शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

सध्याच्या संगीतात '' गोडवा '' नाही : अमिन सायानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 16:44 IST

मध्यंतरीच्या काळात रेडिओवर संगीत बंद केले नसते तर चित्र कदाचित बदलले नसते.

पुणे : रेडिओ हे संवादाचे माध्यम आहे. जणू आपला मित्र आपल्याशीच बोलत आहे की काय असे श्रोत्यांना वाटायला हवे. गीतांमधून श्रोत्यांची कल्पनाशक्ती जागृत व्हायला हवी.संगीतकार नौशाद म्हणायचे, अपना संगीत दिल को छूता था, लेकिन आजका संगीत तनको छूता है.... सध्याच्या संगीतात गोडवा राहिला नसल्याची खंत '' बिनाका गीतमाला '' चे ज्येष्ठ निवेदक अमिन सायानी यांनी व्यक्त केली.    जी हां बहनो और भाईयो....हा आवाज ऐकला की डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे अमिन सायानी. बिनाका गीतमाला च्या माध्यमातून हे नाव घराघरात पोहोचले. शनिवारी (25 मे) संवाद पुणे आणि आरती दीक्षित प्रस्तुत सफर गीतमाला का हा 25 वर्षांचा सरताज गीतांचा सुरीला अविष्कार सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी अमिन सायानी पुण्यात आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.     त्याकाळात ऑल इंडिया रेडिओवर केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने हिंदी गीतांचे सादरीकरण करण्यास केलेला मज्जाव...पंडित नेहरूंमुळे  रेडिओवर पुन्हा हिंदी गीते प्रसारित करण्याची मिळालेली संधी..बिनाका गीतमाला चा सुरू झालेला प्रवास...श्रोत्यांना यामाध्यमातून घडलेली संगीताची सफर असा आठवणींचा एकेक गुलदस्ता त्यांनी उलगडला.हिंदी चित्रपट संगीताने कशाप्रकारे श्रीमंत केले? चित्रपट संगीत नसते तर काय झाले असते?  याविषयी विचारले असता ते म्हणाले, बहुभाषिक धर्मीयांना एकत्रित आणणे, एकात्मकतेच्या बंधनात बांधणे हा चित्रपट संगीताचा गुण आहे. आपण एक आहोत हा विचार संगीताने सर्वांना दिला. भारतीय संगीताने एकात्मकतेचा संदेश दिला. सर्व धर्मीय लोकांमध्ये एकमेकांमध्ये भाईचारा होता. मध्यंतरीच्या काळात रेडिओवर संगीत बंद केले नसते तर चित्र कदाचित बदलले नसते. आजकाल भ्रष्टाचार, बलात्कार सारख्या घटना पाहिल्या की मन सुन्न होते. आपण हिंदी चित्रपट गीतांना अधिकाधिक बढावा द्यायला हवा होता.  रेडिओ माध्यमात कालपरत्वे अनेक बदल झाले आहेत. ते चांगले की वाईट हे सांगू शकत नाही. मात्र आजकाल रेडिओवर संवाद कमी आणि आरडाओरडाच अधिक ऐकायला मिळत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.-----------------------------------------------------------.................'' त्या '' पत्राने ओशाळलोऑल इंडिया रेडिओवर कार्यक्रम करत असल्याने अनेक पत्र यायची.अनेक मुली लग्नासाठी विचारणा करायच्या. एकदा एका महिलेकडून शाल भेट म्हणून पाठविण्यात आली. माझं लग्न झालं आहे, असे पत्र मी तिला पाठविले. त्यावर मी तुझ्या आईसमान आहे असे त्यांचे पत्र आले आणि मी अगदी ओशाळलो. त्यादिवसानंतर कुणालाही पत्र पाठविण्याच्या भानगडीत पडलो नसल्याची मिश्किल टिप्पणी अमिन सायानी यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीत