शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तिहेरी तलाक कायद्याचे राजकारण नको; शायरा बानो यांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 13:00 IST

कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्‍या शायरा बानो यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देन्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समाजातील प्रथांमध्ये बदल होण्याची आशा : शायरा बानो मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे वार्तालापाचे आयोजन

पुणे : तिहेरी तलाकसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुस्लिम महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषणाला आळा बसू शकेल. कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी, तसेच नवीन पिढीच्या विकासासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कायद्याचे राजकीय भांडवल करून त्याचे पक्षीय राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्‍या शायरा बानो यांनी व्यक्त केली.  मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे आयोजित वार्तालापात बानो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी, बानो यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद हेदेखील उपस्थित होते. बानो म्हणाल्या, ‘तिहेरी तलाकविरोधात न्यायालयात अर्ज केल्यानंतर विविध संघटना, तसेच कुटुंबांचा पाठिंबा मिळाला. मात्र मुस्लिम बोर्ड, स्थानिक मौलवी यांच्यासह अनेक प्रतिगामी संघटनांकडून प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून अनेकदा याचिका मागे घेण्यासाठी धमकीवजा विनंती केली. त्यामुळे न्यायालयीन लढ्यात मोठा संघर्ष करावा लागला.’ याचवेळी अनेक महिला संघटनांनी मदत केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अनेकदा सुशिक्षित मुस्लिम कुटुंबात तिहेरी तलाक दिला जात नाही. त्यामुळे तेथील महिलांना या कुप्रथेची तितकीशी जाणीव नसते. परंतु, हे दु:ख भोगाव्या लागणार्‍या महिलेची परिस्थिती बिकट असते. बानो यांचे बंधू अर्शद अली म्हणाले, ‘तिहेरी तलाकनंतर बहिणीने खूप त्रास सहन केला. सुरुवातीचा दीड महिना तिने एका शब्दानेही वाच्यताही केली नाही. मात्र, तिने याबाबत सांगितल्यानंतर न्यायालयीन लढा देण्याचा आम्ही निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत कायदा करण्यासाठी सरकारला दिलेल्या कालावधीतील दोन महिने संपले असून कायद्यात नेमके काय अपेक्षित होते, याविषयीची आमच्याकडे विचारणा केली नसल्याचे ते म्हणाले. 

 

मुस्लिम समाजात महिला अनेक वर्षांपासून अन्याय, अत्याचार, शोषण सहन करत आल्या आहेत. न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समाजातील प्रथांमध्ये बदल होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, न्यायालयाचा निकाल सहजासहजी स्वीकारण्याची मानसिकता अद्याप तयार झालेली नाही. मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे.- शायरा बानो ---------- 

टॅग्स :Muslimमुस्लीमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय