शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

मागसलेपण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका, मागास आयोगाचे पुनर्गठण करण्याची मागणी

By नितीन चौधरी | Updated: September 8, 2023 19:32 IST

मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणे शक्य नाही, संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

पुणे : “मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणे शक्य नाही. राज्य सरकारने त्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे पुनर्गठन करून त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करावे आणि हे मागासलेपण सिद्ध करावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी (दि. ८) पुण्यात केली. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फार काळ टिकणार नाही. त्यामुळे भावना व न्यायिक बाजू याचा समन्वय साधून राज्य सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आरक्षणाच्या आंदोलनात राज्यात मराठा समाजाच्या दोन तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वेळेच्या आंदोलनात देखील ४८ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. आता या आंदोलनात त्याच पद्धतीने आत्महत्यांचे हे सत्र सुरू राहिल्यास त्याला वेगळे वळण लागू शकते, असा इशारा संभाजीराजे यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांना सामाजिक मागासलेपण नसल्याने आरक्षण देताना येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करून त्यानुसार पुन्हा राज्यात सर्वेक्षण करावे आणि हे मागासलेपण सिद्ध करावे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असल्यास हे आरक्षण देणे शक्य आहे. न्यायमूर्ती गायकवाड अहवालात देखील हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारकडून वकील देण्यात कमी पडले आहे. त्यामुळेच मराठा समाजाचा तोटा झाला आहे. या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे राज्य सरकारने त्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी अन्यथा क्युरेटिव्ह पिटीशनमध्येदेखील आरक्षण टिकणार नाही.”

राज्य सरकारला हे करणे शक्य नसल्यास मी स्वतः योग्य वेळी योग्य त्या गोष्टी करेल, असेही ते म्हणाले. राजकारणापलीकडे जाऊन हे आरक्षण देणे शक्य आहे राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फार काळ टिकणार नाही. केवळ एक-दोन महिन्यांसाठी सरकारने समाजाला खुश करू नये आरक्षण त्यांना ते कायमस्वरूपी असावे अशी मागणी ही संभाजी राजे यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर नुकत्याच झालेल्या बैठकीत मला बोलण्याची संधी दिली. मात्र, त्यानंतर संभाजीराजे केवळ आपलीच भूमिका रेटतात असा आरोप करण्यात आला. त्यामुळे आता मी मध्यस्थाची भूमिका करणार नाही. समाजाची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण