शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

.....यापुढे परराज्यातील विद्यार्थ्यांवर मनसे नजर ठेवेल : राज ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 15:11 IST

मराठी मुलांना डावलून परराज्यातील मुलांना प्रवेश दिला तर मनसे त्यांच्यावर नजर ठेवेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे..

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या आदेशावर राज्य चालले आहे असल्याचा आरोपदुधाचे आंदोलन होणार हे माहिती असताना राज्य सरकारने बैठक का घेतली नाही

पुणे : राज्यातील मराठी मुलांना वैद्यकीय शाखेसाठी प्रवेशाला प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राने कायदा करावा. मराठी मुलांना डावलून परराज्यातील मुलांना प्रवेश दिला तर मनसे त्यांच्यावर नजर ठेवेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. ही धमकी समजायची असेल तर तसे समजा असे ते म्हणाले. तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांनी नीट परीक्षेसाठी त्यांच्या मुलांना प्राधान्य मिळावे यासाठी कायदा केला. राज्यात तसा कायदा नाही. कोणीतरी न्यायालयात गेले तर न्यायालयाने मराठी मुलांच्या प्रवेशालाही स्थगिती दिली. मागील वर्षीही हेच झाले होते. याही वर्षी तेच होत आहे. राज्य सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. केंद्र सरकारच्या आदेशावर राज्य चालले आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. इयत्ता १० वी व १२ वी राज्यातील शाळांमधून झाला असेल तरीही रहिवाशी असल्याचा दाखला मराठी मुलांना मागितला जातो. केंद्राला त्यांच्या राज्यातील विशेषत: गुजरातमधील मुले राज्यात घुसवायची आहेत. दरवर्षी मराठी मुलांवर हा अन्याय होत आहे. तामिळनाडू मध्ये तेथील मुलांना त्यांच्या भाषेत नीटची परिक्षा देता आली. त्यात चार प्रश्न चुकीचे होते. त्याविरोधात तेथील खासदार न्यायालयात गेले. न्यायालयाने प्रत्येक परीक्षार्थी विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नांचे चार गूण देण्याचा आदेश दिला. आपले खासदार, आमदार काय करतात असा सवाल ठाकरे यांनी केला. राज्य सरकार त्यांचे काम नीट करत नाही. त्यांना केंद्राकडून आदेश येतात व ते त्याचे पालन करतात असे सगळे सुरू आहे. मराठी मुलांना फक्त नीट मध्येच नाही तर उद्योग व्यवसायातही डावलले जात आहे. वैद्यकीय परिक्षा सरकारने गंभीरपणे घेतली पाहिजे, अन्य राज्यांनी त्यांच्या मुलांना प्राधान्य मिळावे यासाठी कायदा केला. राज्य सरकार मात्र काहीही करत नाही. त्यांच्या या धोरणामुळे परराज्यातील मुलांना महाराष्ट्रात प्रवेश मिळतात. आमचे त्यांचे काही वाकडे नाही, मात्र मराठी मुलांना प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यातून जागा शिल्लक राहिल्या तर त्यांना द्या.राज्यातील शिक्षणसंस्थाचालक परराज्यातील मुलांना प्रवेश देतात याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी शिक्षणसंस्था चालकांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन केले होते, पुन्हा करू, त्यावेळी तुम्हा आमच्याकडे लक्ष द्या असे आवाहन ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना केले. संस्थाचालक लक्ष देत नाहीत, राज्य सरकार लक्ष देत नाही, मग परराज्यातील मुले महाराष्ट्रात आली तर आम्ही मात्र त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ असा इशारा ठाकरे यांनी दिला. ....................दुधाचे आंदोलन होणार हे माहिती असताना राज्य सरकारने बैठक का घेतली नाही. इथे दूध संकलन होते, त्यांना भाव दिला तर सरकारचे काय जाते. भाव देण्यासारखी सरकारी आर्थिक स्थिती नक्कीच आहे. इथली सर्व व्यवस्था मोडायची व गुजरातमधील सगळे काही इथे आणायचे यांचे धंदे सुरू आहेत असा आरोप ठाकरे यांनी केला. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाGovernmentसरकारMedicalवैद्यकीय