शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सरकार पाडण्याची गरज नाही, तर ते आपोआपच पडेल- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:59 IST

राज्यात विधानसभेचा २४ ऑक्टोबरला निकाल लागला, सरकार स्थापना करायला या अनैसर्गिक सरकारने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला.

इंदापूर : राज्यात विधानसभेचा २४ ऑक्टोबरला निकाल लागला, सरकार स्थापना करायला या अनैसर्गिक सरकारने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला, त्यातच खातेवाटप करायलाही खूप वेळ घालवला, त्यामुळे या अनैसर्गिक सरकारला पाडण्याची गरज नसून ते आपोआपच पडेल, असा आशावाद भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

इंदापूर येथे 'इंदापूर कृषी महोत्सव २०२०' चे उदघाटन बुधवार ( ८ ) रोजी दुपारी ३.३० वाजता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते - पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीचे सभापती पुष्पाताई रेडके, संचालक मेघ:शाम पाटील, महावीर गांधी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सरकारने फसवी कर्जमाफी केली असून, २००१ ते २०१६ पर्यंतची २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी भाजपा सरकारने केली होती, त्यामुळे या अनैसर्गिक सरकारने 2016नंतरची अट लावून कोणाची कर्जमाफी केली ?, या सरकारला अजूनही एकर आणि हेक्टरची माहिती नाही, या सरकारची खातेवाटप, बंगलेवाटप, पदवाटप झाले महामंडळ वाटप होईल, मात्र हे शेतकऱ्यांना काहीच देऊ शकत नाहीत, असाही आरोप पाटील यांनी यावेळी केला. 

यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही होकार देत येणाऱ्या काळात अनुभवी हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले. यावेळी महोत्सवातील घोडे बाजारातील घोड्यांच्या चाळीच्या व नाचकाम स्पर्धा, तसेच प्रदर्शनात आलेले जनावरे व कृषी विषयक सखोल माहिती असलेल्या कृषीच्या स्टॉलला मान्यवरांनी भेटी दिल्या व राज्यात एक नंबरचे इंदापूरचे कृषी प्रदर्शन होण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांनी भाषणे केली तर माजी नगराध्यक्ष अरविंद वाघ, सामजिक कार्यकर्ते महेंद्र रेडके, युवा नेते राजवर्धन पाटील, मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील