शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सध्याच्या संगीतात '' गोडवा '' नाही : अमिन सायानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 16:44 IST

मध्यंतरीच्या काळात रेडिओवर संगीत बंद केले नसते तर चित्र कदाचित बदलले नसते.

पुणे : रेडिओ हे संवादाचे माध्यम आहे. जणू आपला मित्र आपल्याशीच बोलत आहे की काय असे श्रोत्यांना वाटायला हवे. गीतांमधून श्रोत्यांची कल्पनाशक्ती जागृत व्हायला हवी.संगीतकार नौशाद म्हणायचे, अपना संगीत दिल को छूता था, लेकिन आजका संगीत तनको छूता है.... सध्याच्या संगीतात गोडवा राहिला नसल्याची खंत '' बिनाका गीतमाला '' चे ज्येष्ठ निवेदक अमिन सायानी यांनी व्यक्त केली.    जी हां बहनो और भाईयो....हा आवाज ऐकला की डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे अमिन सायानी. बिनाका गीतमाला च्या माध्यमातून हे नाव घराघरात पोहोचले. शनिवारी (25 मे) संवाद पुणे आणि आरती दीक्षित प्रस्तुत सफर गीतमाला का हा 25 वर्षांचा सरताज गीतांचा सुरीला अविष्कार सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी अमिन सायानी पुण्यात आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.     त्याकाळात ऑल इंडिया रेडिओवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने हिंदी गीतांचे सादरीकरण करण्यास केलेला मज्जाव...पंडित नेहरूंमुळे  रेडिओवर पुन्हा हिंदी गीते प्रसारित करण्याची मिळालेली संधी..बिनाका गीतमाला चा सुरू झालेला प्रवास...श्रोत्यांना यामाध्यमातून घडलेली संगीताची सफर असा आठवणींचा एकेक गुलदस्ता त्यांनी उलगडला.हिंदी चित्रपट संगीताने कशाप्रकारे श्रीमंत केले? चित्रपट संगीत नसते तर काय झाले असते?  याविषयी विचारले असता ते म्हणाले, बहुभाषिक धर्मीयांना एकत्रित आणणे, एकात्मकतेच्या बंधनात बांधणे हा चित्रपट संगीताचा गुण आहे. आपण एक आहोत हा विचार संगीताने सर्वांना दिला. भारतीय संगीताने एकात्मकतेचा संदेश दिला. सर्व धर्मीय लोकांमध्ये एकमेकांमध्ये भाईचारा होता. मध्यंतरीच्या काळात रेडिओवर संगीत बंद केले नसते तर चित्र कदाचित बदलले नसते. आजकाल भ्रष्टाचार, बलात्कार सारख्या घटना पाहिल्या की मन सुन्न होते. आपण हिंदी चित्रपट गीतांना अधिकाधिक बढावा द्यायला हवा होता.  रेडिओ माध्यमात कालपरत्वे अनेक बदल झाले आहेत. ते चांगले की वाईट हे सांगू शकत नाही. मात्र आजकाल रेडिओवर संवाद कमी आणि आरडाओरडाच अधिक ऐकायला मिळत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.-----------------------------------------------------------.................'' त्या '' पत्राने ओशाळलोऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम करत असल्याने अनेक पत्र यायची.अनेक मुली लग्नासाठी विचारणा करायच्या. एकदा एका महिलेकडून शाल भेट म्हणून पाठविण्यात आली. माझं लग्न झालं आहे, असे पत्र मी तिला पाठविले. त्यावर मी तुझ्या आईसमान आहे असे त्यांचे पत्र आले आणि मी अगदी ओशाळलो. त्यादिवसानंतर कुणालाही पत्र पाठविण्याच्या भानगडीत पडलो नसल्याची मिश्किल टिप्पणी अमिन सायानी यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीत