शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

नाही काम, तरी मिळतोय दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 02:39 IST

नागरी संरक्षण दलात नाही दोन वर्षांपासून भरती : अधिकाऱ्यांना नाही काहीच काम

अमोल अवचितेपुणे : नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची २ वर्षांपासून भरती करण्यात आलेली नाही. या विभागाचा प्रमुख पाया स्वयंसेवक आहे. आता तेच राहिले नसल्याने या विभागाचे कर्मचारी नेमके काय काम करतात, असा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे शासनाकडून या दलावर येणारा खर्च वाया जात आहे .प्राथमिक कोर्सेसचे आयोजन करणे व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र बनवणे, भत्ता काढणे, स्वयंसेवकांना पालखी, गणेशोत्सव, आपत्तीच्या घटना, निवडणूक बंदोबस्त, महसूल कर्मचारी संप बंदोबस्त, पूर नियंत्रण कक्षस्थळी ड्यूटी लावणे आणि त्यांचा आढावा घेणे. अशा स्वरूपाची साधारण कामे असत. मात्र, आता फक्त शासकीय सेवकांनाच फक्त प्रशिक्षण देण्यात येते.

आॅफिसमध्ये येणाºया सेवकांचे हजेरी पत्रक, रजा, शासकीय खर्च यांच्या नोंदीशिवाय वरील स्वरूपाची कोणतेही कामे नसतात. त्यामुळे या विभागाला फक्त सरकारी सेवकांच्या पगारी पुरतेच मर्यादित स्वरूप आले आहे. ना. सं. दलाचे प्रशिक्षणाचे साहित्य बरीच वर्षे पडून जुने झाल्याने त्याला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेच भंगार आॅफिसच्या काही सेवकांनी विकून पैसे खाल्ल्याची माहिती स्वयंसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. पुणे विभागाने अनेकदा उल्लेखनीय काम केल्याची ही उदाहरणे आहेत. १९९३ साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये स्वयंसेवकांनी उल्लेखनीय काम केल्याचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी उलेख केला होता. या वेळी पुण्यातून ३० स्वयंसेवकांची टीम सुरेश लुगडे, दिलीप जाधव या मानसेवी अधिक ाºयाांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजावले होते. गुजरात, ओरिसा आदी ठिकाणी आपत्तीच्या वेळी माहाराष्ट्रातून सुमारे ५०० ते ६०० होमगार्ड आणि ना. सं. दलाचे स्वयंसेवकांनी कर्तव्य बजावले होते. अशी माहिती मानसेवी अधिकारी योगेश परदेशी यांनी दिली. असे असताना ही सभासद नोंदणी बंद करणे योग्य नसल्याचे स्वयंसेवक बोलत आहेत. २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे रोजी स्वयंसेवकांना पोलीस परेड ग्राऊंडवर परेड करण्याचा मान मिळत असे.त्यामुळे स्वयंसेवकांची देश भावना वाढण्यास मदत होत होती. एकूणच ना. सं. दलातील सरकारी सेवक बसूनच शासनाचा पगार घेत असल्याचे दिसून येत आहे.स्वयंसेवकांची भरती बंद असल्याने कार्यालयीन कामकाज तेवढेहोते. शासकीय प्रशिक्षण यादीची नोंदणी ठेवली जाते.- अनिल आवरी,उपनियंत्रक ना. सं. दल, पुणे.पुणे विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात. पुणे व मुंबई विभागाला मिळून एकच उपनियंत्रक आहेत. ते आठवड्यातून ३ दिवस पुणे, तर मुंबईला ३दिवस, असे कामकाज पाहतात.

टॅग्स :Puneपुणे