडणुकांवरून देशात बदलाचे वारे दिसत आहेत. निवडणुका येतील त्यावेळी लोक सर्व निवडणुकांच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरूर करतील.

मी दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याच्या बाजार भावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला, त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. शिंदे आणि फडणवीस सरकार कांदा उत्पादकांबाबत ‘करतो करतो’ म्हणतात, प्रत्यक्षात निर्णय घेत नाही, अशी टीका पवार यांनी केली.

सर्वोच्च न्यायालाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आहेत, मुख्य म्हणजे विरोधी पक्षनेता ही यामध्ये आला, या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. हा लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे.शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस