शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मागसलेपण सिद्ध केल्याशिवाय आरक्षण नाही, संभाजीराजे छत्रपतींची भूमिका, मागास आयोगाचे पुनर्गठण करण्याची मागणी

By नितीन चौधरी | Updated: September 8, 2023 19:32 IST

मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणे शक्य नाही, संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

पुणे : “मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणे शक्य नाही. राज्य सरकारने त्यासाठी मागासवर्गीय आयोगाचे पुनर्गठन करून त्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करावे आणि हे मागासलेपण सिद्ध करावे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी (दि. ८) पुण्यात केली. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फार काळ टिकणार नाही. त्यामुळे भावना व न्यायिक बाजू याचा समन्वय साधून राज्य सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

आरक्षणाच्या आंदोलनात राज्यात मराठा समाजाच्या दोन तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या वेळेच्या आंदोलनात देखील ४८ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. आता या आंदोलनात त्याच पद्धतीने आत्महत्यांचे हे सत्र सुरू राहिल्यास त्याला वेगळे वळण लागू शकते, असा इशारा संभाजीराजे यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांना सामाजिक मागासलेपण नसल्याने आरक्षण देताना येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करून त्यानुसार पुन्हा राज्यात सर्वेक्षण करावे आणि हे मागासलेपण सिद्ध करावे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असल्यास हे आरक्षण देणे शक्य आहे. न्यायमूर्ती गायकवाड अहवालात देखील हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकारकडून वकील देण्यात कमी पडले आहे. त्यामुळेच मराठा समाजाचा तोटा झाला आहे. या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे राज्य सरकारने त्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी अन्यथा क्युरेटिव्ह पिटीशनमध्येदेखील आरक्षण टिकणार नाही.”

राज्य सरकारला हे करणे शक्य नसल्यास मी स्वतः योग्य वेळी योग्य त्या गोष्टी करेल, असेही ते म्हणाले. राजकारणापलीकडे जाऊन हे आरक्षण देणे शक्य आहे राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फार काळ टिकणार नाही. केवळ एक-दोन महिन्यांसाठी सरकारने समाजाला खुश करू नये आरक्षण त्यांना ते कायमस्वरूपी असावे अशी मागणी ही संभाजी राजे यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर नुकत्याच झालेल्या बैठकीत मला बोलण्याची संधी दिली. मात्र, त्यानंतर संभाजीराजे केवळ आपलीच भूमिका रेटतात असा आरोप करण्यात आला. त्यामुळे आता मी मध्यस्थाची भूमिका करणार नाही. समाजाची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण