शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नाही काम, तरी मिळतोय दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 02:39 IST

नागरी संरक्षण दलात नाही दोन वर्षांपासून भरती : अधिकाऱ्यांना नाही काहीच काम

अमोल अवचितेपुणे : नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची २ वर्षांपासून भरती करण्यात आलेली नाही. या विभागाचा प्रमुख पाया स्वयंसेवक आहे. आता तेच राहिले नसल्याने या विभागाचे कर्मचारी नेमके काय काम करतात, असा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे शासनाकडून या दलावर येणारा खर्च वाया जात आहे .प्राथमिक कोर्सेसचे आयोजन करणे व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र बनवणे, भत्ता काढणे, स्वयंसेवकांना पालखी, गणेशोत्सव, आपत्तीच्या घटना, निवडणूक बंदोबस्त, महसूल कर्मचारी संप बंदोबस्त, पूर नियंत्रण कक्षस्थळी ड्यूटी लावणे आणि त्यांचा आढावा घेणे. अशा स्वरूपाची साधारण कामे असत. मात्र, आता फक्त शासकीय सेवकांनाच फक्त प्रशिक्षण देण्यात येते.

आॅफिसमध्ये येणाºया सेवकांचे हजेरी पत्रक, रजा, शासकीय खर्च यांच्या नोंदीशिवाय वरील स्वरूपाची कोणतेही कामे नसतात. त्यामुळे या विभागाला फक्त सरकारी सेवकांच्या पगारी पुरतेच मर्यादित स्वरूप आले आहे. ना. सं. दलाचे प्रशिक्षणाचे साहित्य बरीच वर्षे पडून जुने झाल्याने त्याला भंगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेच भंगार आॅफिसच्या काही सेवकांनी विकून पैसे खाल्ल्याची माहिती स्वयंसेवकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली. पुणे विभागाने अनेकदा उल्लेखनीय काम केल्याची ही उदाहरणे आहेत. १९९३ साली किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये स्वयंसेवकांनी उल्लेखनीय काम केल्याचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी उलेख केला होता. या वेळी पुण्यातून ३० स्वयंसेवकांची टीम सुरेश लुगडे, दिलीप जाधव या मानसेवी अधिक ाºयाांच्या नेतृत्वाखाली कर्तव्य बजावले होते. गुजरात, ओरिसा आदी ठिकाणी आपत्तीच्या वेळी माहाराष्ट्रातून सुमारे ५०० ते ६०० होमगार्ड आणि ना. सं. दलाचे स्वयंसेवकांनी कर्तव्य बजावले होते. अशी माहिती मानसेवी अधिकारी योगेश परदेशी यांनी दिली. असे असताना ही सभासद नोंदणी बंद करणे योग्य नसल्याचे स्वयंसेवक बोलत आहेत. २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे रोजी स्वयंसेवकांना पोलीस परेड ग्राऊंडवर परेड करण्याचा मान मिळत असे.त्यामुळे स्वयंसेवकांची देश भावना वाढण्यास मदत होत होती. एकूणच ना. सं. दलातील सरकारी सेवक बसूनच शासनाचा पगार घेत असल्याचे दिसून येत आहे.स्वयंसेवकांची भरती बंद असल्याने कार्यालयीन कामकाज तेवढेहोते. शासकीय प्रशिक्षण यादीची नोंदणी ठेवली जाते.- अनिल आवरी,उपनियंत्रक ना. सं. दल, पुणे.पुणे विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात. पुणे व मुंबई विभागाला मिळून एकच उपनियंत्रक आहेत. ते आठवड्यातून ३ दिवस पुणे, तर मुंबईला ३दिवस, असे कामकाज पाहतात.

टॅग्स :Puneपुणे