शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"आता देशात बदलाचे वातावरण; कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला हे जगजाहीर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 09:45 IST

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचं वक्तव्य.

बारामती : पुण्याच्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही,ते जगजाहीर आहे. कसबा कोणाचा होता, लोकांनी काय निर्णय घेतला... बदल होण्यास अनुकूल वातावरण निर्मिती होत आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, की आता निष्कर्ष काढणे योग्य नाही,एकूण निवडणुकांवरून देशात बदलाचे वारे दिसत आहेत. निवडणुका येतील त्यावेळी लोक सर्व निवडणुकांच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरूर करतील.

मी दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. काही ठिकाणी कांदा फेकून दिल्याने अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंबंधीचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याच्या बाजार भावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने कांदा खरेदी केला, त्याच्यातून अधिकचा आर्थिक बोजा उचलला. शिंदे आणि फडणवीस सरकार कांदा उत्पादकांबाबत ‘करतो करतो’ म्हणतात, प्रत्यक्षात निर्णय घेत नाही, अशी टीका पवार यांनी केली.

सर्वोच्च न्यायालाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल केला. त्यामध्ये नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आहेत, मुख्य म्हणजे विरोधी पक्षनेता ही यामध्ये आला, या सर्वांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले. हा लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे.शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस