शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये, शरद पवार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:13 IST

मागील निवडणुकीत काही चुकांमुळे अनेक जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार निवडून आले.

पुणे : मागील निवडणुकीत काही चुकांमुळे अनेक जागांवर शिवसेना-भाजपाचे उमेदवार निवडून आले. आगामी लोकसभा- विधानसभा पोटनिवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पराभूत करण्यासाठी मित्रपक्षांना बरोबर घेऊन समन्वयाने एकत्रित निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. परंतु, ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या आम्हालाच मिळाव्यात. मित्रपक्षाने रडीचा डाव खेळू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.येथील निसर्ग मंगल कार्यालयत प्रदेश राष्ट्रवादी काँगे्रसच्या संघटनात्मक निवडीसाठी झालेल्या बैठकीत पवार बोलत होते. देशात प्रचंड अस्वस्थता आहे. महिला, दलित, शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याकांबद्दल सरकारची बांधिलकी नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेला धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी पोटनिवडणुकीत सत्ताधाºयांचा पराभव केला. लोकांचे मत कोणत्या दिशेने चालले आहे, हे या निकालातून दिसते, असे पवार यांनी स्पष्ट केले.पवार म्हणाले, राज्यात पालघर, भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघात, सांगलीतील पलूस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पुढील दोन महिन्यांत विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणूक होत आहे. सत्ताधाºयांना रोखण्यासाठी या निवडणुका मित्रपक्षांना सोबत घेऊन लढण्यासाठी समन्वयाची भूमिका घेण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, आम्ही समन्वयाची भूमिका घेत असताना मित्रपक्षाने तशीच रास्त भूमिका घ्यावी, ही अपेक्षा आहे. पूर्वी ज्या जागांवर जो पक्ष जिंकला आहे, ती जागा त्याच पक्षाने लढवावी.ईव्हीएम यंत्रणेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. मतदान सुरू होण्यापूर्वी संबंधित केंद्रावरील मशीनची चाचणी व्हावी, यासाठी आग्रह धरला पाहिजे. सध्या या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर अनेक पक्ष एकत्र येत आहेत. सत्ताधारी असलेल्यांकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना न बोलणारा पंतप्रधान म्हटले जायचे. त्या तुलनेत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप बोलतात. परंतु, जेथे बोलायचे तेथे बोलत नाहीत, असा चिमटा पवार यांनी काढला. हे सांगत असताना त्यांनी दलितांवरील अत्याचार, नुकतेच घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि खुनाच्या घटनांची उदाहरणे दिली.उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपाने एकत्र येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपाला मात दिली. जनतेमध्ये भाजपाविरोधी मतप्रवाह सुरू झाल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. शरद पवार यांची देशपातळीवर महत्त्वाची भूमिका आहे. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी पवार यांच्यावर आहे. पवारांना मिळणारा सन्मान आपण निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळवून दाखवून देण्याच्या दृष्टीने संघटनात्मक काम करावे, असे आवाहन पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी केले.आगामी निवडणुकीत मोदी सरकार दिसणार नाहीआगामी निवडणुकीत मोदी सरकार सत्तेत दिसणार नाही. देशाच्या राजकारणात शरद पवार यांचे नेतृत्व असामान्य असल्याचे मत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस