शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

निवडणूक आयोगाला मनुष्यबळ पुरविण्याच्या महापालिका आयुक्तांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 14:31 IST

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणी आणि तसेच मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम घेण्यात येत आहे.

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणी आणि तसेच मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम घेण्यात येत आहे. मतदार नोंदणी तसेच निवडणूक काळामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शासकीय कर्मचा-यांमध्ये याबाबत उदासिनता असते. त्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेत कर्मचा-यांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करुन बीएलओ म्हणून काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांनी दिल्या आहेत.मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पुर्ण करणा-या नवतरुण मतदारांसह, मतदार नोंदणीपासून अद्याप वंचित राहिलेल्या महिला, आदिवासी, अशिक्षित, तृतीयपंथी आदी मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासोबतच आगामी काळामध्ये अनेक महत्वाच्या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याचीही शक्यता आहे. २०१९ मध्ये विधान सभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही अपेक्षित आहेत. त्यामुळे मतदार यादीमध्ये अधिकाधिक मतदारांचा समावेश करणे, दोष विरहीत व शुद्ध मतदार यादी तयार करणे अपेक्षित आहे. 

त्यासाठी बीएलओंची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. मतदार यादी तयार करताना ‘ईआरओ-एनईटी’ या नवीन संगणक प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. या प्रणालीनुसार बीएलओ ने प्रत्येक मतदाराच्या अर्जाची प्रत्यक्ष भौतिक पडताळणी (फिजीकल व्हेरीफिकेशन) करणे आवश्यक  आहे. त्यामुळे बीएलओंची जबाबदारी महत्वपुर्ण असणार आहे. कामाचे स्वरुप आणि व्याप्ती पाहता पुरेशा प्रमाणात बीएलओ च्या सेवा उपलब्ध होणे अधिक महत्वाचे आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेच्या आस्थापनांवरील कर्मचा-यांचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची दक्षता घ्यावी अशा सुचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. 

मतदार होण्यास पात्र असलेल्या 18 वर्षे पुर्ण केलेल्या नागरिकांची मतदार यादीमध्ये नोंद व्हावी या हेतूने निवडणूक आयोगाने मोहिम हाती घेतलेली आहे. ही मोहिम आणि तिचा हेतू यशस्वी व्हावा म्हणून जनजागृती करण्यासाठी पालिका आयुक्तांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहनही आयोगाने केले आहे. आगामी काळात राज्यातील काही महत्वाच्या महापालिकांमध्ये होणा-या निवडणूका लक्षात घेता मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी आणि जनतेला मोहिमेची माहिती व्हावी म्हणून पालिकांच्या निधीचा वापर करण्यात यावा असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.