शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रणाबाबत खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव येथील सिमेंट कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 13:58 IST

प्रदूषण नियंत्रणाबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव येथील अल्ट्राटेक या सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली तक्रारअल्ट्राटेक सिमेट कंपनीचे जबाबदार अधिकारी संजीव केदारी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

लोणी काळभोर : प्रदूषण नियंत्रणाबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्याने पेठ-नायगाव ( ता. हवेली) येथील अल्ट्राटेक या सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जोग सेंटर, वाकडेवाडी पुणे-२चे उपप्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद दिगंबर गंधे (वय ४७, रा. न्यू अजंठा हौसिंग सोसायटी, कोथरूड, पौड रोड, पुणे ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे - २चे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे अल्ट्राटेक कंपनीच्या वतीने परिसरात वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी गेल्या होत्या. याची शहनिशा करून कंपनी व परिसराची पाहणी करून तक्रारीनुसार प्रदूषण होत असेल तर योग्य ती कारवाई करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे लेखी व तोंडी आदेश वरिष्ठांकडून मिळाल्याने उपप्रादेशिक अधिकारी हेरंबप्रसाद गंधे व क्षेत्र अधिकारी प्रकाश भास्कर जाधव हे दोघे २१ डिसेंबर रोजी पाहणी करण्यासाठी कंपनी परिसरात आले होते.दुपारी ३ ते ६ या कालावधीत झालेल्या पाहणीत त्यांना कंपनीतून सिमेंटच्या गोण्या भरून बाहेर पडलेल्या वाहनांपैकी काही वाहनांतील सिमेंटच्या गोण्या ताडपत्रीने झाकल्याचे दिसून आले नाही. येथून मालवाहतूक करणारी वाहनांची ये-जा मुख्यत्वेकरूण कोरेगावमूळ मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाकडे होत असते. ही वाहतूक होत असताना रस्त्यावरील धूळ रस्त्यालगतच्या झाडांवर, शेतांतील पिकांवर तसेच परिसरांत उडून पडल्याचे स्थळपाहणीत निदर्शनास आले. कंपनीच्या वतीने मालवाहतूक होत असताना रस्त्यावरील धूळ परिसरात उडून स्थानिक नागरिकांसह इतरांना प्रदूषणाचा उपद्रव होवू नये म्हणून रस्त्यावर कंपनीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत टँकरने पाणी मारल्याचे निदर्शनास आले. परंतू त्यापुढील सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर पाणी मारण्यात न आल्याने त्या परिसरात प्रदूषणाचा उपद्रव होत असल्याचे दिसून आले.या सर्व बाबींचा विचार करता कंपनीने आपल्या मालाची वाहतूक करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आल्याने पेठ-नायगाव (ता. हवेली) येथील अल्ट्राटेक सिमेट कंपनीचे जबाबदार अधिकारी संजीव केदारी यांच्याविरूद्ध वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा १९८१ व पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणे