शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रणाबाबत खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव येथील सिमेंट कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:58 IST

प्रदूषण नियंत्रणाबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव येथील अल्ट्राटेक या सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली तक्रारअल्ट्राटेक सिमेट कंपनीचे जबाबदार अधिकारी संजीव केदारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

लोणी काळभोर : प्रदूषण नियंत्रणाबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव ( ता. हवेली) येथील अल्ट्राटेक या सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जोग सेंटर, वाकडेवाडी पुणे-२चे उपप्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद दिगंबर गंधे (वय ४७, रा. न्यू अजंठा हौसिंग सोसायटी, कोथरूड, पौड रोड, पुणे ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे - २चे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे अल्ट्राटेक कंपनीच्या वतीने परिसरात वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी गेल्या होत्या. याची शहनिशा करून कंपनी व परिसराची पाहणी करून तक्रारीनुसार प्रदूषण होत असेल तर योग्य ती कारवाई करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे लेखी व तोंडी आदेश वरिष्ठांकडून मिळाल्याने उपप्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे व क्षेत्र अधिकारी प्रकाश भास्कर जाधव हे दोघे २१ डिसेंबर रोजी पाहणी करण्यासाठी कंपनी परिसरात आले होते.दुपारी ३ ते ६ या कालावधीत झालेल्या पाहणीत त्यांना कंपनीतून सिमेंटच्या गोण्या भरून बाहेर पडलेल्या वाहनांपैकी काही वाहनांतील सिमेंटच्या गोण्या ताडपत्रीने झाकल्याचे दिसून आले नाही. येथून मालवाहतूक करणारी वाहनांची ये-जा मुख्यत्वेकरूण कोरेगावमूळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाकडे होत असते. ही वाहतूक होत असताना रस्त्यावरील धूळ रस्त्यालगतच्या झाडांवर, शेतांतील पिकांवर तसेच परिसरांत उडून पडल्याचे स्थळपाहणीत निदर्शनास आले. कंपनीच्या वतीने मालवाहतूक होत असताना रस्त्यावरील धूळ परिसरात उडून स्थानिक नागरिकांसह इतरांना प्रदूषणाचा उपद्रव होवू नये म्हणून रस्त्यावर कंपनीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत टँकरने पाणी मारल्याचे निदर्शनास आले. परंतू त्यापुढील सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर पाणी मारण्यात न आल्याने त्या परिसरात प्रदूषणाचा उपद्रव होत असल्याचे दिसून आले.या सर्व बाबींचा विचार करता कंपनीने आपल्या मालाची वाहतूक करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आल्याने पेठ-नायगाव (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेट कंपनीचे जबाबदार अधिकारी संजीव केदारी यांच्याविरूद्ध वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९८१ व पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे