शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

वीज नाही, पाणी नाही; दरवाजेही नादुरुस्त, आळंदी पालिकेच्या शाळेची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:06 IST

चावडी चौकातील आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोन या शालेय इमारतीच्या जिन्यातील लोखंडी दरवाजा अनेक महिन्यांपासून तुटलेल्या नादुरुस्त अवस्थेत आहेत.

आळंदी : येथील चावडी चौकातील आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोन या शालेय इमारतीच्या जिन्यातील लोखंडी दरवाजा अनेक महिन्यांपासून तुटलेल्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. यामुळे विद्यार्थीे, शिक्षक आणि पालक यांना जिन्यातून ये-जा करताना गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. या प्रशालेचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित करण्यात आला आहे. यामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. इतर प्रशालेत जाऊन कामकाज उरकावे लागत आहे.शालेय परिसरातील कचराकुंड्या भरून वाहत असल्याने आता नागरिकांच्याही नाराजीत वाढ झाली आहे. शाळेच्या मागील बाजूला मोठ्या प्रमाणात कचºयाच्या साम्राज्य आहे. मुलांच्या संख्येच्या प्रमाणात या इमारतीत स्वच्छता गृहे नसल्याने शालेय मुलांसह मुलींनादेखील इतरत्र नैसर्गिक विधीस जावे लागत आहे. याठिकाणी पाण्याच्या साठवण व्यवस्थेचा अभाव असल्याने यावर मर्यादा येत आहेत.आळंदी नगरपरिषदेने स्वत:ला हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित करून पुरस्कारदेखील मिळवला आहे. मात्र, या शाळेत स्वच्छतागृहात पुरेशा प्रमाणात पाणी, प्रभावी स्वच्छता, शाळेत पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. येथील मुले तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत विकसित केलेल्या भागीरथी नाल्यावर बांधलेले नागरिक-भाविकांसाठीच्या स्वच्छता गृहांचा वापर करीत आहेत. या ठिकाणीदेखील परिसरात अस्वच्छतेसह दुर्गंधीयुक्त परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामुळे पालक,नागरिक व शालेय मुले यांच्यात नाराजी आहे. भागीरथी नाला मार्ग रहदारीस स्वच्छतेअभावी मर्यादित लोक वापरकरीत आहेत. या परिसरात नियमित स्वच्छता व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.या इमारतीच्या प्रवेशद्वारात जिन्याचे लोखंडी दरवाजे खराब झाल्याने शालेय शिक्षकांसह मुलांना रहदारीस अडथळा होत असल्याची बाब प्रशासनाचे निदर्शनास आणून देण्यात आली आहे.यात शिक्षण मंडळ,आळंदी नगरपरिषद व शालेय व्यवस्थापन समिती यांनी मुलांचे सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज असल्याचे पालकांनी सांगितले.आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमधील विविध सेवा सुविधा व अडचणींच्याबाबतीत वेळोवेळी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी, नगरपरिषद, मुख्याधिकारी यांना लेखी निवेदने देऊन कळविले असल्याचे मुख्याध्यापिका यांनी सांगितले.> विंधनविहीर वापरायोग्यशाळेत पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी साठवण क्षमता साधने नसतानादेखील लगत असलेली विंधन विहीरदेखील वापरा योग्य करण्यास पाणीपुरवठा विभाग,शिक्षण मंडळ दुर्लक्ष करीत आहे.यातून नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.मागील बाजूला स्वच्छता साफसफाईचा अभाव असल्याने कचºयाचेसाम्राज्य असून, स्वच्छता करण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या परिसरातील कचराकुंडी नेहमी भरून वाहताना भाविक -नागरिकपाहून येथील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत.आळंदी नगरपरिषदेकडून शिक्षण मंडळास वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. मात्र, शालेय कामकाज सुरळीत होण्यासाठी यापुढील काळात शाळानिहाय निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. तत्काळ निर्धारित कर संकलना नंतरचा शिक्षण निधी अथवा नगरपरिषद फंडातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.- सागर भोसले, उपनगराध्यक्ष, आळंदी नगरपरिषद>जिन्याचे प्रवेशद्वाराचे तुटलेले लोखंडी दरवाजे दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरूआहे. लवकरच दुरुस्ती करून रहदारीयोग्य जिना होईल.- संघपाल गायकवाड, नगरपरिषद बांधकाम विभाग प्रमुख, आळंदी

टॅग्स :Puneपुणे