शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

संगीत नाटकांसाठी सेलिब्रेटींवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही : कीर्ती शिलेदार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:30 IST

आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी आहे.

ठळक मुद्देमसाप गप्पांतून उलगडला नाट्यसंगीताचा पट  तरुण कलाकारांचे आयुष्य धावपळीचेसंगीत नाटकांची शुध्द मराठी भाषा हे आपल्या भाषेची श्रीमंती

पुणे : नव्या दमाच्या गायक, कलाकार मंडळींना आपले पूर्वसुरीचे नाट्यसंगीताचे संचित जपण्याची आस नाही. ते जपावे यासाठी ती प्रयत्नशील असल्याचे वाटत नाही. आगामी काळात ती परंपरा आत्मीयतेने जपल्यास संगीत नाटक पुन्हा ताकदीने उभे राहील. मात्र, आता कलेसाठी आयुष्य पणाला लावणारे कुणी दिसत नाही. प्रत्येकाला झटपट यश आणि प्रसिध्दी हवी असून संगीत नाटकांसाठी सेलिब्रेटींवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. असे परखड मत संगीत नाट्यरंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली.   महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मसाप गप्पा या कार्यक्रमात शिलेदार यांच्याशी अभिनेते व नाट्यअभ्यासक सुरेश साखोळकर यांनी संवाद साधला. शिलेदार यांनी आपल्या संगीत नाट्यप्रवासाबद्दलच्या विविध आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी सध्याच्या मनोरंजनाचा भडिमार, रसिकांचा घसरत चाललेला दर्जा यावरही आपले रोखठोक मते व्यक्त केली. त्या म्हणाल्या, तरुण कलाकारांचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यांना आपण ज्या कलामाध्यमांत काम करतो त्याचा ध्यास लागत नाही. एकाचवेळी अनेक कामे करण्याची घाई त्यामुळे त्या कलाकाराकडून काय अपेक्षा करणार?, आमच्यावेळी आयुष्यपणाला लावून काम करणारे कलाकार होते. कलेप्रती त्यांनी घेतलेला ध्यास त्यांच्या कामातून दिसून यायचा. आता तसे होत नाही. परंपरा आणि नाविन्य यांचा मिलाफ झाल्यास रसिक तुमच्या कलेचा आस्वाद घेण्यास येतील. आताच्या नवीन कलाकारांना भाषा, तिचा योग्य वापर, याबद्द्ल विशेष आनंद  नसल्याचे दिसून येते. अण्णासाहेब किर्लोस्कार, गोविंद बल्लाळ देवल, काका खाडिलकर आणि राम गणेश गडकरी यासारख्या भाषाप्रभुंच्या नाटकांत काम करण्याची संधी मिळाली. त्या नाटकांमधील शुध्द मराठी भाषा हे आपल्या भाषेची श्रीमंती म्हणावी लागेल. मात्र नवीन कलाकारांनी ही भाषा झेपत नाही. संगीतनाट्याविषयी काय बोलावे? असा प्रश्न पडतो. आताचा काळ विचित्र करमणुकीचा आहे. त्यातून रसिकांची बहुश्रृतता कमी झाली आहे. ज्यापध्दतीने एखाद्या श्वापदाला मारण्याअगोदर घायाळ केले जाते तसे रसिक मनोरंजनाच्या भडिमारामुळे मृतावस्थेत जात आहे. संगीत नाट्य सुरु राहावे यासाठी रसिकांनी संगीत नाट्याच्या बैठक आयोजित करायला हव्यात. घरात आपल्यावर टीव्हीच्या माध्यमातून ज्यापध्दतीच्या मनोरंजनाचा भडिमार होतो आहे त्याकडे पाठ फिरवून संगीत नाटकांच्या बैठका सुरु झाल्यास भारतीय नाट्य संगीत परंपरा मुळपदावर येईल. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद