शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

काही झाले तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील अतिक्रमणे राहणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:43 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर संवर्धनाची कामे, अतिक्रमण काढण्याची कामे सुरु असून याकरिता शासनाने एक टास्क फोर्स निर्माण केली आहे

जुन्नर: छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्याकरीता कुठल्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी, स्वराज्याची राजधानी रायगड तसेच इतर किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत. याकरिता शासनाने एक टास्क फोर्स निर्माण केली आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काही झाले तरी त्याठिकाणी अतिक्रमणे राहणार नाही. असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, माजी आमदार अतुल बेनके यावेळी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले, शिवनेरीच्या मातीमध्ये स्वराज्याचे तेज मिळते ते तेज घेऊन आम्ही महाराष्ट्राची सेवा करत आहोत. भारतातील राजांनी मुघलांचे मांडलीकत्व स्वीकारले होते. त्यांच्यापुढे नतमस्तक होत होते. अशा काळात आई जिजाऊंनी शिवराय घडविले. मराठी मुलखात हिंदुस्थानात अत्याचार चालला आहे. या मुलखाला त्यातून बाहेर काढून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी तुझी आहे असे सांगितले. म्हणून शिवरायांनी तलवार हातात घेतली अठरापगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. मावळ्यांची फौज तयार केली व देव देश व धर्माची लढाई सुरू करून स्वराज्य स्थापन करण्याचे आत्माभिमान जागृत करण्याचे काम केले. भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले.

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFortगड