शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सरकार पाडण्याची गरज नाही, तर ते आपोआपच पडेल- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:59 IST

राज्यात विधानसभेचा २४ ऑक्टोबरला निकाल लागला, सरकार स्थापना करायला या अनैसर्गिक सरकारने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला.

इंदापूर : राज्यात विधानसभेचा २४ ऑक्टोबरला निकाल लागला, सरकार स्थापना करायला या अनैसर्गिक सरकारने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला, त्यातच खातेवाटप करायलाही खूप वेळ घालवला, त्यामुळे या अनैसर्गिक सरकारला पाडण्याची गरज नसून ते आपोआपच पडेल, असा आशावाद भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

इंदापूर येथे 'इंदापूर कृषी महोत्सव २०२०' चे उदघाटन बुधवार ( ८ ) रोजी दुपारी ३.३० वाजता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते - पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीचे सभापती पुष्पाताई रेडके, संचालक मेघ:शाम पाटील, महावीर गांधी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सरकारने फसवी कर्जमाफी केली असून, २००१ ते २०१६ पर्यंतची २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी भाजपा सरकारने केली होती, त्यामुळे या अनैसर्गिक सरकारने 2016नंतरची अट लावून कोणाची कर्जमाफी केली ?, या सरकारला अजूनही एकर आणि हेक्टरची माहिती नाही, या सरकारची खातेवाटप, बंगलेवाटप, पदवाटप झाले महामंडळ वाटप होईल, मात्र हे शेतकऱ्यांना काहीच देऊ शकत नाहीत, असाही आरोप पाटील यांनी यावेळी केला. 

यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही होकार देत येणाऱ्या काळात अनुभवी हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले. यावेळी महोत्सवातील घोडे बाजारातील घोड्यांच्या चाळीच्या व नाचकाम स्पर्धा, तसेच प्रदर्शनात आलेले जनावरे व कृषी विषयक सखोल माहिती असलेल्या कृषीच्या स्टॉलला मान्यवरांनी भेटी दिल्या व राज्यात एक नंबरचे इंदापूरचे कृषी प्रदर्शन होण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांनी भाषणे केली तर माजी नगराध्यक्ष अरविंद वाघ, सामजिक कार्यकर्ते महेंद्र रेडके, युवा नेते राजवर्धन पाटील, मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील