शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 12:38 IST

सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

 

 पुणे :  वारंवार होणारी वाहतूक कोंडी, पराभूत सुविधांचा अभाव म्हणून हिंजवडी आय टी पार्कमधून एक-दोन नव्हे तर तब्बल ५६ कंपन्या स्थलांतरित होत असल्याच्या बातमीचा स्पष्ट इन्कार हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेने केला आहे. सध्या असलेल्या आय टी कंपन्यांपैकी कोणतीही स्थलांतर करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

          अधिक माहिती अशी की, राज्यातील सर्वात मोठे आय टी पार्क असलेल्या  56 कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून काढता पाय घेत असल्याची चर्चा आय टी परिसरात होती. यामध्ये 6 बहुराष्ट्रीय आणि 50 लहान कंपन्यांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी वाहतूक कोंडीला वैतागून बालेवाडी आणि खराडी परिसरात आपला मुक्काम हलवला आहे.  यानंतर ५६ कंपन्या हिंजवडीला रामराम करणार असल्याच्या बातमीमुळे त्यामुळे आय टी क्षेत्रात गोंधळाचे वातावरण बघायला मिळत होते.

            याबाबत लोकमतने हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष अनिल पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे वृत्त नाकारले आहे. ते म्हणाले की,आमच्याकडे सुमारे ८८ हुन अधिक कंपन्या सभासद आहेत अनेक कंपन्यांचे येथे प्रोजेक्ट सूरु आहेत आमच्या तरी ऐकिवात असे काहीही नाही आणि तसे काही झालेही नाही मात्र आयटी कंपन्या व्यतीरिक्त एखादी फर्मास्युटिकल आणि इंजिनेअरिंग कंपनी स्थलांतरीत होत असेल तर सांगता येत नाही मात्र आमच्या आयटी कंपन्यापैकी तरी कोणी स्थलांतरित होण्याच्या मानसिकतेत नाही. 

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी